शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

बेवारस मृतांच्या नातेवाइकांना शोधताना रेल्वे पोलिसांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:51 IST

हिंगोली: चालत्या रेल्वेखाली येऊन मृत पावलेल्या बेवारस मृतांच्या नातेवाइकांचा शोध घेण्यासाठी रेल्वे पोलीस कसोसीने प्रयत्न करतात, परंतु हा शोध ...

हिंगोली: चालत्या रेल्वेखाली येऊन मृत पावलेल्या बेवारस मृतांच्या नातेवाइकांचा शोध घेण्यासाठी रेल्वे पोलीस कसोसीने प्रयत्न करतात, परंतु हा शोध घेतेवेळेस मात्र त्यांची चांगलीच दमछाक होते.

हिंगोली जिल्हा रेल्वे पोलीस चौकी अंतर्गत वसमत, पांगरा शिंदे, बोल्डा, शिरळा, धामणी, कंजारा, चोंडी, जुनूना, माळसेलू, नवलगाव, कन्हेरगाव आदी जवळपास १५ छोटे स्टेशन येतात. या दरम्यान, बेवारस मृतदेह आढळल्यास हिंगोली रेल्वे पोलीस चौकीतील पोलिसांना त्याची सूचना केली जाते. यानंतर, हिंगोली रेल्वे पोलीस बेवारस मृतांच्या नातेवाइकांचा शोध घेण्यासाठी कसोसीने प्रयत्न करतात, परंतु बहुतांश वेळा त्यांची चांगलीच दमछाक होते. प्रारंभी मृतदेह आढल्यानंतर अनोळखी मृतदेह म्हणून त्याची नोंद रजिस्टरला केली जाते. सापडलेला मृतदेह नंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात विच्छेदनासाठी नेला जातो. तेथे दोन दिवस मृतदेह ठेवल्यानंतर कोणी नातेवाईक आला नाही, तर मृतदेहास सार्वजनिक स्मशानभूमीत पुरले जाते.

हिंगोली रेल्वे पोलीस चौकी अंतर्गत २०१९ मध्ये ५ मृतदेह सापडले होते. त्यापैकी २ मृतदेहाची ओळख पटली. २०२० मध्ये ३ मृतदेह आढळले होते. यापैकी २ मृतदेहांची ओळख पटली. २०१९ मध्ये झालेल्या अपघातात ५ व्यक्तींचा मृत्यू झाला, तर २०२० मध्ये झालेल्या अपघातात ३ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. नांदेडट पोलीस ठाण्यांतर्गत पोलीस उपनिरक्षक सोपान भाईक यांच्या मार्गदर्शदर्शनाखाली हिंगोली रेल्वे पोलीस चौकीमध्ये अंकुश बांगर, गणेश जाधव, सुनील घुगे, रवी राठोड आदी कार्यरत आहेत. पोलीस उपनिरीक्षक भाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस चौकीतील पोलीस कर्मचाऱ्यांना मृतदेहाची ओळख पटवून घेण्यासाठी, तसेच नातेवाइकांचा शोध करण्यासाठी पाठविले जात, परंतु बहुतांश वेळा नातेवाइकांचा शोध न लागल्यामुळे निराश होऊन परतावे लागते. यावेळी पोलिसांची चांगलीच दमछाक होते.

३ जणांची ओळख पटली नाही

२०१९ मध्ये ५ मृतदेह सापडले होेते, तर २०२० मध्ये ३ मृतदेह सापडले होते. पोलीस उपनिरीक्षक भाईके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास कार्य सुरू केले, परंतु अखेरपर्यत तीन मृतदेहांची ओळख मात्र पटली नाही. रेल्वे पोलीस नातेवाइकांचा शोध घेण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करतात. यात भरपूर अडचणी येत असल्यामुळे बेवारस नातेवाइकांचा शोध लागू शकत नाही, असे रेल्वे पोलीस प्रमुखांनी सांगितले.

प्रतिक्रिया

रेल्वे हे सर्वात मोठे प्रवासाचे साधन आहे. रेल्वे प्रवास करतेवेळेस सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तेव्हा आपला प्रवास सुखकर व्हावा, यासाठी आपल्या आप्तेष्टांजवळ काहीतरी ओळख ठेवून सर्वानी सुखकर असा प्रवास करावा. जेणेकरून काही अडचण आल्यास किंवा काही अपघात झाल्यास रेल्वे पोलिसांना शोध घेण्यासाठी सोयीचे होईल.

सोपान भाईके, पोलीस उपनिरीक्षक, रेल्वे पोलीस ठाणे, नांदेड

२०१९ मध्ये रेल्वे अपघातात मृत्यू

०५

२०२० मध्ये रेल्वे अपघातात मृत्यू

०३

२०१९

नन