शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

धावत्या वाहनातील गौण खनिज ठरतेय धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:26 IST

कालबाह्य वाहने रस्त्यावर हिंगोली : उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जुन्या वाहनांची स्थिती लक्षात घेऊन अशा वाहनांना चालविण्यासाठी परवाना देतात. मात्र, ...

कालबाह्य वाहने रस्त्यावर

हिंगोली : उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जुन्या वाहनांची स्थिती लक्षात घेऊन अशा वाहनांना चालविण्यासाठी परवाना देतात. मात्र, जिल्ह्यात अनेक कालबाह्य झालेली वाहने रस्त्यावरून धावताना दिसत आहेत. यात दुचाकीची संख्या अधिक दिसून येत आहे. रस्त्यांची स्थिती अत्यंत वाईट असल्याने रस्त्यावरील खड्ड्यात वाहने आदळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कालबाह्य झालेल्या वाहनांचा शोध घेऊन चालविण्यास प्रतिबंध करावा, अशी मागणी होत आहे.

कापसाच्या झाल्या पऱ्हाट्या

हिंगोली : जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून कापसाची लागवड केली होती. आता जवळपास कापूस वेचणी संपत आली आहे. तसेच लाल्या रोगाने कापूस पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आता कापूस उपटून टाकत आहेत. आणखी दोन ते तीन महिन्यात येणारे पीक घेण्याच्या तयारीत शेतकरी असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे मजुरांच्या सहाय्याने कापूस उपटून टाकत असल्याचे चित्र आहे.

तुषार सिंचनला शेतकऱ्यांचे प्राधान्य

हिंगोली : जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे तलाव, विहिरींना मुबलक पाणी असल्याचे शेतकरी सांगत आहेत. आता शेतकरी पिकांना पाणी देताना दिसत आहेत. तसेच उपलब्ध पाण्याचा योग्य वापर व्हावा, तसेच वर्षातून किमान दोन पिके घेता यावीत, यासाठी शेतकरी तुषार सिंचन पद्धतीला प्राधान्य देत आहेत. यातून पाण्याची बचत करण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत.

येहळेगाव तु. मार्गे हदगाव बस सुरू करा

हिंंगोली : हिंगोली येथून हदगाव जाण्यासाठी थेट एकही बस उपलब्ध नाही. हिंगोली येथून येहळेगाव तु. येथील देवस्थानाच्या दर्शनासाठी शेकडो भाविक जातात. मात्र, थेट बस उपलब्ध नसल्याने त्यांना कामठा फाटा येथे उतरून दुसऱ्या वाहनाने जावे लागत आहे. यात भाविकांचा वेळ जात आहे. तसेच हदगाव येथे जाण्यासाठी एकही बस नाही. त्यामुळे हिंगोली आगारातून हदगाव येथे जाण्यासाठी एस. टी. बस सुरू करावी, अशी मागणी भाविकांतून होत आहे.

फांद्या ठरताहेत धोकादायक

कळमनुरी : कळमनुरी तालुक्यातील आराटी फाटा ते घोळवा या मार्गाच्या दुतर्फा बाजूंनी अनेक ठिकाणी काटेरी झुडपे वाढली असून फांद्या रस्त्यालगत येत आहेत. यामुळे मोठ्या वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष देऊन या मार्गावर आलेल्या काटेरी फांद्या तोडून रस्ता सुरक्षित करून द्यावा, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.

रस्त्यालगत कचऱ्याचे ढिगारे

आखाडा बाळापूर : येथील कळमनुरी ते वारंगा फाटा या मार्गाकडे जाणाऱ्या दोन्ही बाजूंनी कचऱ्याचे ढिगारे टाकले जात आहेत. यामुळे दुर्गंधी सुटत असून, याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. कचऱ्यासाठी डंपिंग ग्राऊड तयार करावे, तसेच शहरात स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.

गतिरोधक बसविण्याची मागणी

हिंगोली : शहरातील बसस्थानक परिसरातून वाहनांची मोठी वर्दळ असते. तसेच प्रवेशद्वारासमोरच वाहनांचा गराडा असतो. त्यात येथूनच विद्यार्थ्यांची ये-जा असते. भरधाव वाहने धावत असल्याने या ठिकाणी दोन्ही बाजूंनी गतिरोधक बसवावेत, अशी मागणी प्रवासी व नागरिकांतून केली जात आहे.