शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

खुल्यावर मांस विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:31 IST

शहरात जागोजागी कचऱ्याचे ढिगारे हिंगोली : शहरातील गांधी चौक परिसर, अण्णाभाऊ साठे पुतळा, तलाबकट्ट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर कचरा ...

शहरात जागोजागी कचऱ्याचे ढिगारे

हिंगोली : शहरातील गांधी चौक परिसर, अण्णाभाऊ साठे पुतळा, तलाबकट्ट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर कचरा साठला आहे. याठिकाणी प्लास्टिकसह अनेक हानिकारक वस्तू कचऱ्यात असून याचे सेवन शहरातील मोकाट जनावरे करीत आहे. यामुळे अनेक गायी दगावल्या जात असल्याचे दिसत आहे.

गावातील पथदिवे सुरू करण्याची मागणी

बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा, पिंपरखेड गावातील पथदिवे बंद आहेत. गावातील पथदिवे सुरू करण्यात यावेत अशी मागणी वारंवार गावकऱ्यांतून करण्यात येत आहे. पण या मागणीकडे संबंधीतांनी लक्ष देण्यास दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे तब्बल सहा महिन्यांपासून गाव अंधारात राहत आहे. यासाठी गावातील पथदिवे सुरू करावे अशी मागणी होत आहे.

पोस्ट ऑफीस - रेल्वे स्टेशन रस्त्यावर पोलीस गस्तीची मागणी

हिंगोली : शहरातील पोस्ट ऑफीस रोड - रेल्वे स्टेशन रोडवर रात्रीच्या अनेक टवाळखोर आपल्या दुचाकीचा आवाज करुन नागरिकांना त्रास देत आहे. विशेष म्हणजे या रस्त्यावर अनेक रुग्णालय असून टवाळखोरांच्या या प्रकारामुळे रुग्णांचे मोठे हाल होत आहे. यासाठी रात्री विनाकारण नागरिकांना त्रास देणाऱ्या या टवाळखोरांवर पोलिसांनी लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

हरभरा काढणीला आला वेग

कळमनुरी : तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात शेतकरी व शेतमजुर शेतशिवारात हरभराचे पिक काढणीस लागला आहे. या शेतीकामाने आता वेग धरला असून काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी उतार येत असल्याचे शेतकऱ्यांतून बोलले जात आहे.

वाळू घाटांचा लिलाव करण्याची मागणी

औंढा नागनाथ : तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना घरकूल मंजूर झालेले आहेत. पण नागरिकांना वाळू उपलब्ध होत नसल्याने अनेक घरकूलधारकांचे घराचे स्वप्न अपूरे राहत आहे. सध्या लपून छपून वाळू मिळत असून या वाळूचा भाव गगनचुंबी असल्याने हा भाव सर्वसामान्यांना परवडेनासा आहे. यामुळे वाळू घाटांचा लिलाव व्हावा अशी मागणी घरकूल धारकांतून होत आहे.

पुलाचे काम जलदगतीने करण्याची मागणी

बासंबा : गावातील शेतशिवाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पूलाचे काम सुरू आहे. या पुलाचे काम मागील वर्षभरापासून होत आहे. हे बांधकाम कासवगतीने होत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना शेतात जाताना या बांधकामामुळे अडथळा निर्माण होत आहे. तसेच शेतीपयोगी साहीत्य घेवून जाताना शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी या पुलाचे काम जलदगतीने व्हावे अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

गतीरोधक बसविण्याची मागणी

हिंगोली : शहरातील आदर्श कॉलेजवळ नवीन सिमेंट रस्त्याचे काम करण्यात आले आहे. या रस्ता नवा असल्यामुळे अनेक वाहने या रस्त्यांवरुन भरधाव वेगाने धावत आहेत. या रस्त्याकाठी अनेक नागरिक राहत असून त्यांना रस्त्यावरुन ये जा करणे अवघड बनले आहे. यासाठी या रसत्यावर गतीरोधक बनवावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

बेशिस्त वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा

औंढा नागनाथ : शहरातील श्री नागनाथाच्या मंदिर परिरसरात मुख्य बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत अनेक दुचाकीस्वार आपले वाहन रस्त्यात लावत आहे. यामुळे देवस्थानकडे व बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांना ये - जा करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे. यासाठी अशा बेशिस्त वाहनांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

रस्त्यातील खड्डे बुजविण्याची मागणी

रामेश्वर तांडा : कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर - वारंगा फाटा गावादरम्यान असणाऱ्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. या खड्डयामुळे वाहनधारकांसह खाजगी वाहनाने प्रवास करणाऱ्या नागरिकांची मोठी परेशानी होत आहे. अनेकदा रुग्णांना या रस्त्यावरुन नेताना मोठा त्रास होत असल्याने या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.