शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
4
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
5
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
6
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
7
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
8
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
9
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
10
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
11
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
12
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
13
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
14
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
15
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
16
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
17
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
18
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
19
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
20
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

जिल्ह्यातील निर्बंध पूर्णत: मागे घ्यावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:37 IST

हिंगोली: जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कडक उपाययोजना अवलंबिल्यामुळे कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कडक निर्बंध उठवावेत, ...

हिंगोली: जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कडक उपाययोजना अवलंबिल्यामुळे कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कडक निर्बंध उठवावेत, अशी मागणी हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

राज्य शासनाने ऑनलॉक प्रक्रिया राबविण्यासाठी ५ टप्पे व निकष जाहीर केले आहेत. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा ३ जून रोजी पॉझिटिव्हिटी रेट ४.३७ असून ५ टक्केच्या खाली आहे. भरलेले ऑक्सिजन बेडचे प्रमाण २९.३४ टक्के असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने शासनाकडे पाठविली आहे. शासनाच्या नियमावलीनुसार हिंगोली जिल्हा दुसऱ्या टप्प्यात बसतो. असे असतानाही शासनाने हिंगोली जिल्ह्याला तिसऱ्या टप्प्यात बसविले आहे. नंदुरबार जिल्ह्याचा पण हिंगोली एवढाच दर असताना दुसऱ्या टप्प्यात असल्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. राज्यातील सर्वच जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढताना पॉझिटिव्हिटी रेट व व्यापलेला ऑक्सिजन बेडची टक्केवारी नमूद करूनच आदेश काढले आहेत. परंतु, आपल्याकडे अशी सरासरी नमूद केलेली नाही. आरोग्य विभागानेही प्रसिद्ध केलेल्या पॉझिटिव्हिटी रेट व व्यापलेल्या ऑक्सिजन बेडची टक्केवारी व एकूण ऑक्सिजन बेडच्या आकड्यात तफावत असल्याने संभ्रम निर्माण होत आहे. तसेच आरोग्य विभाग दररोजच्या अहवालात आरटीपीसीआरद्वारे तपासलेल्यांची संख्या नमूद करीत नाही. त्यामुळे पारदर्शकता दिसत नसल्याचा आरोप व्यापारी संघटनेने केला आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाचा पॉझिटिव्हिटी रेट हा पाच टक्केच्या आत व ऑक्सिजन बेड २५ टक्केच्या आत भरलेले असल्याने शासनाच्या नवीन नियमावलीप्रमाणे पहिल्या टप्प्यात समाविष्ट असून जिल्ह्यातील कोरोनाविषयक संपूर्ण निर्बंध उठवावेत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर आ. तानाजी मुटकुळे, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, नंदकिशोर तोष्णीवाल, हमीद प्यारेवाले, प्रशांत सोनी, सुमित चौधरी, प्रफुल्ल भारुका, रवींद्र सोनी, सागर दुबे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

फोटो