शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

पुन्हाचे लॉकडाऊन परवडणारे नाही; मास्क व सोशल डि हाच पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:18 IST

हिंगोली : जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू असताना रुग्णसंख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनासह सर्वच चिंतेत असून पुन्हा ...

हिंगोली : जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू असताना रुग्णसंख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनासह सर्वच चिंतेत असून पुन्हा लॉकडाऊन लागणार की काय, याची चिंता लागली आहे. परंतु, लॉकडाऊन परवडणारे नसून मास्क व सोशल डिस्टन्lिंग हाच पर्याय योग्य असल्याचे मत अनेक जण व्यक्त करीत आहेत.

जिल्ह्यात मागील महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे पाहावयास मिळाले. जिल्हा प्रशासनाने त्यासाठी विविध उपाययोजना केल्या होत्या. कोरोना आटोक्यात येत आहे, असे वाटत असतानाच पुन्हा कोरोनाने डोके वर काढले. रुग्णसंख्या कमी झाल्याने नागरिकही बेफिकीर झाले. यातूनच बाजारपेठेत गर्दी होणे, शारीरिक अंतर न पाळणे, मास्क न वापण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोराेनाला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. गर्दी टाळण्यासाठी धरणे, सभा, आंदोलन आदींवर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, अशीच रुग्णसंख्या वाढत राहिली, तर जिल्हा प्रशासन लॉकडाऊनचा पर्याय निवडणार का? हे जरी आता स्पष्ट नसले, तरी पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही. यापूर्वी लॉकडाऊनमध्ये नागरिकांचे मोठे हाल झाले. आता कुठे सर्व जण यातून सावरत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन परवडणारे नसून कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी सर्वांनीच आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, मास्क वापरावा, शारीरिक अंतर पाळावे, हात स्वच्छ धुणे हे पर्यायच योग्य असल्याचे मत अनेक व्यापारी, मजुरांनी व्यक्त केले आहे.

धोका वाढतोय

जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरण केले जात आहे. एकीकडे लसीकरणास प्रतिसाद मिळत असताना दुसरीकडे कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. शनिवारी तब्बल १९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापूर्वी १९ फेब्रुवारी रोजी १६, १८ रोजी १३ रुग्ण आढळून आले. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढत असून यामध्ये शहरी व ग्रामीण भागातील रुग्णांचा समावेश आहे.

उद्योग संघटनांचे प्रतिनिधी म्हणतात...

पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही. यापूर्वी लागलेल्या लॉकडाऊनमुळे मोठे नुकसान झाले. आता कुठे व्यवसायाने उभारी घेतली आहे. नागरिकांनी शारीरिक अंतर पाळणे, हात स्वच्छ धुणे, तोंडाला मास्क वापरणे हे सूत्र वापरल्यास लॉकडाऊनची गरज भासणार नाही.

-रमेश पंडित, उद्योजक

कोरोनाला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही. नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, गर्दी टाळावी, तोंडाला मास्क वापरावे. लाॅकडाऊनकाळात नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. आता पुन्हा लॉकडाऊन नको.

-अनिल नैणवानी, उद्योजक

कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी यापूर्वी लाॅकडाऊन करण्यात आले होते. त्यात नागरिकांचे मोठे हाल झाले. शिवाय, सर्वच व्यवसाय ठप्प झाले होते. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन नकोच. त्याऐवजी नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. नियमित मास्क वापरावा, गर्दीत जाणे टाळावे, हात स्वच्छ धुवावेत.

-ललीत खुराणा, उद्योजक

-

कोरोनाचे एकूण रुग्ण- ३८९१

बरे झालेले रुग्ण - ३७४०

कोरोना बळी - ५८