शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
2
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
3
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
4
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
5
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
6
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
7
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
8
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
9
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
10
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
11
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
12
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
13
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
14
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
15
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
16
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
17
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
18
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
19
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
20
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
Daily Top 2Weekly Top 5

शशिकांत वडकुते राज्य उपाध्यक्षपदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:28 IST

बांधकाम साहित्य रस्त्यावर हिंगोली : शहरात अनेक भागात बांधकामे सुरू आहेत. बांधकामे करताना बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकले जात आहे. ...

बांधकाम साहित्य रस्त्यावर

हिंगोली : शहरात अनेक भागात बांधकामे सुरू आहेत. बांधकामे करताना बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकले जात आहे. बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकल्यानंतर काही नागरिक अनेक दिवस बांधकाम सुरू करीत नाहीत. त्यामुळे बांधकाम साहित्य तसेच रस्त्यावर पडून राहत आहे. यावरून दुचाकी वाहन गेल्यास वाहने घसरून पडण्याचे प्रकार घडत आहेत. याकडे लक्ष देऊन बांधकाम साहित्य रस्त्यावर अनेक दिवस ठेवणाऱ्या नागरिकांवर कारावाई करावी, अशी मागणी होत आहे.

शहरातून धावताहेत जड वाहने

हिंगोली : नांदेड व अकोलाकडून येणाऱ्या वाहनांना जाण्यासाठी शहराच्या बाहेरून वळण रस्ता काढून दिला आहे. शहरातून जाणाऱ्या रस्त्यावरील जड वाहनांची वर्दळ कमी व्हावी, हा उद्देश त्यामागे होता. मात्र काही दिवसांपासून जड साहित्याची वाहतूक करणारी वाहने शहरातून जाणाऱ्या मार्गावरून धावत आहेत. या मार्गावर अगोदरच वाहनांची वर्दळ असते. त्यात जड वाहने धावत असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. जड वाहनांना वळण रस्त्यावने काढून द्यावे, अशी मागणी होत आहे.

रेल्वेस्थानक निर्मनुष्य

हिंगोली: येथून अकोला व पूर्णा मार्गावर रेल्वे धावतात. सध्या कोरोनामुळे रेल्वेगाड्यांची संख्या कमी झाली असली तरी प्रवाशांची वर्दळही कमी झाली आहे. केवळ लांब पल्ल्याच्या रेल्वे धावत आहेत. त्यात प्रवासी रिझर्वेशन करीत असल्याने रेल्वे येण्याच्या अगोदर काही मिनिटे येत आहेत. त्यामुळे रेल्वेस्थानक सामसूम दिसून येत आहे. शनिवारी रेल्वे कर्मचाऱ्याशिवाय इतर प्रवासी दिसून आले नाहीत.

क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक

हिंगोली: शहरातून नांदेड, परभणी, वाशिम आदी मार्गावर खासगी प्रवासी वाहने धावतात. एसटी बस प्रवाशांसाठी कमी पडत असल्याने प्रवाशांचा ओढा खासगी प्रवासी वाहनांकडे आहे. मात्र खासगी वाहनचालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवित आहेत. यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

हायमास्ट दिवे बसविण्याची मागणी

हिंगोली : शहरातील मुख्य मार्गावर काही ठिकाणी हायमास्ट बसविण्यात आले आहेत. मात्र जुन्या नागरी वस्तीतील काही भागात अद्यापही हायमास्ट दिवे बसविण्यात आले नाहीत. त्यामुळे या भागातील नागरिकांना सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे. रात्रीच्या वेळी चालताना रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे या भागातही सुविधा द्याव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.