शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

"आरक्षण हक्काचं आहे आणि ते घेतल्याशिवाय मराठे शांत बसणार नाहीत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2024 15:35 IST

मनोज जरांगे यांचे मत; हिंगोलीत माध्यमांशी साधला संवाद.

लोकमत न्यूज नेटवर्क, हिंगोली : आरक्षणासाठी आत्तापर्यंत मराठ्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलने केली असून, स्वत:च्या लेकराबाळांना न्याय मिळावा, यासाठी हा शांततेच्या मार्गाने केलेला आक्रोश आहे. आरक्षण हक्काचं असून, ते घेतल्याशिवाय आता मराठे शांत बसणार नाहीत, असे मत मनोज जरांगे - पाटील यांनी हिंगोलीत व्यक्त केले.

मराठा आरक्षण शांतता संवाद रॅलीच्या निमित्ताने जरांगे ६ जुलै रोजी हिंगोलीत आले होते. दुसऱ्या दिवशी ७ जुलै रोजी सकाळी ९:३० वाजता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आरक्षण हे मराठा समाजाच्या हक्काचे असून, त्यासाठी आमचा लढा सुरू आहे. मराठा कुणबीच्या तब्बल ५७ लाख नोंदी सापडल्या आहेत. प्रारंभापासून मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी आहे. यात ओबीसी बांधवांवर कुठलाही अन्याय होणार नाही. जर नोंदी सापडल्या आहेत तर फुकट भांडण कशासाठी, असे आता ओबीसी बांधवांनाही वाटत असून, छगन भुजबळांची भूमिका त्यांनाही पटत नसल्याचे जरांगे म्हणाले.मराठा समाज कधीच कोणावर रूसला नाही. आरक्षणाची मागणी हक्काची असून, ती सरकारने समजून घेणे गरजेचे आहे आणि ते समजून घेतील, असा विश्वास आहे. परंतु, मराठा आरक्षण प्रश्नी चालढकल केली तर सरकारला ते जड जाईल, असा इशाराही जरांगे यांनी दिला.

आत्महत्या करू नका...आरक्षण आपल्या हक्काचं असून, ते आज ना उद्या मिळणारच आहे. परंतु, तरुणांनी आत्महत्येसारखे पाऊल उचलू नये. तुम्हीच जर आत्महत्या करीत असाल तर आरक्षण मागायचं कुणासाठी? आपल्या आत्महत्येमुळे अख्खं कुटुंब उडघ्यावर येते, त्यांचा विचार आपण करायला हवा. आरक्षणासाठी यापेक्षाही मोठा लढा उभारायची ताकद मराठा समाजात आहे. त्यामुळे कुणीही आत्महत्या करू नये, असे आवाहनही जरांगे यांनी केले.

टॅग्स :Hingoliहिंगोली