शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील निर्बंध पूर्णत: मागे घ्यावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:37 IST

हिंगोली: जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कडक उपाययोजना अवलंबिल्यामुळे कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कडक निर्बंध उठवावेत, ...

हिंगोली: जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कडक उपाययोजना अवलंबिल्यामुळे कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कडक निर्बंध उठवावेत, अशी मागणी हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

राज्य शासनाने ऑनलॉक प्रक्रिया राबविण्यासाठी ५ टप्पे व निकष जाहीर केले आहेत. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा ३ जून रोजी पॉझिटिव्हिटी रेट ४.३७ असून ५ टक्केच्या खाली आहे. भरलेले ऑक्सिजन बेडचे प्रमाण २९.३४ टक्के असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने शासनाकडे पाठविली आहे. शासनाच्या नियमावलीनुसार हिंगोली जिल्हा दुसऱ्या टप्प्यात बसतो. असे असतानाही शासनाने हिंगोली जिल्ह्याला तिसऱ्या टप्प्यात बसविले आहे. नंदुरबार जिल्ह्याचा पण हिंगोली एवढाच दर असताना दुसऱ्या टप्प्यात असल्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. राज्यातील सर्वच जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढताना पॉझिटिव्हिटी रेट व व्यापलेला ऑक्सिजन बेडची टक्केवारी नमूद करूनच आदेश काढले आहेत. परंतु, आपल्याकडे अशी सरासरी नमूद केलेली नाही. आरोग्य विभागानेही प्रसिद्ध केलेल्या पॉझिटिव्हिटी रेट व व्यापलेल्या ऑक्सिजन बेडची टक्केवारी व एकूण ऑक्सिजन बेडच्या आकड्यात तफावत असल्याने संभ्रम निर्माण होत आहे. तसेच आरोग्य विभाग दररोजच्या अहवालात आरटीपीसीआरद्वारे तपासलेल्यांची संख्या नमूद करीत नाही. त्यामुळे पारदर्शकता दिसत नसल्याचा आरोप व्यापारी संघटनेने केला आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाचा पॉझिटिव्हिटी रेट हा पाच टक्केच्या आत व ऑक्सिजन बेड २५ टक्केच्या आत भरलेले असल्याने शासनाच्या नवीन नियमावलीप्रमाणे पहिल्या टप्प्यात समाविष्ट असून जिल्ह्यातील कोरोनाविषयक संपूर्ण निर्बंध उठवावेत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर आ. तानाजी मुटकुळे, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, नंदकिशोर तोष्णीवाल, हमीद प्यारेवाले, प्रशांत सोनी, सुमित चौधरी, प्रफुल्ल भारुका, रवींद्र सोनी, सागर दुबे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

फोटो