शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

शेतकरीविरोधी काळा कायदा रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:32 IST

हिंगाेली : केंद्र सरकारने देशातील शेतकरी व कामगारांच्या विरोधात कायदे केले. पंजाब व हरयाणा यांच्यासह देशातील सर्व शेतकरी ...

हिंगाेली : केंद्र सरकारने देशातील शेतकरी व कामगारांच्या विरोधात कायदे केले. पंजाब व हरयाणा यांच्यासह देशातील सर्व शेतकरी संघटना केंद्र सरकारच्या विरोधात दिल्लीमध्ये ७२ दिवसांपासून आंदोलन करत आहे. संभाजी ब्रिगेडच्या वतीने या आंदोलनास जाहीर पाठिंबा देत प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे.

संभाजी ब्रिगेड' चे प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे यांच्या नेतृत्वाखाली ७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ निवेदन देत केंद्र सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच, ८ डिसेंबर २०२० रोजी संपूर्ण भारतबंदला पाठिंबा देत त्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. शेतकरी या कायद्याच्या विरोधात असतील तर केंद्र सरकार व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे आंदोलन लक्षात घेऊन तत्काळ कायदे रद्द करावे, अशी संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे.

भारतरत्न देऊन क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा सन्मान केला. शेतकरी अडचणीत असून देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी दिल्लीमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात सर्व शेतकरी संघर्ष करत आहे. मात्र तेंडुलकर भाजपची दलाली करण्यासाठी शेतकऱ्यांच्या विरोधात बोलतात. शेतकरी जर जगाचा पोशिंदा असेल तर त्यांना सन्मानाची वागणूक व पिकाला हमीभाव मिळाला पाहिजे. त्यामुळे अकलेचे तारे तोडणाऱ्यांचा ‘भारतरत्न’ काढून घेतला पाहिजे अशी मागणीही संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात येत आहे.