शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

शार्टकटसाठी राँगसाइड चुकीचीच; ही वेळ बचत जीवघेणी ठरू शकते !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:20 IST

हिंगोली : वेळेची बचत करण्यासाठी अनेक वाहनचालक राँगसाइडने वाहने नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत असून अनेकांना ...

हिंगोली : वेळेची बचत करण्यासाठी अनेक वाहनचालक राँगसाइडने वाहने नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत असून अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. शहरातील विविध चौकांत सोमवारी अनेक वाहनचालक विरुद्ध बाजूने वाहने नेत असल्याचे पाहावयास मिळाले.

शहरासह जिल्हाभरात वाहने वाढली आहेत. परिणामी, रस्त्यावरील वाहतूक वाढली आहे. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी रस्त्यांवर दुभाजक टाकण्यात आले आहेत. अनेक वाहनचालक दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी शॉर्टकट वापरत आहेत. वेळेची बचत करण्याच्या नादात शॉर्टकट वाहने चालविणाऱ्यांमुळे समोरील वाहनचालकांनाही अपघाताला सामोरे जावे लागते. त्यामुळे शॉर्टकट जीवघेणा ठरू शकतो. अशा वाहनचालकांना आवर घालणे गरजेचे बनले आहे.

ही आहे राँगसाइड

इंदिरा गांधी चौक

बसस्थानक भागातून रामलीला मैदानाकडे जाणारी वाहने शहरातील इंदिरा गांधी चौक भागातून नेताना चौकाला वळसा घालून जाण्याऐवजी मधूनच वाहने नेण्याचा प्रयत्न करतात. सोमवारी अनेक वाहने येथून चुकीच्या दिशेने जाताना दिसत होती.

महात्मा गांधी चौक

इंदिरा गांधी चौकाकडून येणाऱ्या रस्त्याने समोर महात्मा गांधी चौक भागातून जवाहर रोडने जाणारी वाहने महात्मा गांधी चौकाला वळसा घालून जाण्याऐवजी शॉर्टकटने नेली जात आहेत. यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे.

रेल्वे उड्डाणपूल रिसाला बाजार

शहरातील रिसाला बाजार भागात असलेल्या रेल्वे उड्डाण पुलावरून शासकीय दवाखान्याकडे जाणारी वाहने थेट वळण घेत आहेत. त्यामुळे पाठीमागून येणारे वाहनचालक गोंधळून जात आहेत. त्यात येथे उतार असल्याने अपघाताला आमंत्रणच मिळत आहे.

धोकादायक वाहन चालविणे : सहा महिन्यांत सव्वासात लाखांचा दंड

कोरोनामुळे जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले होते. या काळात रस्त्यावर फारसी वाहतूक नव्हती. त्यामुळे राँगसाइडने वाहने चालविणारे चालक क्वचित आढळून येत होते. मात्र, चालू वर्षातील जूनपर्यंत ७३९ वाहनचालक धोकादायक पद्धतीने वाहन चालविताना पोलिसांना आढळले. या वाहनचालकांना पोलिसांनी ७ लाख ३९ हजारांचा दंड लावला आहे.

जिल्ह्यात रस्त्यांची कामे सुरू आहेत. पावसाळा असल्याने वाहने घसरून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच वेळेच्या बचतीसाठी राँगसाइडने वाहन चालविणे चुकीचे आहे. राँगसाइडने वाहन चालविणे जिवावर बेतू शकते. वाहने काळजीपूर्वक चालवावीत.

- यशवंत काळे, प्रभारी पोलीस अधीक्षक, हिंगोली

फोटो :

हिंगोली शहरात दीड वर्षातील अपघात -२०

मृत्यू - ०३

जखमी - १९

नियम पाळणे आवश्यक

अपघात टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे. राँगसाइडने वाहने नेण्याच्या नादात वाहतूक विस्कळीत होऊन अपघात होण्याची शक्यता असते.