शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
3
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
4
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
5
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
6
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
7
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
8
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
9
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
10
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
11
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
12
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
13
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
14
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
15
Jaipur Couple Video: रोमान्समध्ये इतके झाले तल्लीन की..., जयपूरमधील कपलचा हॉटेलमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
16
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
17
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
18
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
19
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
20
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं

कर्णकर्कश आवाज करणारी वाहने वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:26 IST

रस्त्याच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष हिंगोली : शहरातील शाहूनगर व कमलानगर भागातील रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. मागील पाच वर्षांपासून नगरवासीयांकडून ...

रस्त्याच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष

हिंगोली : शहरातील शाहूनगर व कमलानगर भागातील रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. मागील पाच वर्षांपासून नगरवासीयांकडून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी होत आहे, पण वारंवार मागणी करूनही कोणीही याकडे लक्ष देत नाही. आता नगरामध्ये मुरुमांचा रस्ता असून, या रस्त्यात मोठाले खड्डे पडले आहे. चार दिवसआड करून येणारे नळयोजनेचे पाणी या खड्ड्यात साचत असून, वाहनधारकांसह नागरिकांना रस्त्यावरुन ये-जा करताना मोठा त्रास होत आहे.

हळदीवर करपा रोगाची लागण

औंढा नागनाथ : तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील शेतकऱ्यांनी हळद पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली आहे. अनेक ठिकाणी हळद पिकाला पाणी मुबलक प्रमाणात मिळत असल्याने हे पीक बहरले आहे, पण मागील सहा ते आठ दिवसांपासून अचानक या पिकाची पाने पिवळे पडून करपून जात आहेत. सध्या या पिकावर करपा रोगाची लागण असल्याची शेतकऱ्यांत चर्चिले जात आहे.

मजुरांचे स्थलांतर वाढले

औंढा नागनाथ : तालुक्यात रोजगार हमी योजनेचे काम बंद आहे. यामुळे मजुरांच्या हाताला कामे नसल्यामुळे मजूर वर्ग कामाच्या शोधात भटकंती करीत आहे. तालुक्यातील अनेक रस्त्यावर मजुरांचे ट्रॅक्टर, ट्रकद्वारे जमाव कामाच्या शोधार्थ परगावी जात असल्याचे दिसत आहे. सध्या शासनाकडून शाळा सुरू करण्याचे आदेश असून, मजूर वर्ग आपल्या लेकरांसोबत परगावी स्थलांतर करीत असून, या बालकांचे शिक्षण अडचणीत येत आहे.

शेतशिवारातील वीजपुरवठा खंडित

बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा गावाच्या शेतशिवारातील वीजपुरवठा महावितरणकडून थकीत वीजदेयकांमुळे खंडित करण्यात आला. मागील तीन दिवसांपासून शेतशिवारात वीज नसल्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ होत आहे. पिकांना पाणी मिळत नसल्यामुळे पीक वाळत असून, शेतकऱ्यांंची चिंता वाढली आहे. यासाठी शासनाने काही उपाययोजना करून वीजपुरवठा सुरू करावा, अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे.

गावात भीषण पाणीटंचाई

हिंगोली : तालुक्यातील अंभेरी गावकऱ्यांना उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गावातील नळयोजना मागील वर्षभरापासून बंद आहे. यामुळे गावकऱ्यांचे पाणी विहीर, हातपंप, बोअर यावर अवलंबून आहे, पण आता गावातील पाण्याचे स्रोत आटत असून, गावकऱ्यांना पाण्यासाठी आतापासूनच भटकंती करावी लागत आहे. अनेक गावकरी दिवसा पाणी मिळत नसल्यामुळे रात्री उशिरा दूरवर पायपीट करीत पाणी भरत आहेत. यासाठी शासनाने लक्ष देऊन गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी गावकऱ्यांतून होत आहे.

स्वच्छता मोहिमेची मागणी

सेनगाव : शहरातील बस स्थानक परिसरामध्ये अनेक पानटपऱ्यांसह फळविक्रेत्यांचे गाडे आहे. यामुळे बस स्थानक परिसरामध्ये गुटखा पुड्या, पाणी पाउच, पाण्याचे निकाम्या बॉटल, अनेक फळांच्या साली टाकण्यात येत आहेत. यामुळे बस स्थानकात बसच्या प्रतीक्षेत असणाऱ्या प्रवासी वर्गांना मोठा त्रास होत आहे. या कचऱ्यामुळे बस स्थानक परिसरात दुर्गंधीमय वातावरण पसरलेले असून, यासाठी या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी होते.

स्वच्छता गृहाची दुरवस्था

हिंगोली : शहरातील न्यायालयात असणाऱ्या स्वच्छतागृहात मोठी घाण पसरली आहे. याचबरोबर, या स्वच्छतागृहाचीही दुरवस्था झालेली आहे. सदैव दुर्गंधीमय असणाऱ्या स्वच्छतागृहाचा वापर न करता, न्यायालयातील कर्मचारी व इतर न्यायालयाच्या इतर परिसरात लघुशंकेला बसत आहेत. यामुळे या स्वच्छतागृहाची स्वच्छता करून, हे गृह दुरुस्त करण्यात यावे, अशी मागणी न्यायालय परिसरातून होत आहे.

पाणपोई उभारण्याची मागणी

हिंगोली : शहरात अनेक भागांतील नागरिक कामानिमित्त येत आहेत, पण उन्हाची तीव्रता वाढली आहे. यासाठी नागरिकांना पाणी पिण्यासाठी शहरातील हॉटेल, दुकानावरून विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. सर्वसामान्य नागरिकांना विकतचे पाणी पिणे अवघड असल्यामुळे शहरात पाणपोई उभारण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

रस्त्यावर मोकाट जनावरांचा संचार

हिंगोली : शहरातील गांधी चौक, नांदेड नाका या ठिकाणी नेहमी नागरिकांची वर्दळ सुरू असते, पण या ठिकाणी मोकाट जनावरांचा मुक्त संचार होत असल्यामुळे, रस्त्यावरून नागरिकांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा दुचाकीस्वारांचा या जनावरांमुळे अपघातही झालेला आहे. यासाठी संबंधित विभागाने लक्ष देऊन या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वाहनधारक व नागरिकांतून होत आहे.