शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
2
९ कंपन्यांचे IPO आजपासून झाले खुले, गुंतवणूकीचा विचार करताय का? पाहा GMP सह अन्य डिटेल्स
3
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
4
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
5
₹८५७ वर लिस्ट झाला हा आयपीओ; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना तुफान फायदा, झाले मालामाल
6
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
7
धनश्री वर्माने पोटगीसंदर्भात पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर केलं भाष्य; म्हणाली, "लोक जे बोलतात..."
8
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
9
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
10
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
11
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
12
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
13
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
14
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
15
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
16
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
17
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
18
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
19
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
20
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी

शार्टकटसाठी राँगसाइड चुकीचीच; ही वेळ बचत जीवघेणी ठरू शकते !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:20 IST

हिंगोली : वेळेची बचत करण्यासाठी अनेक वाहनचालक राँगसाइडने वाहने नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत असून अनेकांना ...

हिंगोली : वेळेची बचत करण्यासाठी अनेक वाहनचालक राँगसाइडने वाहने नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत असून अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. शहरातील विविध चौकांत सोमवारी अनेक वाहनचालक विरुद्ध बाजूने वाहने नेत असल्याचे पाहावयास मिळाले.

शहरासह जिल्हाभरात वाहने वाढली आहेत. परिणामी, रस्त्यावरील वाहतूक वाढली आहे. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी रस्त्यांवर दुभाजक टाकण्यात आले आहेत. अनेक वाहनचालक दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी शॉर्टकट वापरत आहेत. वेळेची बचत करण्याच्या नादात शॉर्टकट वाहने चालविणाऱ्यांमुळे समोरील वाहनचालकांनाही अपघाताला सामोरे जावे लागते. त्यामुळे शॉर्टकट जीवघेणा ठरू शकतो. अशा वाहनचालकांना आवर घालणे गरजेचे बनले आहे.

ही आहे राँगसाइड

इंदिरा गांधी चौक

बसस्थानक भागातून रामलीला मैदानाकडे जाणारी वाहने शहरातील इंदिरा गांधी चौक भागातून नेताना चौकाला वळसा घालून जाण्याऐवजी मधूनच वाहने नेण्याचा प्रयत्न करतात. सोमवारी अनेक वाहने येथून चुकीच्या दिशेने जाताना दिसत होती.

महात्मा गांधी चौक

इंदिरा गांधी चौकाकडून येणाऱ्या रस्त्याने समोर महात्मा गांधी चौक भागातून जवाहर रोडने जाणारी वाहने महात्मा गांधी चौकाला वळसा घालून जाण्याऐवजी शॉर्टकटने नेली जात आहेत. यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे.

रेल्वे उड्डाणपूल रिसाला बाजार

शहरातील रिसाला बाजार भागात असलेल्या रेल्वे उड्डाण पुलावरून शासकीय दवाखान्याकडे जाणारी वाहने थेट वळण घेत आहेत. त्यामुळे पाठीमागून येणारे वाहनचालक गोंधळून जात आहेत. त्यात येथे उतार असल्याने अपघाताला आमंत्रणच मिळत आहे.

धोकादायक वाहन चालविणे : सहा महिन्यांत सव्वासात लाखांचा दंड

कोरोनामुळे जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले होते. या काळात रस्त्यावर फारसी वाहतूक नव्हती. त्यामुळे राँगसाइडने वाहने चालविणारे चालक क्वचित आढळून येत होते. मात्र, चालू वर्षातील जूनपर्यंत ७३९ वाहनचालक धोकादायक पद्धतीने वाहन चालविताना पोलिसांना आढळले. या वाहनचालकांना पोलिसांनी ७ लाख ३९ हजारांचा दंड लावला आहे.

जिल्ह्यात रस्त्यांची कामे सुरू आहेत. पावसाळा असल्याने वाहने घसरून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच वेळेच्या बचतीसाठी राँगसाइडने वाहन चालविणे चुकीचे आहे. राँगसाइडने वाहन चालविणे जिवावर बेतू शकते. वाहने काळजीपूर्वक चालवावीत.

- यशवंत काळे, प्रभारी पोलीस अधीक्षक, हिंगोली

फोटो :

हिंगोली शहरात दीड वर्षातील अपघात -२०

मृत्यू - ०३

जखमी - १९

नियम पाळणे आवश्यक

अपघात टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे. राँगसाइडने वाहने नेण्याच्या नादात वाहतूक विस्कळीत होऊन अपघात होण्याची शक्यता असते.