शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

रेल्वेस्थानक निर्मनुष्य; प्रवाशांची गर्दीही ओसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:37 IST

हिंगोली: कोरोना महामारीचे रुग्ण जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांमध्ये वाढत असल्याचे पाहून प्रवाशांनी प्रवास करणे टाळले आहे. परिणामी, रेल्वेस्थानक निर्मनुष्य ...

हिंगोली: कोरोना महामारीचे रुग्ण जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांमध्ये वाढत असल्याचे पाहून प्रवाशांनी प्रवास करणे टाळले आहे. परिणामी, रेल्वेस्थानक निर्मनुष्य दिसत आहे. कोरोनामुळे पॅसेंजर रेल्वे तब्बल दीड वर्षांपासून बंदच आहे.

२३ मार्चपासून कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. कोरोनाआधी प्रत्येक रेल्वेगाडीतून जवळपास दोनशे ते तीनशे प्रवासी उतरायचे. परंतु, दीड वर्षांपासून प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याने केवळ दहा ते पंधरा प्रवासी उतरत पहायला मिळत आहेत. जिल्ह्यात वसमत, चोंडी, सिरली, बोल्डा, नांदापूर, नवलगाव, माळसेलू आदी छोटे स्टेशन आहेत. आजमितीस इंटरसिटीसह रेल्वेगाडीबरोबर इतर साप्ताहिक रेल्वेगाड्या सुरू आहेत. या सर्व रेल्वे एक्स्प्रेस असल्यामुळे छोट्या स्टेशनवर थांबत नाहीत. त्यामुळे प्रवाशांना हिंगोली येथे येऊनच पुढील प्रवास करावा लागत आहे.

कोरोना महामारीमुळे रुग्ण वाढत असल्याचे पाहून रेल्वे विभागाने कोल्हापूर ते नागपूर ही रेल्वेगाडी बंद केली आहे. सद्य:स्थितीत नरखेड ते काचीगुडा ही इंटरसिटी रेल्वे दररोज सुरू आहे. याचबरोबर जयपूर ते सिकंदराबाद, तिरुपती ते अमरावती, जयपूर ते हैदराबाद, नांदेड ते जम्मू या साप्ताहिक रेल्वेही नित्याने सुरू आहेत. परंतु, कोरोनामुळे कोणत्याच रेल्वेगाड्यांना प्रवासी नाहीत. हाऊसफुल्ल चालणाऱ्या सर्वच रेल्वे रिकाम्याच जात आहेत.

आजमितीस केवळ एक्सप्रेस रेल्वेच सुरू आहेत. कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता रेल्वेतील प्रवाशांना मास्क बंधनकारक केले आहे. जे प्रवासी विनामास्क प्रवास करतील त्यांना दंड भरावा लागेल, असा इशाराही रेल्वे विभागाने दिला आहे.

पॅसेंजर रेल्वे तब्बल दीड वर्षांपासून बंदच

२३ मार्च २०२० पासून कोरोनाने सर्वत्र शिरकाव केला. त्यामुळे रेल्वे विभागाने एक्सप्रेस रेल्वे वगळता पॅसेंंजर रेल्वे पूर्णत: बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. परजिल्ह्यातून आलेल्या प्रवाशांची तपासणीही केली जात आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने रेल्वेस्थानक येथे वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. प्रवासादरम्यान प्रवाशांनी स्वत:बरोबरच इतर प्रवाशांचीही काळजी घ्यावी.

-रामसिंग मिना, रेल्वेस्टेशन मास्टर, हिंगोली