शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

बीआरजीएफची ४१ लाखांची वसुली होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 00:36 IST

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात आलेल्या बीआरजीएफ योजनेतील ७८ लाखांच्या अपहाराच्या रक्कमेपैकी १९ लाखांची कामेच ग्रा.पं.नी पूर्ण केली असून १७ लाखांची वसुली झाली आहे. अजूनही ४१ लाखांच्या वसुलीचा प्रश्न कायम आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात आलेल्या बीआरजीएफ योजनेतील ७८ लाखांच्या अपहाराच्या रक्कमेपैकी १९ लाखांची कामेच ग्रा.पं.नी पूर्ण केली असून १७ लाखांची वसुली झाली आहे. अजूनही ४१ लाखांच्या वसुलीचा प्रश्न कायम आहे.बीआरजीएफ योजनेत पाच वर्षांच्या काळात जवळपास ९0.९0 कोटी रुपयांची कामे झाली. ही योजना २0१५-१६ या आर्थिक वर्षात शासनाने बंद केली. मात्र तत्पूर्वीच्या अर्धवट कामांमुळे ती बराच काळ चर्चेत राहिली. त्यानंतर या योजनेतील अर्धवट कामांचा निपटाराच होत नसल्याने व निधीही ग्रामपंचायतींनी परत न केल्याने अनेक ठिकाणी अपहाराचे गुन्हे दाखल झाले. अनेक ग्रामसेवकांची या प्रकरणात विभागीय चौकशीही लागली होती.यात ३९ ग्रामपंचायतींची ६0 कामे झाली नसल्याचा प्रकार समोर आला होता. तर यात ७८.३२ लाखांचा अपहार झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर या ग्रामपंचायतींकडून अपहाराच्या रक्कमेच्या वसुलीसाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने प्रयत्न सुरू केले होते. परंतु त्याला सरपंच व ग्रामसेवक बदललेल्या ठिकाणी कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. काही ठिकाणी त्याच पदाधिकाºयांकडे पुन्हा सत्ता आल्याने अशांनी कामे पूर्ण करून घेण्यात धन्यता मानली.काहींनी तर काम कमी अन् एमबी मात्र पूर्ण रक्कमेची बनवत हे प्रकरण निस्तारण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यामुळे १९ लाखांची कामे झाल्याने एवढी रक्कम वसुलीतून बाहेर आली. तर १७ लाखांची रक्कम प्रत्यक्षात वसूल झाली.२0१५-१६ या आर्थिक वर्षात बीआरजीएफ ही योजना केंद्र शासनाने गुंडाळल्यानंतरही ही योजना अजूनही चर्चेत आहे. महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू होती. मागास भागातील निकडीच्या बाबींना किंवा अर्धवट पडलेल्या कामांना या योजनेत पूर्ण करण्याची संधी होती. मात्र यात घेतलेली कामेच अर्धवट ठेवून ग्रामपंचायतींनी नवीच समस्या समोर आणली. आता ही बाब निस्तारण्यातच जिल्हा ग्रामीण यंत्रणा अजूनही हैराण आहे.