शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

वाढीव दराने घेतलेली खताची रक्कम परत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:23 IST

हिंगोली : खरीप हंगाम तोंडावर आल्याने अनेक शेतकऱ्यांनी खते व बियाणे खरेदी केले. यात हजारो शेतकऱ्यांना वाढीव दराने खते ...

हिंगोली : खरीप हंगाम तोंडावर आल्याने अनेक शेतकऱ्यांनी खते व बियाणे खरेदी केले. यात हजारो शेतकऱ्यांना वाढीव दराने खते खरेदी करावी लागली. अशांची रक्कम परत करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कृषी कार्यालयात ठिय्या देण्यात आला. यावेळी सेनगाव कृषी कार्यालयाचे पथक पाठवून दुकानदारांना रक्कम परत करायला लावू, असे आश्वासन अधीक्षकांनी दिला.

हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून शेतकरी खते, बी- बियाणे खरेदीसाठी धडपडत आहे. यात अनेक शेतकऱ्यांनी पुढे टंचाई निर्माण होण्याच्या भीतीने आधीच खरेदीला प्राधान्य दिले. दरम्यान, शासनाने नवीन खतांची दरवाढ केली. जिल्ह्यात जुन्या खताचा साठा असतानाही अनेकांनी या नवीन खताची विक्री केली. नंतर शासनाने ही दरवाढ मागे घेतली. मात्र या शेतकऱ्यांना तर दरवाढीचा फटका बसला आहे. अनेक गावांतून याबाबत तक्रारी असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कृषी अधीक्षक कार्यालयात शुक्रवारी निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले की, जर शेतकऱ्यांना ही रक्कम परत मिळाली नाही तर स्वाभिमानीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. या शेतकऱ्यांनी कृषी अधीक्षकांच्या दालनासमोरच ठिय्या मांडला. त्यानंतर अधीक्षक विजय लोखंडे यांनी कुठल्या तक्रारी आहेत, याबाबत विचारणा केली असता सेनगावच्या आढळल्या. त्यामुळे सेनगाव येथील कृषी कार्यालयाचे पथक पाठवून संबंधित शेतकऱ्यांची रक्कम परत करण्यास भाग पाडू, असे सांगितले. तसेच सेनगावला जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे युवा जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे व कार्यकर्त्यांनी सेनगावला जाण्याची तयारी सुरू केली होती.

यावेळी पतंगे यांनी आम्हाला कृषी अधीक्षकांनी साधे आतमध्ये येऊनही चर्चा करू दिली नाही. केवळ सेनगावला पाठवून हात झटकल्याचा आरोप केला आहे. तसेच विमा कंपनीनेही एनडीआरएफच्या निर्देशांनुसार विमा अदा केला नाही. त्यामुळे काहींना केवळ ८०० रुपये मिळाल्याचे सांगितले. याबाबतही प्रशासन काहीच बोलत नसल्याचे ते म्हणाले.