शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

रास्त भाव दुकानदारांची अनामत रक्कम जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 00:15 IST

येथील पाचही रास्त भाव दुकानदार यांची १०० टक्के अनामत रक्कम जप्त करण्याची कारवाई जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केली आहे. एक महिन्याच्या आत कामकाज सुधारा, नियमांचे पालन करा अन्यथा दुकानाचे परवाने निलंबित करण्यात येतील, अशी तंबीही रास्त भाव दुकानदारांना देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : येथील पाचही रास्त भाव दुकानदार यांची १०० टक्के अनामत रक्कम जप्त करण्याची कारवाई जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केली आहे. एक महिन्याच्या आत कामकाज सुधारा, नियमांचे पालन करा अन्यथा दुकानाचे परवाने निलंबित करण्यात येतील, अशी तंबीही रास्त भाव दुकानदारांना देण्यात आली आहे. त्यामुळे तहसीलदारांनी दिलेल्या अभिप्रायावर अंशत: कारवाई करून जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी मधला मार्ग स्वीकारत रास्त भाव दुकानदारांना अभय दिले आहे.आखाडा बाळापूर येथील स्वस्त धान्य दुकानदार यांना वारंवार लेखी व तोंडी सूचना देऊनही ई-पॉस मशिनचा वापर धान्य वाटपासाठी केला नाही. इतरही दिलेले आदेश पाळले नाहीत. आधार सीडींग केली नाही. ई-केवायसी केली नाही. या व अशा अनेक बाबी जाणीवपूर्वक टाळत असल्याने कळमनुरीचे तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे यांनी पाचही दुकानदारांचे परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव जिल्हा पुरवठा अधिकाºयांकडे पाठविला होता. त्या पत्राच्या आधारे जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणवीरकर यांनी या पाचही दुकानदारांना नोटिसा बजावून २४ तासांच्या आत खुलासा करण्यास बजावले होते. त्यानुसार दुकानदारांनी आपले म्हणणे जिल्हा पुरवठा अधिकाºयांकडे मांडले होते. परंतु त्यांनी केलेले खुलासे जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी अमान्य केले आहेत. दुकानदाराचे म्हणणे अमान्य करून त्यांच्यावर दुकान परवान्याची १०० टक्के अनामत रक्कम जप्त करण्याची कारवाई केली आहे. त्याचबरोबर रास्तभाव दुकानदारांना सक्त ताकीद दिली असून कामासंदर्भात दिलेले वरिष्ठांचे आदेश मान्य करून एक महिन्याच्या आत सर्व कामे पूर्ण करावीत. ई-पॉस ट्रांजेक्शनमध्ये सुधारणा न झाल्यास परवाने निलंबितचा ईशारा देण्यात आला. ३ जानेवारी २०१९ रोजी सदर कारवाई करण्यात आली असून तसे पत्र दिले आहे. आखाडा बाळापूर येथील रास्तभाव दुकानदार ओमप्रकाश ठमके, सुमन पतंगे, विश्वनाथ पेंढारकर, नंदा शंकर सेवनकर, संतोष अग्रवाल आदींच्या नावे हे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणवीरकर यांनी दिले आहेत. या आदेशामुळे कामात टाळाटाळ करणाºया स्वस्त धान्य दुकानदारांना सूचित केलेले कामे पूर्ण करावी लागणार आहेत. त्यामुळे ई-पॉस मशीनद्वारे धान्यवाटप करणे क्रमप्राप्त झाले आहे.मध्यम मार्ग स्वीकारत दुकानांवर कारवाई...तहसीलदारांनी रास्तभाव दुकानदारांचे परवाने निलंबित करण्याबाबतचा प्रस्ताव दिल्यानंतरही जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी मात्र मध्यम मार्ग स्वीकारत ठेवलेले आरोप खरे ठरवत दुकानदारावर कारवाई केली. आणि दुसरीकडे रास्तभाव दुकानदार यांची बाजू सावरत त्यांचा बचावही केला. एक महिन्याची मुदत देऊन प्रकरण शांत केले. येत्या काही काळात रास्तभाव दुकानदारांचे काम सुधारले का नाही, हे कळणार आहे.

टॅग्स :Hingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीMarketबाजार