शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

हिंगोली जिल्ह्यात १४ मद्यविक्री दुकानांचे नूतनीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 00:11 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरुन ३१ मार्च २०१७ पासून ग्रामीण भागातील राज्य व राष्टÑीय महामार्गापासून २२० मीटरच्या आत येणाऱ्या तसेच महानगरपालिका ५०० मीटरच्या आत असलेले सर्व बिअरबार, देशी दारु विक्री, वाईन शॉप बंद केले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या एम. ए. नंबर ४८९/ ४९१ नुसार २३ फब्रुवारी २०१८ रोजी च्या आदेशानुसार किमान पाच हजार लोकसंख्या असलेल्या ग्रा. पं. क्षेत्रात नव्याने नूतनीकरण करुन दारु विक्रीस परवानगी दिल्याने आता ग्रामीण भागात दारु विक्रीचा मार्ग मोकळा झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरुन ३१ मार्च २०१७ पासून ग्रामीण भागातील राज्य व राष्टÑीय महामार्गापासून २२० मीटरच्या आत येणाऱ्या तसेच महानगरपालिका ५०० मीटरच्या आत असलेले सर्व बिअरबार, देशी दारु विक्री, वाईन शॉप बंद केले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या एम. ए. नंबर ४८९/ ४९१ नुसार २३ फब्रुवारी २०१८ रोजी च्या आदेशानुसार किमान पाच हजार लोकसंख्या असलेल्या ग्रा. पं. क्षेत्रात नव्याने नूतनीकरण करुन दारु विक्रीस परवानगी दिल्याने आता ग्रामीण भागात दारु विक्रीचा मार्ग मोकळा झाला आहे.हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण १४ मद्यविक्री दुकांनाचे नूतनीकरण करुन त्यांना ७ एप्रिल पासून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने परवानगी दिली आहे. त्यानुसार नियमित वेळेनुसार मद्यविक्रीची दुकाने सुरु झाली आहेत.सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे वर्षभरापासून प्रलंबित असलेला दारु विक्रीचा मार्ग आता मोकळा होण्यास मदत झाली आहे. यामध्ये बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंट ५४ होते ९ वाढले, बीयर शॉपी २५ होते ३ नव्याने सुरु झाले आहेत. तर देशी दारुची ३६ दुकाने होती दोन वाढली असल्याने एकूण ३८ देशी दारुची दुकाने शनिवार पासून सुरु झाली आहेत.तर ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळ विकसित केलेले औद्योगिक क्षेत्र असल्यास किंवा जागतिक वारसा पर्यटनस्थळ व केंद्र शासन राज्य शासन घोषीत स्थळ (तीर्थक्षेत्र वगळून) किंवा ज्या ग्रामपंचायतीचा विकास आराखडा शासनाने मंजूर केलेला आहे, असा कोणताही एक निकष पूर्ण करणाºया ग्रामपंचायत हद्दीत मद्यविक्री परवान्याचे नूतनीकरण करण्याची परवानगी ३१ मार्च २०१८ रोजी आयुक्त राज्य उत्पादन शुलक महाराष्टÑ राज्य मुंबई यांच्या आदेशानुसार हिंगोली जिल्ह्यातील पाच हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रा. पं. हद्दीत मद्यविक्री दुकानांच्या परवान्याचे नूतनीकरण करुन दारुव्रिकीस प्रारंभ केला आहे.जिल्ह्यामध्ये परवाना धारक एकूण १३१ मद्यविक्रीची दुकाने आहेत. आता सर्व दुकाने सुरु झाले असल्याने ग्रामीण भागातील दारु विक्रीची अडसर कमी होण्यास मदत झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने १५ डिसेंबर २०१६ रोजी दिलेल्या आदेशामुळे अनुज्ञप्त्या राज्य व राष्टÑीय महामार्गावरील ग्राम पंचायतीहद्दीतून गेल्याने १ एप्रिल २०१७ नंतर मद्यविक्री अनुज्ञप्त्याचे नुतनीकरण्यास निर्बंध घालण्यात आलेले होते. तर जिल्हाला महसूलचे दिलेले १ कोटी ५६ लाखाचे उद्दिष्ट पुर्ण करुन १ कोटी ८९ लाख ४१ हजार ३०२ रुपयाची वसूली झाली आहे.५ हजार लोकसंख्या असलेल्या हद्दीत मद्यविक्री करण्यास परवानी दिलेली आहे. मात्र लोकसंख्येची अट नसलेल्या ठिकाणीही अवैध दारु विक्री कायम आहे. त्यावरही लक्ष देणे तेव्हढेच गरजेचे आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीalcohol prohibition actदारुबंदी कायदा