शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

कारवाईचा दुसरा दिवसही निरंकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 01:11 IST

राज्यसरकार प्लास्टिक बंदीसाठी सरसावले असून, आता प्लास्टिक वापरणाऱ्यावर कारवाई करण्याची जबाबदारीच थेट पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी महानगर पालिका, नगर पालिकांचे प्रशासन, जिल्हाधिकारी, तहसील, ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक यांच्यावर सोपवली आहे. मात्र हे सर्व आदेशित केलेले असले तरीही सलग दोन दिवस सुट्या आल्याने कारवाईच करता आली नाही. सोमवार पासून मात्र पथके शहरभर फिरुन कारवाईचा बडगा उगारणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राज्यसरकार प्लास्टिक बंदीसाठी सरसावले असून, आता प्लास्टिक वापरणाऱ्यावर कारवाई करण्याची जबाबदारीच थेट पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी महानगर पालिका, नगर पालिकांचे प्रशासन, जिल्हाधिकारी, तहसील, ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक यांच्यावर सोपवली आहे. मात्र हे सर्व आदेशित केलेले असले तरीही सलग दोन दिवस सुट्या आल्याने कारवाईच करता आली नाही. सोमवार पासून मात्र पथके शहरभर फिरुन कारवाईचा बडगा उगारणार आहेत.जिल्ह्यात प्लास्टिकवर लागू करण्यात आलेल्या बंदीची जनजागृती करणे सुरु आहे. त्यातच २३ आणि २४ जून रोजी सलग सुट्या आल्याने, मात्र पालिका, नगर पंचायत, ग्रामपंचायतच्यावतीने कारवाईचा बगडाच उगरता आला नाही. त्यातच दोन दिवस जोरदार झालेल्या पावसामुळे बºयाच गावासह शहरात पाणी शिरले त्यामुळे नगर पालिका व नगर पंचायतीसह ग्रामपंचायतीचे कर्मचारी यामध्येच गर्क होते. तर रविवारी पाऊस नसला तरीही सुटी असल्याने प्लास्टिक वापरणाºयावर कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे दोन दिवस प्लास्टिक वापरणाºयांना मात्र दिलासा मिळाला. तर रविवारी अनेक विवाह प्रसंगातही प्लास्टिक ग्लास, थर्माकॉलच्या द्रोणाचा सर्रास वापर होत असल्याचे दिसून येत होते. त्याच बरोबर राज्यसरकारने ज्या- ज्या प्लास्टिकवर बंदी घातली आहे. त्याचाह सर्वत्र वापर होत असल्याचे दिसून येत होते.वसमत, सेनगाव, हिंगोली, औंढा ना., कळमनुरी या पाचही ठिकाणी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती. संबंधित अधिकाºयांशी संपर्क साधला असता, सोमवारपासून मात्र प्लास्टिक वापरणाºयावर राज्य सरकारने ठरवून दिल्याप्रमाणे दंड आकारण्यात येणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र प्लास्टिक बंदीने शहरात शहरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.शहरातील विविध भागात पालिकेचे पथके फिरुन प्लास्टिकचा वापर होतो की नाही, याची पाहणी करणार आहेत. दरम्यान प्लास्टिकचा वापर होत असल्याचे आढळून आल्यास संबंधिताला ५ हजार रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे पालिकेतर्फे सांगितले. शहरात दोन पथके कार्यरत आहेत.अजूनही अनेकांकडे मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा साठा आहे. वास्तविक पाहता हिंगोली पालिकेने आठ दिवसांपुर्वी कारवाई करुन ७ क्विंटल प्लास्टिक जप्त केले होते. मात्र अजूनही अनेक जण लपूनछपून वापर करीत आहेत.प्लास्टिकचा वापर थांबविण्यासंदर्भात अनेकदा जनजागृती केली आहे. एवढे करुनही प्लास्टिक आढळून आल्यावर संबंधिताकडून दंड वसूल करणार असल्याचे सीओ रामदास पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :HingoliहिंगोलीGovernmentसरकार