शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

बीआरजीएफची ४१ लाखांची वसुली होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 00:36 IST

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात आलेल्या बीआरजीएफ योजनेतील ७८ लाखांच्या अपहाराच्या रक्कमेपैकी १९ लाखांची कामेच ग्रा.पं.नी पूर्ण केली असून १७ लाखांची वसुली झाली आहे. अजूनही ४१ लाखांच्या वसुलीचा प्रश्न कायम आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात आलेल्या बीआरजीएफ योजनेतील ७८ लाखांच्या अपहाराच्या रक्कमेपैकी १९ लाखांची कामेच ग्रा.पं.नी पूर्ण केली असून १७ लाखांची वसुली झाली आहे. अजूनही ४१ लाखांच्या वसुलीचा प्रश्न कायम आहे.बीआरजीएफ योजनेत पाच वर्षांच्या काळात जवळपास ९0.९0 कोटी रुपयांची कामे झाली. ही योजना २0१५-१६ या आर्थिक वर्षात शासनाने बंद केली. मात्र तत्पूर्वीच्या अर्धवट कामांमुळे ती बराच काळ चर्चेत राहिली. त्यानंतर या योजनेतील अर्धवट कामांचा निपटाराच होत नसल्याने व निधीही ग्रामपंचायतींनी परत न केल्याने अनेक ठिकाणी अपहाराचे गुन्हे दाखल झाले. अनेक ग्रामसेवकांची या प्रकरणात विभागीय चौकशीही लागली होती.यात ३९ ग्रामपंचायतींची ६0 कामे झाली नसल्याचा प्रकार समोर आला होता. तर यात ७८.३२ लाखांचा अपहार झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर या ग्रामपंचायतींकडून अपहाराच्या रक्कमेच्या वसुलीसाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने प्रयत्न सुरू केले होते. परंतु त्याला सरपंच व ग्रामसेवक बदललेल्या ठिकाणी कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. काही ठिकाणी त्याच पदाधिकाºयांकडे पुन्हा सत्ता आल्याने अशांनी कामे पूर्ण करून घेण्यात धन्यता मानली.काहींनी तर काम कमी अन् एमबी मात्र पूर्ण रक्कमेची बनवत हे प्रकरण निस्तारण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यामुळे १९ लाखांची कामे झाल्याने एवढी रक्कम वसुलीतून बाहेर आली. तर १७ लाखांची रक्कम प्रत्यक्षात वसूल झाली.२0१५-१६ या आर्थिक वर्षात बीआरजीएफ ही योजना केंद्र शासनाने गुंडाळल्यानंतरही ही योजना अजूनही चर्चेत आहे. महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू होती. मागास भागातील निकडीच्या बाबींना किंवा अर्धवट पडलेल्या कामांना या योजनेत पूर्ण करण्याची संधी होती. मात्र यात घेतलेली कामेच अर्धवट ठेवून ग्रामपंचायतींनी नवीच समस्या समोर आणली. आता ही बाब निस्तारण्यातच जिल्हा ग्रामीण यंत्रणा अजूनही हैराण आहे.