शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शार्टकटसाठी राँगसाइड चुकीचीच; ही वेळ बचत जीवघेणी ठरू शकते !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:20 IST

हिंगोली : वेळेची बचत करण्यासाठी अनेक वाहनचालक राँगसाइडने वाहने नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत असून अनेकांना ...

हिंगोली : वेळेची बचत करण्यासाठी अनेक वाहनचालक राँगसाइडने वाहने नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत असून अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. शहरातील विविध चौकांत सोमवारी अनेक वाहनचालक विरुद्ध बाजूने वाहने नेत असल्याचे पाहावयास मिळाले.

शहरासह जिल्हाभरात वाहने वाढली आहेत. परिणामी, रस्त्यावरील वाहतूक वाढली आहे. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी रस्त्यांवर दुभाजक टाकण्यात आले आहेत. अनेक वाहनचालक दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी शॉर्टकट वापरत आहेत. वेळेची बचत करण्याच्या नादात शॉर्टकट वाहने चालविणाऱ्यांमुळे समोरील वाहनचालकांनाही अपघाताला सामोरे जावे लागते. त्यामुळे शॉर्टकट जीवघेणा ठरू शकतो. अशा वाहनचालकांना आवर घालणे गरजेचे बनले आहे.

ही आहे राँगसाइड

इंदिरा गांधी चौक

बसस्थानक भागातून रामलीला मैदानाकडे जाणारी वाहने शहरातील इंदिरा गांधी चौक भागातून नेताना चौकाला वळसा घालून जाण्याऐवजी मधूनच वाहने नेण्याचा प्रयत्न करतात. सोमवारी अनेक वाहने येथून चुकीच्या दिशेने जाताना दिसत होती.

महात्मा गांधी चौक

इंदिरा गांधी चौकाकडून येणाऱ्या रस्त्याने समोर महात्मा गांधी चौक भागातून जवाहर रोडने जाणारी वाहने महात्मा गांधी चौकाला वळसा घालून जाण्याऐवजी शॉर्टकटने नेली जात आहेत. यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे.

रेल्वे उड्डाणपूल रिसाला बाजार

शहरातील रिसाला बाजार भागात असलेल्या रेल्वे उड्डाण पुलावरून शासकीय दवाखान्याकडे जाणारी वाहने थेट वळण घेत आहेत. त्यामुळे पाठीमागून येणारे वाहनचालक गोंधळून जात आहेत. त्यात येथे उतार असल्याने अपघाताला आमंत्रणच मिळत आहे.

धोकादायक वाहन चालविणे : सहा महिन्यांत सव्वासात लाखांचा दंड

कोरोनामुळे जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले होते. या काळात रस्त्यावर फारसी वाहतूक नव्हती. त्यामुळे राँगसाइडने वाहने चालविणारे चालक क्वचित आढळून येत होते. मात्र, चालू वर्षातील जूनपर्यंत ७३९ वाहनचालक धोकादायक पद्धतीने वाहन चालविताना पोलिसांना आढळले. या वाहनचालकांना पोलिसांनी ७ लाख ३९ हजारांचा दंड लावला आहे.

जिल्ह्यात रस्त्यांची कामे सुरू आहेत. पावसाळा असल्याने वाहने घसरून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच वेळेच्या बचतीसाठी राँगसाइडने वाहन चालविणे चुकीचे आहे. राँगसाइडने वाहन चालविणे जिवावर बेतू शकते. वाहने काळजीपूर्वक चालवावीत.

- यशवंत काळे, प्रभारी पोलीस अधीक्षक, हिंगोली

फोटो :

हिंगोली शहरात दीड वर्षातील अपघात -२०

मृत्यू - ०३

जखमी - १९

नियम पाळणे आवश्यक

अपघात टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे. राँगसाइडने वाहने नेण्याच्या नादात वाहतूक विस्कळीत होऊन अपघात होण्याची शक्यता असते.