शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

तीन दिवसांत सात हजार क्विंटल हळदीची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:20 IST

हिंगोली : पेरणीचे दिवस सद्य:स्थितीत संपले असून, शेतकरी आपल्याकडील हळद वेळ मिळेल तशी घेऊन येत आहेत. या आठवड्यातील तीन ...

हिंगोली : पेरणीचे दिवस सद्य:स्थितीत संपले असून, शेतकरी आपल्याकडील हळद वेळ मिळेल तशी घेऊन येत आहेत. या आठवड्यातील तीन दिवसांत जवळपास सात हजार क्विंटल हळदीची खरेदी झाल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नारायण पाटील यांनी दिली.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती हळदीसाठी चांगले मार्केट असल्यामुळे अमरावती, अकोला, अचलपूर, उमरखेड, ढाणकी, परभणी, गंगाखेड, मंठा, आदी ठिकाणांहून शेतकरी हळद घेऊन येतात. मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार हे चार दिवस कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असल्याचे पाहून शेतकरी सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी शेतीमाल घेऊन येतात. सध्या हळदीला सहा ते सात हजार ५०० रुपये असा भाव दिला जात आहे. चालू आठवड्यात जवळपास दोन हजार क्विंटल हळद खरेदीसाठी आणण्यात आली होती.

गत आठवड्यात पेरणीचे दिवस असल्यामुळे शेतकऱ्यांंना कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतीमाल आणता आला नाही. काही शेतकऱ्यांनी मात्र वेळात वेळ काढून हळद आणली होती. मागच्या आठवड्यात पाच हजार क्विंटल हळद खरेदी झाल्याचेही कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव पाटील यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनी कोरोनाचे नियम पाळावेत

कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतीमाल आणतेवेळेस कोरोनाच्या नियमांचे पालन करावे. कृषी दुकाने तसेच बाजारपेठेत विनाकारण गर्दी करू नये. प्रत्येक शेतकऱ्याने मास्कचा पुरेपूर वापर करावा, असे आवाहनही कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांना केले आहे.