शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

लांब पल्ल्यांच्या एस. टी.बसेस सुसाट; मुक्कामी गाड्या कधी सुरू होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:03 IST

हिंगोली: सध्या सणासुदीचे दिवस असून, ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे; परंतु बसेस सुरू करण्याबाबत शासनाचा आदेश ...

हिंगोली: सध्या सणासुदीचे दिवस असून, ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे; परंतु बसेस सुरू करण्याबाबत शासनाचा आदेश आला नसल्यामुळे मुक्कामी व इतर बसेस सुरू करता येणार नाहीत, असे एस.टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

महालक्ष्मी, पोळा यांसारखे मोठे सण तोंडावर आले आहेत. शेतकरीवर्ग पोळा सणाच्या तयारीला लागला आहे. बैलांसाठी झुली, घागरमाळा, गोंडे व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी शहराच्या ठिकाणी येत आहेत; परंतु मुक्कामी बसेस सुरू नसल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची तारांबळ उडत आहे. नाइलाजाने दामदुप्पट पैसे देऊन अवैध वाहतुकीने प्रवास करण्याची वेळ येवून ठेपली आहे. अनेक वेळा प्रवाशांनी ग्रामीण भागातील बसेस सुरू करण्यासाठी मागणीही केली आहे.

ग्रामीण भागात जाणाऱ्या गाड्यांतही जागा मिळेना...

कोरोना महामारी कमी झाल्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत तरी गर्दी नसते; परंतु दुपारी एक वाजेनंतर मात्र एस. टी. बसेसला गर्दी वाढू लागली आहे. या दरम्यान, प्रवाशांना सामाजिक अंतर व मास्कबाबत सूचना दिली जात असल्याचे एस. टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

लांब पल्ल्यांच्या गाड्या फुल्ल...

मागच्या दोन महिन्यांपासून सोलापूर, कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद, अकोला, नांदेड, परभणी, बीड, लातूर आदी ठिकाणच्या बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. लांब पल्ल्यांच्या बसेसला प्रवासीही मिळू लागले आहेत. लांब पल्ल्यांचा प्रवास असल्यामुळे चालक, वाहकांना काळजी घेण्यास सांगितले जात आहे.

मुक्कामी गाडी येत नसल्याने होतोय त्रास...

कोरोना आधी ग्रामीण भागात मुक्कामी बसेस होत्या; परंतु सद्य:स्थितीत मुक्कामी बसेस सुरूच केल्या नाहीत. परिणामी, अतोनात त्रास होत आहे. खासगी वाहनाने प्रवास करण्याची वेळ आली आहे. महामंडळाने ग्रामीण भागातील बसेस सुरू कराव्यात.

-बालाजी मुगावे, प्रवासी.

पोळा सण जवळ आला आहे. पोळ्याचे साहित्य ग्रामीण भागात मिळत नाही. यासाठी शहराच्या ठिकाणी जावे लागते; परंतु जाण्यासाठी गावातून वाहन मिळत नाही. याकरिता एस. टी. महामंडळाने ग्रामीण भागात बसेस सुरू कराव्यात.

-नागोराव कऱ्हाळे, प्रवासी.

बसेस सुरू करण्याचे ग्रा. पं. ने दिले पत्र...

जिल्ह्यातील सावरगाव व धानोरा येथील ग्रामपंचाययतने महामंडळाला पत्र दिल्यामुळे या भागातील बसेस काही दिवसांकरिता सुरू केल्या आहेत; परंतु रोज प्रवासी संख्या मिळाली नाही तर बसेस बंद केल्या जातील, असेही महामंडळाने सांगितले.

कोरोना नियमांचे केले जाते पालन..

कोरोना महामारी कमी झाली असली तरी संपली नाही. रोज एक-दोन रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे चालक-वाहकांना कोरोना नियमांबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. प्रवाशांनाही मास्क वापरण्याबाबत सांगण्यात येत आहे.

-संजयकुमार पुंडगे, स्थानकप्रमुख.