शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

पुन्हाचे लॉकडाऊन परवडणारे नाही; मास्क व सोशल डि हाच पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:18 IST

हिंगोली : जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू असताना रुग्णसंख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनासह सर्वच चिंतेत असून पुन्हा ...

हिंगोली : जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू असताना रुग्णसंख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनासह सर्वच चिंतेत असून पुन्हा लॉकडाऊन लागणार की काय, याची चिंता लागली आहे. परंतु, लॉकडाऊन परवडणारे नसून मास्क व सोशल डिस्टन्lिंग हाच पर्याय योग्य असल्याचे मत अनेक जण व्यक्त करीत आहेत.

जिल्ह्यात मागील महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे पाहावयास मिळाले. जिल्हा प्रशासनाने त्यासाठी विविध उपाययोजना केल्या होत्या. कोरोना आटोक्यात येत आहे, असे वाटत असतानाच पुन्हा कोरोनाने डोके वर काढले. रुग्णसंख्या कमी झाल्याने नागरिकही बेफिकीर झाले. यातूनच बाजारपेठेत गर्दी होणे, शारीरिक अंतर न पाळणे, मास्क न वापण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोराेनाला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. गर्दी टाळण्यासाठी धरणे, सभा, आंदोलन आदींवर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, अशीच रुग्णसंख्या वाढत राहिली, तर जिल्हा प्रशासन लॉकडाऊनचा पर्याय निवडणार का? हे जरी आता स्पष्ट नसले, तरी पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही. यापूर्वी लॉकडाऊनमध्ये नागरिकांचे मोठे हाल झाले. आता कुठे सर्व जण यातून सावरत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन परवडणारे नसून कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी सर्वांनीच आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, मास्क वापरावा, शारीरिक अंतर पाळावे, हात स्वच्छ धुणे हे पर्यायच योग्य असल्याचे मत अनेक व्यापारी, मजुरांनी व्यक्त केले आहे.

धोका वाढतोय

जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरण केले जात आहे. एकीकडे लसीकरणास प्रतिसाद मिळत असताना दुसरीकडे कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. शनिवारी तब्बल १९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापूर्वी १९ फेब्रुवारी रोजी १६, १८ रोजी १३ रुग्ण आढळून आले. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढत असून यामध्ये शहरी व ग्रामीण भागातील रुग्णांचा समावेश आहे.

उद्योग संघटनांचे प्रतिनिधी म्हणतात...

पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही. यापूर्वी लागलेल्या लॉकडाऊनमुळे मोठे नुकसान झाले. आता कुठे व्यवसायाने उभारी घेतली आहे. नागरिकांनी शारीरिक अंतर पाळणे, हात स्वच्छ धुणे, तोंडाला मास्क वापरणे हे सूत्र वापरल्यास लॉकडाऊनची गरज भासणार नाही.

-रमेश पंडित, उद्योजक

कोरोनाला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही. नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, गर्दी टाळावी, तोंडाला मास्क वापरावे. लाॅकडाऊनकाळात नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. आता पुन्हा लॉकडाऊन नको.

-अनिल नैणवानी, उद्योजक

कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी यापूर्वी लाॅकडाऊन करण्यात आले होते. त्यात नागरिकांचे मोठे हाल झाले. शिवाय, सर्वच व्यवसाय ठप्प झाले होते. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन नकोच. त्याऐवजी नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. नियमित मास्क वापरावा, गर्दीत जाणे टाळावे, हात स्वच्छ धुवावेत.

-ललीत खुराणा, उद्योजक

-

कोरोनाचे एकूण रुग्ण- ३८९१

बरे झालेले रुग्ण - ३७४०

कोरोना बळी - ५८