शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

रमाईत तब्बल दहा हजार घरकुल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 00:13 IST

शबरीत ६१0 घरकुलांना प्रशासकीय मंजुरी

कमत न्यूज नेटवर्कहिंगोली : घरकुल योजनांमध्ये सर्वसाधारणच्या उद्दिष्टात कोणताच बदल झाला नसला तरीही शबरी व रमाईत वाढीव उद्दिष्ट आले आहे. त्यामुळे या योजनेत लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार आहे. शबरीत ६१0 जणांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली असून अजून पाचशे प्रस्तावांची गरज आहे. मात्र जात प्रमाणपत्रांची अडचण येत आहे. तर रमाई घरकुलमध्ये शासन वारंवार उद्दिष्ट बदलताना दिसत आहे.हिंगोली जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेत अवघ्या हजार घरकुलांच्या उद्दिष्टामुळे प्रत्येक तालुक्याला अतिशय कमी उद्दिष्ट आले होते. त्यामुळे या योजनेत विविध प्रवर्गातील लाभार्थी जाता सर्वसाधारणसाठी अत्यंत कमी घरकुल मिळत आहेत. आता शबरी योजनेत एकाचवेळी ११६0 घरकुलांचे उद्दिष्ट आ.संतोष टारफे यांच्या पाठपुराव्यामुळे आले आहे. या योजनेचा आढावा नुकताच सीईओ एच.पी.तुम्मोड यांनी घेतला. त्यांनी यात लाभार्थ्यांची सर्व कागदपत्रे एकाचवेळी घेतल्यास कामास गती देता येईल, असे बीडीओंना सुचविले. जात प्रमाणपत्र, आधार क्रमांक, नवीन बँक खाते क्रमांक, नमुना नं. आठ, मनरेगा जॉब कार्ड आदींच्या छायांकित प्रतीच सोबत घेण्यास सांगितले. यासाठी गरज पडल्यास कॅम्प लावण्यासही सांगितले. ६१0 लाभार्थ्यांना लाभ दिल्यानंतरही आणखी पाचशेवर लाभार्थ्यांची गरज आहे. जात प्रमाणपत्र नसल्याने अनेकांची अडचण होत आहे. त्यासाठी लाभार्थ्यांना मदत करण्याचे आवाहन केले.जुन्या रखडलेल्या कामांचाही आढावा घेण्यात आला. आगामी काळात घरकुलांची कामे मोठ्या प्रमाणात होणार असल्याने पंचायत समित्यांनी ही बाब गांभिर्याने घेण्यास सांगण्यात आले.रमाई घरकुल योजनेत मातंग समाजातील लाभार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून समाजकल्याण आयुक्तांनी २५ हजार अतिरिक्त घरकुलांना मंजुरी देण्याचे पत्र काढले आहे. यानुसार हिंगोली जिल्ह्यात मातंग समाजास ४५३ तर इतरांना साडेनऊ हजार घरकुलांचे उद्दिष्ट आहे. राज्यात अहमदनगर जिल्ह्याला १२ हजार ८२५ उद्दिष्ट असून त्यापाठोपाठ हिंगोलीला दहा हजारांचे उद्दिष्ट आहे. राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे उद्दिष्ट आहे. मराठवाड्यात औरंगाबाद-३ हजार, जालना -१७१४, बीड-३ हजार, परभणी-१५00, लातूर-६ हजार, उस्मानाबाद-२ हजार, नांदेड-५ हजार असे उद्दिष्ट आयुक्तांनी दिलेले आहे.४यात हिंगोली जिल्ह्यात शासनाने दिलेल्या उद्दिष्टानुसार मात्र जवळपास साडेतीन हजारच घरकुलांना मंजुरी आहे. त्यामुळे नेमके दहा हजार घरकुल होणार की, साडेतीन हजार हा प्रश्नच आहे. याबाबत आता पत्रव्यवहार सुरू झाला आहे. यातील संभ्रम दूर झाल्याशिवाय प्रशासनालाही तयारी करणे अवघड जाणार आहे. ऐनवेळी दहा हजाराचे उद्दिष्ट आले तर तेवढे प्रस्ताव जमविणेही कठीण जाणार आहे. तर दोन्ही बाबींची तयारी केली तर प्रस्ताव जमविलेल्या लाभार्थ्यांचा रोष पत्कारावा लागण्याचा धोका आहे. त्यामुळे यावर काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Hingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीgovernment schemeसरकारी योजना