शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

रस्त्यांच्या ७ कोटींचे भिजत घोंगडे कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 00:54 IST

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला मागील वर्षीपासून ५0५४ या लेखाशिर्षांतर्गत निधी मंजूर करण्यात येत असला तरीही त्याचे नियोजन अंतिम होण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे जवळपास सात कोटी रुपयांचा निधी अखर्चितच राहतो की काय? अशी भीती निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला मागील वर्षीपासून ५0५४ या लेखाशिर्षांतर्गत निधी मंजूर करण्यात येत असला तरीही त्याचे नियोजन अंतिम होण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे जवळपास सात कोटी रुपयांचा निधी अखर्चितच राहतो की काय? अशी भीती निर्माण झाली आहे.यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खर्च होणारा ५0५४ या लेखाशिर्षाचा निधी मागील वर्षी मार्च एण्डला कामांच्या यादीसह जि.प.कडे वर्ग केला होता. मूळात हा निधी जि.प.साठीच असून ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी तो खर्च करण्याची मुभा असल्याचे जि.प.सदस्यांचे म्हणने होते. तर याचे नियोजन करण्याचा अधिकारही जि.प.च्या सभागृहालाच असल्याचेही त्यांचे म्हणने होते. मात्र पालकमंत्री, आमदारांनी जिल्हा प्रशासनामार्फत ही कामे जिल्हा नियोजन समितीकडून सुचविल्याप्रमाणेच करण्याचा रेटा लावला होता. त्यावरून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही प्रश्न उपस्थित झाला. जि.प.सदस्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार असाल तर आम्ही बैठकीत बसायचेच कशाला? असा प्रश्न उपस्थित करून काहींनी सभात्यागाची भूमिका घेतली होती. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना यावर विचारणा केली. त्यांनीही हा निधी जि.प.कडे वर्ग केल्याने नियोजन त्यांनीच करायचे असल्याचे शासन आदेशात असल्याचे सांगितल्याने जि.प.सदस्यांच्या मागणीला बळ मिळाले. त्यामुळे हा मुद्दा आता निकाली निघाला असे समजून जि.प.सदस्यांनी यापूर्वी कामांच्या यादीसह आलेल्या १.९८ कोटींसह नव्याने मंजूर झालेल्या ५ कोटी रुपयांच्या निधीतून कामांच्या शिफारसी करून यादी डीपीसीकडे मंजुरीसाठी पाठविली. मात्र त्याला मंजुरीच मिळत नसल्याची बोंब आता होत आहे. हा निधी देतानाच डीपीसीवरील आमदार व पालकमंत्र्यांनी जि.प.ने कामांच्या शिफारसी करण्याला विरोध दर्शविला होता. त्यामुळे अजूनही तो मावळलेला नसल्याचे सदस्यांचे म्हणने आहे. तर जर आमच्याकडे निधी वर्ग करूनही नियोजनाचा अधिकार ठेवणार नसाल तर हा निधीच परत घ्या व नवा वर्गही करू नका, अशा भूमिकेत जाण्याची काहींची तयारी दिसत आहे. त्यामुळे हे भिजत घोंगडे कायम राहून निधी अखर्चित राहिल्याचा ठपका तरी बसणार नाही, असे या सदस्यांचे म्हणने आहे.याबाबत आगामी काळात डीपीसीवरील वरिष्ठ सदस्य काय भूमिका घेतात? याकडे जि.प. सदस्यांचे लक्ष आहे. काही जि.प.सदस्यांनी मध्यंतरी आमदारांशी संधान बांधले होते. मात्र अशी मंडळीही जि.प.नेच या निधीचे नियोजन करण्याचा खुलासा आल्यानंतर बॅकफूटवर येत जि.प.च्या सहकाऱ्यांसोबत दिसू लागली आहे.पत्रव्यवहार केला : उत्तर मात्र मिळेनाजि.प.पदाधिकारी व सदस्यांनी मागचे दोन कोटी व नवीन पाच कोटी अशा सात कोटींच्या कामांचे नियोजन केले आहे. सर्व निकष पूर्ण करून जवळपास २६ पेक्षा जास्त रस्त्यांचा प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. याबाबत पत्र पाठवून नियोजन विभागाकडे पाठपुरावाही केला. मात्रयाबाबत कोणतेच उत्तर मिळत नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मागच्या १.९८ कोटींचा निधी तर अखर्चितच राहण्याची चिन्हे गडद झाली आहेत. आता हे नियोजन मंजूर झाले नाही तर पुढे निविदा प्रक्रिया करून ही कामे मार्चएण्डला पूर्ण करणे शक्य नाही.या प्रकाराबाबत तोडगा काढल्यास चांगलेच आहे. अन्यथा त्यांनी निधी परत घ्यावा. मात्र तोडगा निघणारच नसेल तर न्यायालयात धाव घेण्याची तयारीही असल्याचे काही जि.प.सदस्यांनी बोलून दाखविले.

टॅग्स :Hingoliहिंगोलीroad safetyरस्ते सुरक्षा