शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

जिल्ह्यातील निर्बंध पूर्णत: मागे घ्यावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:37 IST

हिंगोली: जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कडक उपाययोजना अवलंबिल्यामुळे कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कडक निर्बंध उठवावेत, ...

हिंगोली: जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कडक उपाययोजना अवलंबिल्यामुळे कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कडक निर्बंध उठवावेत, अशी मागणी हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

राज्य शासनाने ऑनलॉक प्रक्रिया राबविण्यासाठी ५ टप्पे व निकष जाहीर केले आहेत. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा ३ जून रोजी पॉझिटिव्हिटी रेट ४.३७ असून ५ टक्केच्या खाली आहे. भरलेले ऑक्सिजन बेडचे प्रमाण २९.३४ टक्के असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने शासनाकडे पाठविली आहे. शासनाच्या नियमावलीनुसार हिंगोली जिल्हा दुसऱ्या टप्प्यात बसतो. असे असतानाही शासनाने हिंगोली जिल्ह्याला तिसऱ्या टप्प्यात बसविले आहे. नंदुरबार जिल्ह्याचा पण हिंगोली एवढाच दर असताना दुसऱ्या टप्प्यात असल्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. राज्यातील सर्वच जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढताना पॉझिटिव्हिटी रेट व व्यापलेला ऑक्सिजन बेडची टक्केवारी नमूद करूनच आदेश काढले आहेत. परंतु, आपल्याकडे अशी सरासरी नमूद केलेली नाही. आरोग्य विभागानेही प्रसिद्ध केलेल्या पॉझिटिव्हिटी रेट व व्यापलेल्या ऑक्सिजन बेडची टक्केवारी व एकूण ऑक्सिजन बेडच्या आकड्यात तफावत असल्याने संभ्रम निर्माण होत आहे. तसेच आरोग्य विभाग दररोजच्या अहवालात आरटीपीसीआरद्वारे तपासलेल्यांची संख्या नमूद करीत नाही. त्यामुळे पारदर्शकता दिसत नसल्याचा आरोप व्यापारी संघटनेने केला आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाचा पॉझिटिव्हिटी रेट हा पाच टक्केच्या आत व ऑक्सिजन बेड २५ टक्केच्या आत भरलेले असल्याने शासनाच्या नवीन नियमावलीप्रमाणे पहिल्या टप्प्यात समाविष्ट असून जिल्ह्यातील कोरोनाविषयक संपूर्ण निर्बंध उठवावेत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर आ. तानाजी मुटकुळे, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, नंदकिशोर तोष्णीवाल, हमीद प्यारेवाले, प्रशांत सोनी, सुमित चौधरी, प्रफुल्ल भारुका, रवींद्र सोनी, सागर दुबे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

फोटो