शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होणार; मुलांना शाळेत पाठवण्यास धाकधूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:27 IST

हिंगोली जिल्ह्यात सध्या नववी ते बारावीचे वर्ग सुरू आहेत. त्यासाठी आधी सर्व शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यात ...

हिंगोली जिल्ह्यात सध्या नववी ते बारावीचे वर्ग सुरू आहेत. त्यासाठी आधी सर्व शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यात जवळपास ८५ शिक्षकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर पुन्हा नर्सी येथे शाळा सुरू झाल्यावर एक शिक्षक बाधित आढळला होता. त्यानंतर सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांची तपासणी केली. नववी ते बारावीचे विद्यार्थी जास्त समजदार असतात. त्यामुळे पालकांमध्ये तेवढी चिंता नव्हती. मात्र आता पाचवीपासूनच्या मुलांच्या शाळा सुरू होणार असल्याने अनेकांना धाकधूक लागली आहे, तर काही मात्र शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करीत असून, यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे सांगत आहेत. याबाबत शिक्षण विभागानेही आदेश काढण्याची तयारी सुरू केली असून, सर्व शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करून घेण्यास सांगण्यात आले आहे. जवळपास २,८०० शिक्षक लागणार आहेत. यापूर्वीच जिल्ह्यात शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती आहे.

नववी ते बारावीची उपस्थिती किती ?

हिंगोली जिल्ह्यात नववी ते बारावीची उपस्थिती पालकांच्या संमतीवर अवलंबून होती. अनेक पालकांनी शाळा सुरू करताना संमती दर्शविली असली तरीही नंतर मुलांना शाळेत पाठविले नाही. अजूनही कोरोनाची भीती मनातून गेली नाही. त्यामुळे पालक मुलांना शाळेत पाठवित नसल्याचे दिसत आहे. हिंगोली जिल्ह्यात आठ ते दहा हजार विद्यार्थीच शाळेत हजर राहत आहेत. त्यामुळे ही उपस्थिती वाढत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्यातील उपस्थिती सर्वांत कमी असल्याची नोंद आढळून आली आहे. त्यात आता नवीन वर्ग सुरू होत आहेत.

हिंगोली जिल्ह्यात नववी ते बारावीची उपस्थिती पालकांच्या संमतीवर अवलंबून होती. अनेक पालकांनी शाळा सुरू करताना संमती दर्शविली असली तरीही नंतर मुलांना शाळेत पाठविले नाही. अजूनही कोरोनाची भीती मनातून गेली नाही. त्यामुळे पालक मुलांना शाळेत पाठवित नसल्याचे दिसत आहे. हिंगोली जिल्ह्यात आठ ते दहा हजार विद्यार्थीच शाळेत हजर राहत आहेत. त्यामुळे ही उपस्थिती वाढत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्यातील उपस्थिती सर्वांत कमी असल्याची नोंद आढळून आली आहे. त्यात आता नवीन वर्ग सुरू होत आहेत.