शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

खुल्यावर मांस विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:31 IST

शहरात जागोजागी कचऱ्याचे ढिगारे हिंगोली : शहरातील गांधी चौक परिसर, अण्णाभाऊ साठे पुतळा, तलाबकट्ट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर कचरा ...

शहरात जागोजागी कचऱ्याचे ढिगारे

हिंगोली : शहरातील गांधी चौक परिसर, अण्णाभाऊ साठे पुतळा, तलाबकट्ट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर कचरा साठला आहे. याठिकाणी प्लास्टिकसह अनेक हानिकारक वस्तू कचऱ्यात असून याचे सेवन शहरातील मोकाट जनावरे करीत आहे. यामुळे अनेक गायी दगावल्या जात असल्याचे दिसत आहे.

गावातील पथदिवे सुरू करण्याची मागणी

बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा, पिंपरखेड गावातील पथदिवे बंद आहेत. गावातील पथदिवे सुरू करण्यात यावेत अशी मागणी वारंवार गावकऱ्यांतून करण्यात येत आहे. पण या मागणीकडे संबंधीतांनी लक्ष देण्यास दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे तब्बल सहा महिन्यांपासून गाव अंधारात राहत आहे. यासाठी गावातील पथदिवे सुरू करावे अशी मागणी होत आहे.

पोस्ट ऑफीस - रेल्वे स्टेशन रस्त्यावर पोलीस गस्तीची मागणी

हिंगोली : शहरातील पोस्ट ऑफीस रोड - रेल्वे स्टेशन रोडवर रात्रीच्या अनेक टवाळखोर आपल्या दुचाकीचा आवाज करुन नागरिकांना त्रास देत आहे. विशेष म्हणजे या रस्त्यावर अनेक रुग्णालय असून टवाळखोरांच्या या प्रकारामुळे रुग्णांचे मोठे हाल होत आहे. यासाठी रात्री विनाकारण नागरिकांना त्रास देणाऱ्या या टवाळखोरांवर पोलिसांनी लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

हरभरा काढणीला आला वेग

कळमनुरी : तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात शेतकरी व शेतमजुर शेतशिवारात हरभराचे पिक काढणीस लागला आहे. या शेतीकामाने आता वेग धरला असून काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी उतार येत असल्याचे शेतकऱ्यांतून बोलले जात आहे.

वाळू घाटांचा लिलाव करण्याची मागणी

औंढा नागनाथ : तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना घरकूल मंजूर झालेले आहेत. पण नागरिकांना वाळू उपलब्ध होत नसल्याने अनेक घरकूलधारकांचे घराचे स्वप्न अपूरे राहत आहे. सध्या लपून छपून वाळू मिळत असून या वाळूचा भाव गगनचुंबी असल्याने हा भाव सर्वसामान्यांना परवडेनासा आहे. यामुळे वाळू घाटांचा लिलाव व्हावा अशी मागणी घरकूल धारकांतून होत आहे.

पुलाचे काम जलदगतीने करण्याची मागणी

बासंबा : गावातील शेतशिवाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पूलाचे काम सुरू आहे. या पुलाचे काम मागील वर्षभरापासून होत आहे. हे बांधकाम कासवगतीने होत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना शेतात जाताना या बांधकामामुळे अडथळा निर्माण होत आहे. तसेच शेतीपयोगी साहीत्य घेवून जाताना शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी या पुलाचे काम जलदगतीने व्हावे अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

गतीरोधक बसविण्याची मागणी

हिंगोली : शहरातील आदर्श कॉलेजवळ नवीन सिमेंट रस्त्याचे काम करण्यात आले आहे. या रस्ता नवा असल्यामुळे अनेक वाहने या रस्त्यांवरुन भरधाव वेगाने धावत आहेत. या रस्त्याकाठी अनेक नागरिक राहत असून त्यांना रस्त्यावरुन ये जा करणे अवघड बनले आहे. यासाठी या रसत्यावर गतीरोधक बनवावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

बेशिस्त वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा

औंढा नागनाथ : शहरातील श्री नागनाथाच्या मंदिर परिरसरात मुख्य बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत अनेक दुचाकीस्वार आपले वाहन रस्त्यात लावत आहे. यामुळे देवस्थानकडे व बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांना ये - जा करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे. यासाठी अशा बेशिस्त वाहनांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

रस्त्यातील खड्डे बुजविण्याची मागणी

रामेश्वर तांडा : कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर - वारंगा फाटा गावादरम्यान असणाऱ्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. या खड्डयामुळे वाहनधारकांसह खाजगी वाहनाने प्रवास करणाऱ्या नागरिकांची मोठी परेशानी होत आहे. अनेकदा रुग्णांना या रस्त्यावरुन नेताना मोठा त्रास होत असल्याने या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.