शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
3
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
4
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
5
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
6
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
7
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
8
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
9
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
10
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
11
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
12
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
13
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
14
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
15
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
16
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
17
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
18
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
19
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
20
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक

कर्णकर्कश आवाज करणारी वाहने वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:26 IST

रस्त्याच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष हिंगोली : शहरातील शाहूनगर व कमलानगर भागातील रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. मागील पाच वर्षांपासून नगरवासीयांकडून ...

रस्त्याच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष

हिंगोली : शहरातील शाहूनगर व कमलानगर भागातील रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. मागील पाच वर्षांपासून नगरवासीयांकडून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी होत आहे, पण वारंवार मागणी करूनही कोणीही याकडे लक्ष देत नाही. आता नगरामध्ये मुरुमांचा रस्ता असून, या रस्त्यात मोठाले खड्डे पडले आहे. चार दिवसआड करून येणारे नळयोजनेचे पाणी या खड्ड्यात साचत असून, वाहनधारकांसह नागरिकांना रस्त्यावरुन ये-जा करताना मोठा त्रास होत आहे.

हळदीवर करपा रोगाची लागण

औंढा नागनाथ : तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील शेतकऱ्यांनी हळद पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली आहे. अनेक ठिकाणी हळद पिकाला पाणी मुबलक प्रमाणात मिळत असल्याने हे पीक बहरले आहे, पण मागील सहा ते आठ दिवसांपासून अचानक या पिकाची पाने पिवळे पडून करपून जात आहेत. सध्या या पिकावर करपा रोगाची लागण असल्याची शेतकऱ्यांत चर्चिले जात आहे.

मजुरांचे स्थलांतर वाढले

औंढा नागनाथ : तालुक्यात रोजगार हमी योजनेचे काम बंद आहे. यामुळे मजुरांच्या हाताला कामे नसल्यामुळे मजूर वर्ग कामाच्या शोधात भटकंती करीत आहे. तालुक्यातील अनेक रस्त्यावर मजुरांचे ट्रॅक्टर, ट्रकद्वारे जमाव कामाच्या शोधार्थ परगावी जात असल्याचे दिसत आहे. सध्या शासनाकडून शाळा सुरू करण्याचे आदेश असून, मजूर वर्ग आपल्या लेकरांसोबत परगावी स्थलांतर करीत असून, या बालकांचे शिक्षण अडचणीत येत आहे.

शेतशिवारातील वीजपुरवठा खंडित

बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा गावाच्या शेतशिवारातील वीजपुरवठा महावितरणकडून थकीत वीजदेयकांमुळे खंडित करण्यात आला. मागील तीन दिवसांपासून शेतशिवारात वीज नसल्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ होत आहे. पिकांना पाणी मिळत नसल्यामुळे पीक वाळत असून, शेतकऱ्यांंची चिंता वाढली आहे. यासाठी शासनाने काही उपाययोजना करून वीजपुरवठा सुरू करावा, अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे.

गावात भीषण पाणीटंचाई

हिंगोली : तालुक्यातील अंभेरी गावकऱ्यांना उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गावातील नळयोजना मागील वर्षभरापासून बंद आहे. यामुळे गावकऱ्यांचे पाणी विहीर, हातपंप, बोअर यावर अवलंबून आहे, पण आता गावातील पाण्याचे स्रोत आटत असून, गावकऱ्यांना पाण्यासाठी आतापासूनच भटकंती करावी लागत आहे. अनेक गावकरी दिवसा पाणी मिळत नसल्यामुळे रात्री उशिरा दूरवर पायपीट करीत पाणी भरत आहेत. यासाठी शासनाने लक्ष देऊन गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी गावकऱ्यांतून होत आहे.

स्वच्छता मोहिमेची मागणी

सेनगाव : शहरातील बस स्थानक परिसरामध्ये अनेक पानटपऱ्यांसह फळविक्रेत्यांचे गाडे आहे. यामुळे बस स्थानक परिसरामध्ये गुटखा पुड्या, पाणी पाउच, पाण्याचे निकाम्या बॉटल, अनेक फळांच्या साली टाकण्यात येत आहेत. यामुळे बस स्थानकात बसच्या प्रतीक्षेत असणाऱ्या प्रवासी वर्गांना मोठा त्रास होत आहे. या कचऱ्यामुळे बस स्थानक परिसरात दुर्गंधीमय वातावरण पसरलेले असून, यासाठी या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी होते.

स्वच्छता गृहाची दुरवस्था

हिंगोली : शहरातील न्यायालयात असणाऱ्या स्वच्छतागृहात मोठी घाण पसरली आहे. याचबरोबर, या स्वच्छतागृहाचीही दुरवस्था झालेली आहे. सदैव दुर्गंधीमय असणाऱ्या स्वच्छतागृहाचा वापर न करता, न्यायालयातील कर्मचारी व इतर न्यायालयाच्या इतर परिसरात लघुशंकेला बसत आहेत. यामुळे या स्वच्छतागृहाची स्वच्छता करून, हे गृह दुरुस्त करण्यात यावे, अशी मागणी न्यायालय परिसरातून होत आहे.

पाणपोई उभारण्याची मागणी

हिंगोली : शहरात अनेक भागांतील नागरिक कामानिमित्त येत आहेत, पण उन्हाची तीव्रता वाढली आहे. यासाठी नागरिकांना पाणी पिण्यासाठी शहरातील हॉटेल, दुकानावरून विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. सर्वसामान्य नागरिकांना विकतचे पाणी पिणे अवघड असल्यामुळे शहरात पाणपोई उभारण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

रस्त्यावर मोकाट जनावरांचा संचार

हिंगोली : शहरातील गांधी चौक, नांदेड नाका या ठिकाणी नेहमी नागरिकांची वर्दळ सुरू असते, पण या ठिकाणी मोकाट जनावरांचा मुक्त संचार होत असल्यामुळे, रस्त्यावरून नागरिकांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा दुचाकीस्वारांचा या जनावरांमुळे अपघातही झालेला आहे. यासाठी संबंधित विभागाने लक्ष देऊन या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वाहनधारक व नागरिकांतून होत आहे.