शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

वाढीव दराने घेतलेली खताची रक्कम परत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:23 IST

हिंगोली : खरीप हंगाम तोंडावर आल्याने अनेक शेतकऱ्यांनी खते व बियाणे खरेदी केले. यात हजारो शेतकऱ्यांना वाढीव दराने खते ...

हिंगोली : खरीप हंगाम तोंडावर आल्याने अनेक शेतकऱ्यांनी खते व बियाणे खरेदी केले. यात हजारो शेतकऱ्यांना वाढीव दराने खते खरेदी करावी लागली. अशांची रक्कम परत करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कृषी कार्यालयात ठिय्या देण्यात आला. यावेळी सेनगाव कृषी कार्यालयाचे पथक पाठवून दुकानदारांना रक्कम परत करायला लावू, असे आश्वासन अधीक्षकांनी दिला.

हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून शेतकरी खते, बी- बियाणे खरेदीसाठी धडपडत आहे. यात अनेक शेतकऱ्यांनी पुढे टंचाई निर्माण होण्याच्या भीतीने आधीच खरेदीला प्राधान्य दिले. दरम्यान, शासनाने नवीन खतांची दरवाढ केली. जिल्ह्यात जुन्या खताचा साठा असतानाही अनेकांनी या नवीन खताची विक्री केली. नंतर शासनाने ही दरवाढ मागे घेतली. मात्र या शेतकऱ्यांना तर दरवाढीचा फटका बसला आहे. अनेक गावांतून याबाबत तक्रारी असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कृषी अधीक्षक कार्यालयात शुक्रवारी निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले की, जर शेतकऱ्यांना ही रक्कम परत मिळाली नाही तर स्वाभिमानीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. या शेतकऱ्यांनी कृषी अधीक्षकांच्या दालनासमोरच ठिय्या मांडला. त्यानंतर अधीक्षक विजय लोखंडे यांनी कुठल्या तक्रारी आहेत, याबाबत विचारणा केली असता सेनगावच्या आढळल्या. त्यामुळे सेनगाव येथील कृषी कार्यालयाचे पथक पाठवून संबंधित शेतकऱ्यांची रक्कम परत करण्यास भाग पाडू, असे सांगितले. तसेच सेनगावला जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे युवा जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे व कार्यकर्त्यांनी सेनगावला जाण्याची तयारी सुरू केली होती.

यावेळी पतंगे यांनी आम्हाला कृषी अधीक्षकांनी साधे आतमध्ये येऊनही चर्चा करू दिली नाही. केवळ सेनगावला पाठवून हात झटकल्याचा आरोप केला आहे. तसेच विमा कंपनीनेही एनडीआरएफच्या निर्देशांनुसार विमा अदा केला नाही. त्यामुळे काहींना केवळ ८०० रुपये मिळाल्याचे सांगितले. याबाबतही प्रशासन काहीच बोलत नसल्याचे ते म्हणाले.