शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होणार; मुलांना शाळेत पाठवण्यास धाकधूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:27 IST

हिंगोली जिल्ह्यात सध्या नववी ते बारावीचे वर्ग सुरू आहेत. त्यासाठी आधी सर्व शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यात ...

हिंगोली जिल्ह्यात सध्या नववी ते बारावीचे वर्ग सुरू आहेत. त्यासाठी आधी सर्व शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यात जवळपास ८५ शिक्षकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर पुन्हा नर्सी येथे शाळा सुरू झाल्यावर एक शिक्षक बाधित आढळला होता. त्यानंतर सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांची तपासणी केली. नववी ते बारावीचे विद्यार्थी जास्त समजदार असतात. त्यामुळे पालकांमध्ये तेवढी चिंता नव्हती. मात्र आता पाचवीपासूनच्या मुलांच्या शाळा सुरू होणार असल्याने अनेकांना धाकधूक लागली आहे, तर काही मात्र शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करीत असून, यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे सांगत आहेत. याबाबत शिक्षण विभागानेही आदेश काढण्याची तयारी सुरू केली असून, सर्व शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करून घेण्यास सांगण्यात आले आहे. जवळपास २,८०० शिक्षक लागणार आहेत. यापूर्वीच जिल्ह्यात शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती आहे.

नववी ते बारावीची उपस्थिती किती ?

हिंगोली जिल्ह्यात नववी ते बारावीची उपस्थिती पालकांच्या संमतीवर अवलंबून होती. अनेक पालकांनी शाळा सुरू करताना संमती दर्शविली असली तरीही नंतर मुलांना शाळेत पाठविले नाही. अजूनही कोरोनाची भीती मनातून गेली नाही. त्यामुळे पालक मुलांना शाळेत पाठवित नसल्याचे दिसत आहे. हिंगोली जिल्ह्यात आठ ते दहा हजार विद्यार्थीच शाळेत हजर राहत आहेत. त्यामुळे ही उपस्थिती वाढत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्यातील उपस्थिती सर्वांत कमी असल्याची नोंद आढळून आली आहे. त्यात आता नवीन वर्ग सुरू होत आहेत.

हिंगोली जिल्ह्यात नववी ते बारावीची उपस्थिती पालकांच्या संमतीवर अवलंबून होती. अनेक पालकांनी शाळा सुरू करताना संमती दर्शविली असली तरीही नंतर मुलांना शाळेत पाठविले नाही. अजूनही कोरोनाची भीती मनातून गेली नाही. त्यामुळे पालक मुलांना शाळेत पाठवित नसल्याचे दिसत आहे. हिंगोली जिल्ह्यात आठ ते दहा हजार विद्यार्थीच शाळेत हजर राहत आहेत. त्यामुळे ही उपस्थिती वाढत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्यातील उपस्थिती सर्वांत कमी असल्याची नोंद आढळून आली आहे. त्यात आता नवीन वर्ग सुरू होत आहेत.