शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

कोविड वाॅर्डात नातेवाइकांनी येऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:31 IST

हिंगोली : कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने नातेवाइकांनी कोरोना वाॅर्डात येऊ नये, अशा सूचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिल्या आहेत. ...

हिंगोली : कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने नातेवाइकांनी कोरोना वाॅर्डात येऊ नये, अशा सूचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिल्या आहेत. मात्र, १ एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक भेट दिली असता १० नातेवाईक या वॉर्डात आढळून आले. त्यामुळे त्यांना तातडीने कोरोना केअर सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे.

हिंगोलीतील ॲक्टिव्ह असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या ७६१ वर पोहोचली आहे. गंभीर व अतिगंभीर असलेल्या ११९ रुग्णांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या ठिकाणी नातेवाइकांनी येऊ नये, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिल्या आहेत. मात्र, त्यानंतरही काही रुग्णांचे नातेवाईक या ना त्या कारणाने येत आहेत.

दरम्यान, गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी जयवंशी यांनी शासकीय रुग्णालयाच्या कोरोना वॉर्डाला अचानक भेट दिली. जिल्हाधिकारी आल्याचे समजताच आरोग्य प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. यावेळी जयवंशी यांनी रुग्णांशी संवाद साधून आरोग्य सेवा व इतर सुुविधांबाबत माहिती घेतली. गंभीर व अतिगंभीर रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यासोबतच त्यांच्यावर २४ तास लक्ष ठेवण्याच्या सूचनाही दिल्या.

यावेळी काही रुग्णांजवळ त्यांचे नातेवाईक आढळून आले. जयवंशी यांनी रुग्णांच्या १० नातेवाइकांना रुग्णवाहिकेत बसवून कोरोना केअर सेंटरला पाठविले. रुग्णांसोबत नातेवाईक आढळल्यास त्यांना तातडीने कोरोना केअर सेंटरला पाठविण्याच्या सूचनाही आरोग्य कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

फोटो : ७