शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत अतिक्रमणधारकांची धावाधाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:32 IST

शहरातील जलेश्वर तलावाच्या सुशोभिकरणासाठी तलाबकट्टा परिसरातील अतिक्रमणधारकांना तहसीलने नोटिसा बजावल्या आहेत. यात काहींनी तर आमची अनेक दिवसांची मालकी असल्याचे सांगून तहसीलदारांकडे धाव घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील जलेश्वर तलावाच्या सुशोभिकरणासाठी तलाबकट्टा परिसरातील अतिक्रमणधारकांना तहसीलने नोटिसा बजावल्या आहेत. यात काहींनी तर आमची अनेक दिवसांची मालकी असल्याचे सांगून तहसीलदारांकडे धाव घेतली. त्यांनी याबाबत पुरावे सादर करण्यास सांगितले आहे.जलेश्वर तलावालगतच्या जवळपास ४00 जणांना अशा प्रकारच्या नोटिसा आल्या आहेत. २८ फेब्रुवारीच्या नोटिसांत ९ मार्च ही अंतिम तारीख असल्याने आज तहसीलला गर्दी वाढली होती. यापैकी काहींची अतिक्रमणे तर काहीजण जागेची मालकीस असल्याचे सांगत आहेत. या भागातील साठ ते ७0 जणांनी तहसीलदार गजानन शिंदे यांची भेट घेवून कैफियत मांडली. गेल्या अनेक दिवसांपासून रहिवासी असताना अचानक व विलंबाने नोटिसा आल्या. ९ मार्चपर्यंतच अतिक्रमण पुरावे सादर करण्यास मुदत दिल्यानेही काहींनी नाराजी व्यक्त केली. तर ज्यांची मालकी आहे, अशांनी तहसीलला पुरावे सादर करावे, अशा सूचना शिंदे यांनी दिल्या.आधी पुनर्वसन करायाबाबत राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तहसीलदारांना निवेदनही दिले. त्यात म्हटले की, ६0 ते ७0 वर्षांपासून हे लोक येथे राहतात. शांततामय मार्गाने ते ताबेदार आहेत. घरपट्टी, नळपट्टी भरतात. अनेक दिवसांची वीजबिले आहेत. १९९0 पूर्वीच्या अतिक्रमणांना कायम करण्याचा शासन आदेश आहे. त्यामुळे विकासाच्या नावाखाली या लोकांना थेट बेघर करू नये. आधी त्यांचे पुनर्वसन करावे. नंतरच विकासकामे करावीत, अशी मागणी रासपचे विनायक भिसे यांनी केली. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.