शहरं
Join us  
Trending Stories
1
ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळली; ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसांनंतर अपघात झाल्याचे समजले
2
ऐतिहासिक! नितीश कुमार यांनी 10 व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; पाहा मंत्र्यांची संपूर्ण यादी
3
'ही' मोठी बँक भारतातील व्यवसाय बंद करण्याच्या विचारात, खरेदीसाठी दोन दिग्गज बँका शर्यतीत
4
"महाराष्ट्रातील घडामोडींवर माझं लक्ष, तुमचा…’’, तक्रार घेऊन आलेल्या एकनाथ  शिंदेनां अमित शाहांचं मोठं आश्वासन
5
देशाचा 'नंबर १' ब्रँड TCS नव्हे तर HDFC बँक! ब्रँडझेड रिपोर्टमध्ये मोठा उलटाफेर; 'या' कारणामुळे सर्वात मौल्यवान!
6
राज्यपालांवर वेळेची मर्यादा घालता येणार नाही; राष्ट्रपतींच्या 'त्या' प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
7
अल फलाह युनिव्हर्सिटीचे चेअरमन जावेद सिद्दीकी यांच्या अडचणी वाढल्या; आता घरावर चालणार बुलडोझर 
8
“डिसेंबर अखेरपर्यंत महामेट्रो मीरा-भाईंदरकरांच्या सेवेत येणार”: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
9
Mumbai: कापूर पडलेल्या तेलात तळलेला समोसा खाल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा, शाळांना अन्न सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे निर्देश!
10
एक 'अशी' शूटर बनली नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये मंत्री; जिनं भारताबाहेर कायम ठेवलाय दबदबा
11
फातिमा सना शेखने फेमिनझमवर केलं भाष्य; म्हणाली, "पुरुषांना कमी दाखवणं म्हणजे..."
12
भारतीय लष्कराला बूस्ट! अमेरिकेने जेव्हलिन क्षेपणास्त्र विक्रीला दिली मंजुरी
13
प्रवाशांसाठी गुड न्यूज! कोकण रेल्वेवरील ‘या’ एक्स्प्रेसचा वेग वाढला; ४० मिनिटे लवकर पोहोचेल
14
Kandivali: कांदिवलीत भरदिवसा तिघांचा दुचाकीने येत इस्टेट एजंटवर गोळीबार!
15
सांगलीकर काळजी घ्या! ऊसाच्या शेतामध्ये बिबट्याची चार पिल्लं सापडली, एकच खळबळ
16
१७० खोल्या, क्रिकेट ग्राऊंड, गोल्फ कोर्स... बकिंघम पॅलेसपेक्षाही चार पट मोठं आहे भारतातील हे घर
17
"तुम्हाला भाजप आवडत आहे, तर तुम्ही काँग्रेसमध्ये कशाला थांबलात?"; माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाने शशी थरूर यांना सुनावले
18
ऐन निवडणुकीत शिंदेसेनेच्या २ उमेदवारांनी अर्ज घेतला मागे; उपजिल्हाप्रमुखांसह भाजपात केला प्रवेश
19
"ठाकरेंवर आरोप करणारी भाजपा २० वर्ष BMC मध्ये उपमहापौरपदी होती हे सोयीस्करपणे विसरते"
20
खंडोबा नवरात्र २०२५: खंडोबाचे षडरात्रोत्सव हा केवळ उत्सव नाही तर कुळाचार; पाहा पूजा साहित्य आणि व्रतविधी
Daily Top 2Weekly Top 5

नगरवासीयांतून रस्त्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:26 IST

शहरात शीतपेयांची दुकाने थाटली हिंगोली : मागील चार दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. दिवसभर उन्हाचे चटके बसत आहे. यामुळे ...

शहरात शीतपेयांची दुकाने थाटली

हिंगोली : मागील चार दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. दिवसभर उन्हाचे चटके बसत आहे. यामुळे शहरात जागोजागी उसाचा रस, ज्युस, कोल्ड्रिंक्स आदी शीतपेयाची दुकाने थाटल्या जात आहे. शहरातील या दुकानांमध्ये नागरिक उन्हापासून बचाव व्हावा यासाठी शीतपेयाचे सेवन करीत असल्याचे दिसून येत आहे.

गिरगाव ते वसमत रस्त्याची दुरवस्था

वसमत : येथून गिरगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना आपले वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच अनेकदा खड्डे चुकविण्याच्या नादात अनेक दुचाकीस्वरांचा अपघातही घडत आहे. यासाठी हा रस्ता दुरुस्त करावी, अशी मागणी होत आहे.

मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला

हिंगोली : शहरातील रिसाला बाजार, गणेशवाडी चौक, जय भारत शाळा, आदर्श कॉलेज रस्ता आदी ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. सदरिल मोकाट कुत्रे रस्त्यावरून ये - जा करणाऱ्या वाहनधारकांच्या पाठीमागे लागून चावा घेण्याचा प्रयत्न करीत आहे. यामुळे अनेक नागरिकांत भीती पसरली आहे. यासाठी या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

येहळेगाव सो.-निशाणा रस्ता उखडला

औंढा ना. : तालुक्यातील येहळेगाव सो.-निशाणी रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्डे व गिट्टी उघडी पडली आहे. यामुळे या रस्त्यावर धुळीचे वातावरण राहत आहे. याचबरोबर गिट्टीवर अनेकदा छोटे-मोठे वाहने घसरून अपघात घडत असल्याचे प्रकारही या ठिकाणी घडत आहे. यासाठी हा रस्ता दुरुस्त व्हावा, अशी मागणी होत आहे.

भाजीमंडई परिसरात वाहतुकीस अडथळा

हिंगोली : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या भाजीमंडई परिसरात लागणाऱ्या फळ हातगाड्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. अनेक हातगाडे रस्त्यामध्ये येत असल्याने पायदळ नागरिकांसह वाहनधारकांना रस्त्यावरून ये-जा करताना अडथळा निर्माण होत आहे.

वीज पुरवठा वारंवार खंडित

हिंगोली : शहरातील जिजामाता नगर परिसरातील वीज पुरवठा सकाळी व सायंकाळच्या सुमारास वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. सकाळी व सायंकाळी वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांसह घरातील गृहिणींना स्वयंपाक करताना याचा मोठा त्रास होत आहे. यासाठी वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत व्हावा अशी मागणी होत आहे.

वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती

रामेश्वर तांडा : कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा परिसरात मोठे वन विभागाचे क्षेत्र आहे. सध्या उन्हाची तीव्रता ही वाढत चालली असल्यामुळे या भागातील वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. अनेक पाणवट्टे कोरडे होत असल्याने वन्य प्राणी इतरत्र ठिकाणी पाण्यासाठी भटकत आहेत.

हातपंप दुरुस्त करण्याची मागणी

कळमनुरी : सध्या उन्हाळ्याची सुरुवात झाली असून अनेक गावातील ओढे, तलाव कोरडे पडत आहेत. यासाठी अनेक गावात नादुरुस्त असणारे हातपंप दुरुस्त करावी अशी मागणी गावांतून होत आहे. हातपंप दुरुस्त केल्याने नागरिकांना भटकंती न करता पाणी उपलब्ध होईल, अशी चर्चा गावकऱ्यांत होत आहे.