शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

सात उमेदवार अंडरग्रॅज्युएट; चार पदव्युत्तर शिकलेले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 00:08 IST

लोकसभा निवडणुकांसाठी हिंगोली मतदारसंघातून उभे असलेल्यांमध्ये उच्चशिक्षित उमेदवारांचा टक्का कमी असल्याचे चित्र आहे. २८ उमेदवारांपैकी १७ उमेदवारांचे शिक्षण पदवीपर्यंतदेखील झालेले नाही. तर ४ जणच पदव्युत्तर पदवीधारक आहेत.

दयाशील इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : लोकसभा निवडणुकांसाठी हिंगोली मतदारसंघातून उभे असलेल्यांमध्ये उच्चशिक्षित उमेदवारांचा टक्का कमी असल्याचे चित्र आहे. २८ उमेदवारांपैकी १७ उमेदवारांचे शिक्षण पदवीपर्यंतदेखील झालेले नाही. तर ४ जणच पदव्युत्तर पदवीधारक आहेत. राजकारणातील उच्चशिक्षितांचा टक्का वाढावा, अशी अपेक्षा विविध पक्षांमधील नेते अनेकदा व्यक्त करताना दिसून येतात. राजकीय पक्षांकडून तर हव्या त्या संख्येत उच्चशिक्षित उभे नाहीच. मात्र लोकशाही मजबूत करण्यासाठी अपक्ष म्हणून उभे राहिलेल्यांमध्येदेखील दहावीपेक्षाही कमी शिक्षण घेतलेल्यांचेच प्रमाण अधिक आहे.निवडणूक आयोगातर्फे उमेदवारांच्या शिक्षणाचा तपशील शपथपत्रांद्वारे उपलब्ध करून देण्यात आला आहे. ‘लोकमत’ने उपलब्ध शपथपत्रांची विस्तृत पाहणी केली असता वरील बाब समोर आली आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघात एकूण २८ उमेदवार रिंगणात आहेत. यातील ७ उमेदवार हे पदवीधर आहेत. तर चार उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले आहे.उच्चशिक्षितांकडून पुढाकारच नाहीउच्चशिक्षितांनी राजकारणात आले पाहिजे असा एक मोठा मतप्रवाह आहे. लोकशाहीत अपक्ष म्हणून आपले आव्हान उभे करण्यात पदवीधरांमध्ये उदासीनताच दिसून येत आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात एकूण १७ उमेदवार अपक्ष म्हणून उभे आहेत. यातील अवघे ४ उमेदवार पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण झालेले आहेत. दोन उमेदवार बारावी दोन दहावी उत्तीर्णच आहेत. राजकीय पक्षांपैकीही ११ पैकी पाच उमेदवार पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेले उमेदवार आहेत.कला शाखेचे सर्वाधिक पदवीधरएकूण पदवीधर उमेदवारांमध्ये कला व विज्ञान विषयांतील सर्वाधिक पदवीधर आहेत. एकूण पदवीधरांच्या तुलनेत १७.८ टक्के उमेदवार हे कला पदवीधर तर १४.२८ टक्के उमेदवार हे विज्ञान विषयांतील पदवीधर आहेत. रिंगणात असलेल्या एकूण उमेदवारांच्या तुलनेत हे प्रमाण अवघे ३२.१४ टक्के इतके आहे.्रमतदार देतात का राजकीय नेत्याच्या शिक्षणावर भर ?... तरच उमेदवार सर्वांगीण विकास करेलउच्चशिक्षित असलेला उमेदवार विकास कामे करताना कोणत्याही अडचणी येत नाहीत. तो विरोधकांना सडेतोड उत्तर देऊ शकतो. नेमकी कोणती विकास कामे करायची, याची जाण सुशिक्षित उमेदवाराला असते. -प्रकाश नेतनेसुशिक्षित उमेदवाराला दूरदृष्टी असतेलोकसभेत प्रतिनिधीत्व करणारा उमेदवार हा सुजाण आणि सुशिक्षित असावा. कारण सुशिक्षित उमेदवार लोकसभेत विविध प्रश्न व्यवस्थित मांडू शकतो. शिवाय सुशिक्षित उमेदवारास दूरदृष्टी असते. नेमकी कुठली विकास कामे करावीत, याची जाण त्याला असते. - अरूण जाधवविकास कामांना अधिक महत्त्व आहेसुशिक्षित उमेदवारच विकास कामे करू शकतो, हा भ्रम आहे. काही वर्षापुर्वीचा निवडणुकीचा इतिहास जर पाहिला तर त्यावेळी असलेल्या उमेदवारांचे शिक्षण काहीच नसल्याचे दिसून येईल. परंतु त्यांनी विकास कामे केली आहेत. त्यामुळे शिक्षित उमेदवारच विकास करतो असे नाही.- हरिश कीर्तीवार

टॅग्स :hingoli-pcहिंगोलीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक