शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

"आरक्षण हक्काचं आहे आणि ते घेतल्याशिवाय मराठे शांत बसणार नाहीत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2024 15:35 IST

मनोज जरांगे यांचे मत; हिंगोलीत माध्यमांशी साधला संवाद.

लोकमत न्यूज नेटवर्क, हिंगोली : आरक्षणासाठी आत्तापर्यंत मराठ्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलने केली असून, स्वत:च्या लेकराबाळांना न्याय मिळावा, यासाठी हा शांततेच्या मार्गाने केलेला आक्रोश आहे. आरक्षण हक्काचं असून, ते घेतल्याशिवाय आता मराठे शांत बसणार नाहीत, असे मत मनोज जरांगे - पाटील यांनी हिंगोलीत व्यक्त केले.

मराठा आरक्षण शांतता संवाद रॅलीच्या निमित्ताने जरांगे ६ जुलै रोजी हिंगोलीत आले होते. दुसऱ्या दिवशी ७ जुलै रोजी सकाळी ९:३० वाजता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आरक्षण हे मराठा समाजाच्या हक्काचे असून, त्यासाठी आमचा लढा सुरू आहे. मराठा कुणबीच्या तब्बल ५७ लाख नोंदी सापडल्या आहेत. प्रारंभापासून मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी आहे. यात ओबीसी बांधवांवर कुठलाही अन्याय होणार नाही. जर नोंदी सापडल्या आहेत तर फुकट भांडण कशासाठी, असे आता ओबीसी बांधवांनाही वाटत असून, छगन भुजबळांची भूमिका त्यांनाही पटत नसल्याचे जरांगे म्हणाले.मराठा समाज कधीच कोणावर रूसला नाही. आरक्षणाची मागणी हक्काची असून, ती सरकारने समजून घेणे गरजेचे आहे आणि ते समजून घेतील, असा विश्वास आहे. परंतु, मराठा आरक्षण प्रश्नी चालढकल केली तर सरकारला ते जड जाईल, असा इशाराही जरांगे यांनी दिला.

आत्महत्या करू नका...आरक्षण आपल्या हक्काचं असून, ते आज ना उद्या मिळणारच आहे. परंतु, तरुणांनी आत्महत्येसारखे पाऊल उचलू नये. तुम्हीच जर आत्महत्या करीत असाल तर आरक्षण मागायचं कुणासाठी? आपल्या आत्महत्येमुळे अख्खं कुटुंब उडघ्यावर येते, त्यांचा विचार आपण करायला हवा. आरक्षणासाठी यापेक्षाही मोठा लढा उभारायची ताकद मराठा समाजात आहे. त्यामुळे कुणीही आत्महत्या करू नये, असे आवाहनही जरांगे यांनी केले.

टॅग्स :Hingoliहिंगोली