शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

रेशन धान्य देत नाही, म्हणून दुकानदारच बदलून टाकला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:34 IST

हिंगोली : तालुक्यातील २५ रेशन लाभार्थ्यांनी रेशन दुकानदार वेळेवर धान्य देत नसल्याच्या वा इतर कारणावरून दुकानदारच बदलला आहे. हिंगोली ...

हिंगोली : तालुक्यातील २५ रेशन लाभार्थ्यांनी रेशन दुकानदार वेळेवर धान्य देत नसल्याच्या वा इतर कारणावरून दुकानदारच बदलला आहे. हिंगोली तालुक्यातील हे चित्र असले, तरी जिल्ह्यातही अशा तक्रारी असल्याचे समोर आले आहे. मात्र, दुकानदार बदलूनही लाभार्थ्यांना दुसऱ्या दुकानातून धान्य मिळण्यास दोन महिने वाट पाहावी लागत आहे.

जिल्ह्यात पुरवठा विभागाच्या वतीने गरजूंना स्वस्त दरात धान्य उपलब्ध व्हावे, यासाठी रेशन दुकानदारांमार्फत धान्य पुरविले जाते. यात दारिद्र्य रेषेखालील लाभार्थींसह, प्राधान्य कुटुंबातील सदस्य, शेतकरी कुटुंबातील सदस्यांसह पात्र लाभार्थ्यांना रेशन उपलब्ध करून दिले जाते. कोरोनामुळे तर शासनाने नोव्हेंबरपर्यंत मोफत अन्नधान्य पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. रेशनचे धान्य घेण्यासाठी ई-पॉस मशीनवर अंगठा लावावा लागत असला, तरी अनेक दुकानदार धान्य वेळेवर देत नसल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. वेळेवर धान्य मिळत नसल्याने, तसेच इतर कारणांनी लाभार्थी रेशन दुकानच बदलत आहेत. हिंगोली तालुक्यात जवळपास २५ लाभार्थींनी असे अर्ज तहसीलच्या पुरवठा विभागाकडे सादर केले आहेत.

शहरात जास्त बदल

ग्रामीण भागात एक किंवा जास्तीत जास्त दोन रेशन दुकाने आहेत. या दुकानांमार्फत अन्नधान्य पुरविले जाते. त्यामुळे अशा ठिकाणी रेशनचे दुकान बदलण्याच्या भानगडीत लाभार्थी पडत नाहीत. मात्र, शहरातील लाभार्थी दुकान बदलून देण्यासाठी पुरवठा विभागाकडे तगादा लावत आहेत. सध्याच्या काळात रेशन दुकानदार बदलावयाचा झाल्यास पूर्ण प्रक्रिया होण्यासाठी किमान दोन महिने लागत असल्याचे सांगण्यात आले. यात लाभार्थ्यांना दोन महिने लाभापासून मुकावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दुकानदार बदलून घेण्यासाठी आलेले लाभार्थी पुन्हा परत जात आहेत.

नोव्हेंबरपर्यंत मिळणार मोफत धान्य

कोरोना काळात सर्वच क्षेत्राला फटका बसला आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग कमी होत असला, तरी परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी काही वेळ लागणार आहे. या काळात लाभार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गंत जुलै ते नोव्हेंबर, २०२१ पर्यंत पात्र लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्ह्यातील एकूण रेशन कार्डधारक - १,८८,८७३

अंत्योदय - २६,३५९

अन्नसुरक्षा - १,३१,८३८

शेतकरी - ३०,७७६

हिंगोली तालुक्यात दुकानदार बदलला - २५