शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

रेशन धान्य देत नाही, म्हणून दुकानदारच बदलून टाकला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:34 IST

हिंगोली : तालुक्यातील २५ रेशन लाभार्थ्यांनी रेशन दुकानदार वेळेवर धान्य देत नसल्याच्या वा इतर कारणावरून दुकानदारच बदलला आहे. हिंगोली ...

हिंगोली : तालुक्यातील २५ रेशन लाभार्थ्यांनी रेशन दुकानदार वेळेवर धान्य देत नसल्याच्या वा इतर कारणावरून दुकानदारच बदलला आहे. हिंगोली तालुक्यातील हे चित्र असले, तरी जिल्ह्यातही अशा तक्रारी असल्याचे समोर आले आहे. मात्र, दुकानदार बदलूनही लाभार्थ्यांना दुसऱ्या दुकानातून धान्य मिळण्यास दोन महिने वाट पाहावी लागत आहे.

जिल्ह्यात पुरवठा विभागाच्या वतीने गरजूंना स्वस्त दरात धान्य उपलब्ध व्हावे, यासाठी रेशन दुकानदारांमार्फत धान्य पुरविले जाते. यात दारिद्र्य रेषेखालील लाभार्थींसह, प्राधान्य कुटुंबातील सदस्य, शेतकरी कुटुंबातील सदस्यांसह पात्र लाभार्थ्यांना रेशन उपलब्ध करून दिले जाते. कोरोनामुळे तर शासनाने नोव्हेंबरपर्यंत मोफत अन्नधान्य पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. रेशनचे धान्य घेण्यासाठी ई-पॉस मशीनवर अंगठा लावावा लागत असला, तरी अनेक दुकानदार धान्य वेळेवर देत नसल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. वेळेवर धान्य मिळत नसल्याने, तसेच इतर कारणांनी लाभार्थी रेशन दुकानच बदलत आहेत. हिंगोली तालुक्यात जवळपास २५ लाभार्थींनी असे अर्ज तहसीलच्या पुरवठा विभागाकडे सादर केले आहेत.

शहरात जास्त बदल

ग्रामीण भागात एक किंवा जास्तीत जास्त दोन रेशन दुकाने आहेत. या दुकानांमार्फत अन्नधान्य पुरविले जाते. त्यामुळे अशा ठिकाणी रेशनचे दुकान बदलण्याच्या भानगडीत लाभार्थी पडत नाहीत. मात्र, शहरातील लाभार्थी दुकान बदलून देण्यासाठी पुरवठा विभागाकडे तगादा लावत आहेत. सध्याच्या काळात रेशन दुकानदार बदलावयाचा झाल्यास पूर्ण प्रक्रिया होण्यासाठी किमान दोन महिने लागत असल्याचे सांगण्यात आले. यात लाभार्थ्यांना दोन महिने लाभापासून मुकावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दुकानदार बदलून घेण्यासाठी आलेले लाभार्थी पुन्हा परत जात आहेत.

नोव्हेंबरपर्यंत मिळणार मोफत धान्य

कोरोना काळात सर्वच क्षेत्राला फटका बसला आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग कमी होत असला, तरी परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी काही वेळ लागणार आहे. या काळात लाभार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गंत जुलै ते नोव्हेंबर, २०२१ पर्यंत पात्र लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्ह्यातील एकूण रेशन कार्डधारक - १,८८,८७३

अंत्योदय - २६,३५९

अन्नसुरक्षा - १,३१,८३८

शेतकरी - ३०,७७६

हिंगोली तालुक्यात दुकानदार बदलला - २५