शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

सात उमेदवार अंडरग्रॅज्युएट; चार पदव्युत्तर शिकलेले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 00:08 IST

लोकसभा निवडणुकांसाठी हिंगोली मतदारसंघातून उभे असलेल्यांमध्ये उच्चशिक्षित उमेदवारांचा टक्का कमी असल्याचे चित्र आहे. २८ उमेदवारांपैकी १७ उमेदवारांचे शिक्षण पदवीपर्यंतदेखील झालेले नाही. तर ४ जणच पदव्युत्तर पदवीधारक आहेत.

दयाशील इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : लोकसभा निवडणुकांसाठी हिंगोली मतदारसंघातून उभे असलेल्यांमध्ये उच्चशिक्षित उमेदवारांचा टक्का कमी असल्याचे चित्र आहे. २८ उमेदवारांपैकी १७ उमेदवारांचे शिक्षण पदवीपर्यंतदेखील झालेले नाही. तर ४ जणच पदव्युत्तर पदवीधारक आहेत. राजकारणातील उच्चशिक्षितांचा टक्का वाढावा, अशी अपेक्षा विविध पक्षांमधील नेते अनेकदा व्यक्त करताना दिसून येतात. राजकीय पक्षांकडून तर हव्या त्या संख्येत उच्चशिक्षित उभे नाहीच. मात्र लोकशाही मजबूत करण्यासाठी अपक्ष म्हणून उभे राहिलेल्यांमध्येदेखील दहावीपेक्षाही कमी शिक्षण घेतलेल्यांचेच प्रमाण अधिक आहे.निवडणूक आयोगातर्फे उमेदवारांच्या शिक्षणाचा तपशील शपथपत्रांद्वारे उपलब्ध करून देण्यात आला आहे. ‘लोकमत’ने उपलब्ध शपथपत्रांची विस्तृत पाहणी केली असता वरील बाब समोर आली आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघात एकूण २८ उमेदवार रिंगणात आहेत. यातील ७ उमेदवार हे पदवीधर आहेत. तर चार उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले आहे.उच्चशिक्षितांकडून पुढाकारच नाहीउच्चशिक्षितांनी राजकारणात आले पाहिजे असा एक मोठा मतप्रवाह आहे. लोकशाहीत अपक्ष म्हणून आपले आव्हान उभे करण्यात पदवीधरांमध्ये उदासीनताच दिसून येत आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात एकूण १७ उमेदवार अपक्ष म्हणून उभे आहेत. यातील अवघे ४ उमेदवार पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण झालेले आहेत. दोन उमेदवार बारावी दोन दहावी उत्तीर्णच आहेत. राजकीय पक्षांपैकीही ११ पैकी पाच उमेदवार पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेले उमेदवार आहेत.कला शाखेचे सर्वाधिक पदवीधरएकूण पदवीधर उमेदवारांमध्ये कला व विज्ञान विषयांतील सर्वाधिक पदवीधर आहेत. एकूण पदवीधरांच्या तुलनेत १७.८ टक्के उमेदवार हे कला पदवीधर तर १४.२८ टक्के उमेदवार हे विज्ञान विषयांतील पदवीधर आहेत. रिंगणात असलेल्या एकूण उमेदवारांच्या तुलनेत हे प्रमाण अवघे ३२.१४ टक्के इतके आहे.्रमतदार देतात का राजकीय नेत्याच्या शिक्षणावर भर ?... तरच उमेदवार सर्वांगीण विकास करेलउच्चशिक्षित असलेला उमेदवार विकास कामे करताना कोणत्याही अडचणी येत नाहीत. तो विरोधकांना सडेतोड उत्तर देऊ शकतो. नेमकी कोणती विकास कामे करायची, याची जाण सुशिक्षित उमेदवाराला असते. -प्रकाश नेतनेसुशिक्षित उमेदवाराला दूरदृष्टी असतेलोकसभेत प्रतिनिधीत्व करणारा उमेदवार हा सुजाण आणि सुशिक्षित असावा. कारण सुशिक्षित उमेदवार लोकसभेत विविध प्रश्न व्यवस्थित मांडू शकतो. शिवाय सुशिक्षित उमेदवारास दूरदृष्टी असते. नेमकी कुठली विकास कामे करावीत, याची जाण त्याला असते. - अरूण जाधवविकास कामांना अधिक महत्त्व आहेसुशिक्षित उमेदवारच विकास कामे करू शकतो, हा भ्रम आहे. काही वर्षापुर्वीचा निवडणुकीचा इतिहास जर पाहिला तर त्यावेळी असलेल्या उमेदवारांचे शिक्षण काहीच नसल्याचे दिसून येईल. परंतु त्यांनी विकास कामे केली आहेत. त्यामुळे शिक्षित उमेदवारच विकास करतो असे नाही.- हरिश कीर्तीवार

टॅग्स :hingoli-pcहिंगोलीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक