शहरं
Join us  
Trending Stories
1
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
2
'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान
3
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
4
NZ W vs BAN W: अखेर वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडनं भोपळा फोडला! बांगलादेशचा १०० धावांनी उडवला धुव्वा
5
केबिनमध्ये बोलावलं अन्...; दारूच्या नशेत डॉक्टराचे नात्यातील महिलेसोबत संतापजनक कृत्य
6
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
7
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
8
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
9
आरोग्य सचिवांच्या दौऱ्यापूर्वीच दहा डॉक्टरांचे राजीनामास्त्र, सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात खळबळ
10
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
11
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
12
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
13
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
14
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
15
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?
16
आठ युद्धं थांबवली तरी पुरस्कार समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल का नाकारला? समोर येताहेत ही कारणं
17
"मुंबईतील भूखंड उद्योगपतींना कवडीमोल दराने देण्याचा महायुती सरकारचा सपाटा, तर सर्वसामन्यांच्या घरांकडे दुर्लक्ष’’, काँग्रेसचा आरोप
18
सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना
19
IND vs WI 2nd Test Day 1 Stumps: 'ओपनिंग डे'ला टीम इंडियाचा 'यशस्वी' शो! साई सुदर्शनही चमकला; पण...
20
'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

आदिवासी मुलांच्या अखंडित शिक्षणासाठी शिक्षण सेतू अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:30 IST

राज्यातील लाखो आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित न होण्यासाठी शासनाने धोरण जाहीर केले आहे. शाळा बंद असतानाही शिक्षकांमार्फत गावपातळीवर पूरक ...

राज्यातील लाखो आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित न होण्यासाठी शासनाने धोरण जाहीर केले आहे. शाळा बंद असतानाही शिक्षकांमार्फत गावपातळीवर पूरक सेवा व साहित्य पुरवाव्यात, जेथे पाठविणे शक्य नाही, तेथे शिक्षणमित्राच्या साह्याने वरील सेवा पुरवायच्या आहेत, शक्य तेथे ऑनलाइन पद्धतीने पूरक शिक्षण देणे, पूरक पोषण आहार मिळण्यासाठी विशेष उपाय करण्यास सांगितले आहे. आश्रमशाळा व एकलव्य निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना डीबीटी अदा करण्यास सांगितले, तर या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आयुक्त, आदिवासी विकास, प्रकल्प अधिकारी, आश्रमशाळा आदी स्तरावर विविध समित्या स्थापन करण्याचा आदेशही दिला आहे. तसेच प्रत्येक समितीची जबाबदारी निश्चित केली. नाशिक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समितीही गठित केली. या समितीमार्फत अंमलबजावणी होणार आहे. यात शिक्षणमित्र नेमणे, त्यांची शैक्षणिक अर्हता, भत्ते निश्चित करणे, शैक्षणिक साहित्य मानकीकरण, पोषण आहार प्रमाण निश्चित करून पुरवठादाराकडून ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची कार्यपद्धती निश्चित करणे, इतर विभागांशी समन्वय, शैक्षणिक साहित्य पोहोचविण्याचे नियोजन, मानांकन समितीने निर्माण केलेल्या साहित्यास मान्यता देणे आदींची जबाबदारी आहे. तर प्रकल्प पातळीवरही समिती नेमायची आहे. ही समिती अनुदानित आश्रमशाळा, एकलव्य निवासी शाळांची पालक संस्था म्हणून काम करेल. गावांचा योग्य संख्येने समूह निर्माण करून तो एका पालक संस्थेशी जोडण्याची जबाबदारी या समितीवर राहील. शाळेतील उपलब्ध शिक्षक आणि कोरोना संक्रमणाच्या धोक्याच्या पातळीवर किती शिक्षणमित्र नेमावे लागतील, हे निश्चित करणे, स्वाध्याय व इतर क्रमिक साहित्याची प्रकल्पस्तरावर छपाई, ते विद्यार्थी पालकांना पोहोचविणे, दर आठवड्याला मुख्याध्यापकांकडून आढावा घेणे, दृकश्राव्य साहित्य मानांकन करून घेणे, पोषण आहार पुरविणे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घेणे आदींची जबाबदारी आहे, तर आश्रमशाळास्तरावरील समिती प्रत्यक्ष अंमलबजावणी समिती राहील. ही समिती शाळा पुन्हा सुरू होईपर्यंत या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी वाहणार आहे. शिक्षण सेतू सुरू असेपर्यंत १ ते ४ या वर्गातील विद्यार्थी नजीकच्या जि.प. शाळेत समायोजित केले जातील. त्याची खात्री समितीने करायची आहे. संक्रमण धोका असलेल्या गावांसाठीच शिक्षणमित्र नेमला जाईल. पुस्तके व साहित्य पोहोचवणे, वेळापत्रकानुसार काम करणे, ग्रामपातळीवर खातरजमा करून स्पष्ट नोंद ठेवणे, पालक समिती, ग्रामपंचायत सदस्यांच्या स्वाक्षरीसह साहित्य वाटप करणे आदी बाबींची जबाबदारी दिली.

२८ मे ते १५ जूनपर्यंत या सर्व बाबींचे नियोजन झाल्यानंतर १५ जून ते १५ ऑगस्टदरम्यान हे अभियान सुरू राहील. त्यानंतर कोरोना परिस्थितीनुरुप त्यात बदल करण्याचा अधिकार आयुक्त, नाशिक यांना दिला आहे.