शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

‘रात्रवस्ती’ बस उपक्रमाला प्रतिसाद मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 23:45 IST

रात्रवस्तीसाठी (मुक्कामी) ग्रामीण भागात जाणाºया वाहक-चालकांना अजूनही सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. त्यामुळे त्यांना बसमध्येच रात्र काढावी लागत असल्याचे चित्र आहे. वाहक-चालकांनासोयी-सुविधा पुरविण्याच्या सूचनाही महाव्यवस्थापकांनी विभाग नियंत्रकांना दिल्या असल्या तरी, प्रत्यक्षात मात्र या उपक्रमाला गावातील सरपंचांकडूनच प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देविभाग नियंत्रक : एसटी वाहक - चालकांच्या आरोग्याचा प्रश्न बनलाय गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : रात्रवस्तीसाठी (मुक्कामी) ग्रामीण भागात जाणाºया वाहक-चालकांना अजूनही सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. त्यामुळे त्यांना बसमध्येच रात्र काढावी लागत असल्याचे चित्र आहे. वाहक-चालकांनासोयी-सुविधा पुरविण्याच्या सूचनाही महाव्यवस्थापकांनी विभाग नियंत्रकांना दिल्या असल्या तरी, प्रत्यक्षात मात्र या उपक्रमाला गावातील सरपंचांकडूनच प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे.एसटी वाहक -चालकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. दरवर्षी एसटीमधील कार्यरत अधिकारी व कर्मचाºयांची आरोग्य तपासणी करून कर्मचाºयांवर योग्य उपचार केले जात असले तरी, रात्रवस्ती बसवर कार्यरत वाहक-चालकांची दयनीय अवस्था आहे. ग्रामीण भागात रात्रवस्तीसाठी जाणाºया बसचालक - वाहकांच्या राहण्याची पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतागृहाची सुविधा नसते. तशा तक्रारीही मध्यवर्ती कार्यालयाकडे प्राप्त आहेत. सदर सोयीसुविधा बºयाच ठिकाणी उपलब्ध नसल्याने चालक-वाहकांना पुरेशा आराम मिळत नाही. अपुरी झोप व दिनचर्या सुरळीत होत नसल्याने अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. या बाबींचा विचार करून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मध्यवर्ती कार्यालय मुंबईचे महाव्यवस्थापक (वाहतूक) यांनी विभाग नियंत्रकांना परिपत्रकानुसार सूचना दिल्या होत्या. सूचनेप्रमाणे विभागातील आगार व्यवस्थापकांनी रात्रवस्तीसाठी बसेस जात असलेल्या संबंधित गावांना भेटी द्याव्यात. गावातील सरपंच यांच्याशी पत्रव्यवहार करून व विभाग नियंत्रकांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाºयांशी पत्रव्यवहार करावा. शिवाय समक्ष भेटी घेऊन रात्रवस्तीसाठी जाणाºया बसेसच्या चालक वाहकांना राहण्यासाठी तसेच त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची, व स्वच्छतागृहाची आदी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत. याबाबत केलेल्या कार्यवाहीची माहिती मध्यवर्ती कार्यालयाकडे सादर करावी. परंतु पत्रव्यवहार करूनही एसटी महामंडळाच्या उपक्रमास प्रतिसाद मिळत नाही. शिवाय गावातील सरपंच याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देत नाहीत. त्यामुळे वाहक -चालकांच्या आरोग्य व सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अपघात टाळण्यासाठी हा नवीन उपक्रम एसटीने हाती घेतला होता.