शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
2
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
3
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
4
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
5
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी निस्तब्ध पडून राहिली नवी नवरी
6
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
7
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
8
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
9
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
10
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
11
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
12
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
13
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
14
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
15
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
16
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
17
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
18
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
19
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
20
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."

हिंगोलीच्या निकालाने आघाडीत अस्वस्थता; युतीत आत्मविश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 18:18 IST

नाराजांना आपलेसे करण्यात आणि सर्वांनाच सोबत घेण्यात शिवसेनेच्या हेमंत पाटील यांना यश

ठळक मुद्दे काँग्रेसच्या वानखेडेंना पक्षातील गटबाजीचा फटकाप्रचारात एकजीवपणा दिसला नाही

- विजय पाटील

हिंगोली लोकसभा निवडणुकीच्या एकतर्फी निकालाने आघाडीतील नेत्यांमधील अस्वस्थता वाढली असून युतीच्या नेत्यांचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. गट-तट आणि मोठेपणाची भूक कधी संपणारच नसल्याने आत्मपरीक्षण करूनही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्याचे उत्तर सापडेल, अशी स्थिती नाही.

या लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूर्यकांता पाटील यांना यापूर्वी १९९९ मध्ये भारिप-बमसंचे माधवराव नाईक यांच्या झंझावातामुळे तिसऱ्या क्रमांकावर जावे लागले होते. यावेळी तिसऱ्या क्रमांकावर जाण्याइतपत बेहाल झाले नाहीत. मात्र वंचित आघाडी तगडी लढत देणार असल्याची चिन्हे निर्माण होताच अनेकांनी शिवसेनेला जवळ करण्यातच धन्यता मानली. शिवाय हेमंत पाटील यांनी पहिल्या दिवसापासून केवळ विजयासाठीच प्रयत्न केले. नाराजांना आपलेसे करण्यात कोणताच कमीपणा मानला नाही. आ.डॉ.जयप्रकाश मुंदडा, आ.नागेश पाटील आष्टीकर हे उमेदवारीचे दावेदारही जवळ केले. शिवाय आ.तान्हाजी मुटकुळे, माजी खा. सूर्यकांता पाटील, शिवाजी माने, माजी आ.गजानन घुगे, शिवाजी जाधव, संतोष बांगर आदींचा प्रचारासाठी खुबीने वापर केला. त्यामुळे प्रत्येकजण त्यांच्यासाठी झटून काम करीत होता. जातीय, सामाजिक गणितांच्या पलिकडची भूमिका ठेवून काम केले जात होते. मित्रपक्ष भाजप तर त्याही पुढे होता. त्यामुळे पाटील यांनी ५ लाख ८६ हजार ३१२ मतांचा आकडा गाठला.

दुसरीकडे काँग्रेसमध्ये मात्र अतिशय थंड वातावरण होते. त्यातही गटा-तटाची मजबूत तटबंदी उमेदवार सुभाष वानखेडे यांना पावलोपावली अडचणीत आणत होती. खा.राजीव सातव यांचा समर्थकवर्ग प्रत्येक विधानसभेत आहे. स्थानिक विधासभेत मागच्या वेळी पराभूत वा विजयी झालेल्यांचे वेगळे गट आहेत. आ.प्रदीप नाईक, आ.संतोष टारफे यांच्यासह माजी आ.जयप्रकाश दांडेगावकर, माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर, माजी आ. विजय खडसे यांच्या प्रचारात एकजीवपणा नव्हता. पोटात एक अन् ओठात एक या भूमिकेत अनेकजण होते.

मानपानाची प्रत्येकाची अपेक्षा वानखेडे पूर्ण करू शकले नाहीत. कुणाबद्दल चांगले बोलले की, दुसऱ्या गटात नाराजी होत असल्याचा फटका त्यांना सोसावा लागत होता. ते अगदीच सूर हरवलेल्या फलंदाजासारखे लढत होते. शिवाय मराठा वोटींगलाच टार्गेट केल्याने इतरांकडे दुर्लक्ष झाले. किंबहुना गृहित धरलेल्या अनेक घटकांनी वंचित वा सेनेचा मार्ग पत्करला. त्यातच ‘लक्ष्मी’अस्त्राचा अभाव असल्यामुळे वानखेडे  ३ लाख ८ हजार ४५६ मतांमध्ये गुंडाळले गेले.

वंचित फॅक्टरच्या निवडणुकीत वंचित आघाडी हा महत्त्वपूर्ण फॅक्टर ताकदीनिशी उदयास आला. मोहन राठोड हे तेवढे प्रभावी नेते कधीच नव्हते. मात्र दलित, बंजारा व पक्षाच्या इतर उमेदवारांच्या माध्यमातून सोशल इंजिनिअरिंगचा भाग म्हणून त्यांना मते मिळाल्याने १ लाख ७४ हजार ५१ हजारांवर पोहोचले. शिवाय त्यांची प्रचारयंत्रणाही होती, हे विशेष.  बहुदा अशा नवागतांकडे यंत्रणा अपुरी असल्याने फायदा होत नाही. याशिवाय २३ हजार मते घेणाऱ्या संदेश चव्हाण या अपक्ष उमेदवारानेही समाजाच्या मतांमध्ये आपले स्थान दाखवून दिले. 

स्कोअर बोर्डशिवसेनेचे विजयी उमेदवार हेमंत पाटील यांनी ५ लाख ८६ हजार ३१२ मतांचा आकडा गाठला. काँग्रेसचे सुभाष वानखेडे यांना ३ लाख ८ हजार ४५६ मते पडली. उमरखेड-५६,३९१, किनवट-४३,८५५, हदगाव-४३१९५, वसमत-४८२२३, कळमनुरी-४३२७९, हिंगोली-४१४८९ असे विधानसभानिहाय मताधिक्याचे आकडे पाहून खुद्द युतीच्या नेत्यांचेही डोळे विस्फारले आहेत.

टॅग्स :hingoli-pcहिंगोलीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल