शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

भाजीपाल्यासोबत डाळही अवाक्याबाहेर; मसूर डाळीने भूक भागविली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:19 IST

हिंगोली : इंधन, गॅस दरवाढीनंतर आता भाजीपाला आणि डाळींच्या किमतीही वाढल्या आहेत. घाऊक बाजारात दर काही प्रमाणात स्थिर असले ...

हिंगोली : इंधन, गॅस दरवाढीनंतर आता भाजीपाला आणि डाळींच्या किमतीही वाढल्या आहेत. घाऊक बाजारात दर काही प्रमाणात स्थिर असले तरी महागाईसाठी इंधन दरवाढ व आवक कमी असल्याचे कारण पुढे केले जात आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली आहे.

मागील काही महिन्यांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. इंधन दरवाढीने वाहतुकीचा खर्च वाढत आहे. त्यामुळे भाजीपाला व डाळीच्या किमती वाढत असल्याचे सांगितले जात आहे. त्यात कोरोनामुळे दुकाने उघडी ठेवण्यास पुन्हा निर्बंध आहेत. याचाही फटका दरवाढीला बसत आहे. हिंगोली येथील भाजी मंडईमध्ये गुरुवारी भाज्याची आवक बऱ्यापैकी असली तरी भाज्याचे दर प्रति किलो २० रुपयांपासून ते ८० रुपयांपर्यंत होते. आलू, कांदे वगळता इतर भाजीपाला प्रतिकिलो ३० रुपयांच्या पुढेच होता. हीच स्थिती डाळीच्या बाबतीतही होती. आगामी सण, उत्सव लक्षात घेता डाळीच्या किमतीतही १० ते २० रुपयांची दरवाढ गुरुवारी आढळून आली. इंधनाचे वाढते दर आणि कोरोनाच्या अनुषंगाने घातलेल्या निर्बंधांचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या दरावर होताना दिसत आहे.

म्हणून भाजीपाला कडाडला...

कोरोनामुळे शेतकऱ्यांकडील भाजीपाला बाजारपेठेत येणे कमी झाला आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर वधारले आहेत. किमान एखादा महिना तरी दर असेच राहण्याची शक्यता असल्याचे समगा येथील भाजीपाला विक्रेते मारोती पातळे यांनी सांगितले.

म्हणून डाळ महागली...

आगामी सण, उत्सव लक्षात घेता डाळींना मागणी वाढली आहे. मात्र, इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला आहे. तूर डाळ वगळता स्थानिक बाजारपेठेत इतर डाळी आयात कराव्या लागतात. त्यामुळेच डाळीचे दरही किंचित वाढले आहेत. सध्या तूर डाळ, ११०, मूग, उडीद ९० ते १०० तर मसूर डाळ ८० रुपये प्रमाणे विक्री होत असल्याचे विक्रेते शेख गौस यांनी सांगितले.

गॅस सिलिंडर, खाद्यतेलाचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे किचनमधील बजेट कोलमडले आहे. त्यात डाळी व भाजीपाल्याचे दरही वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांनी कसे जगायचे?

- सविता बांगर, वंजारवाडा, हिंगोली

कोरोनामुळे अगोदरच जगणे मुश्कील झाले आहे. त्यात गॅस, खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीची भर पडली आहे. आता भाजीपाला व डाळीचे दर वाढल्याने मोठी काटकसर करावी लागत आहे.

-पुष्पा जायभाये, आखाडा बाळापूर

डाळीचे दर (प्रति किलो)

तूर - १०५ ते १२०

मूग - ८५ ते ११०

उडीद - ९०ते ११०

मसूर - ७२ ते ८०

भाजीपाल्याचे दर (प्रति किलो)

वांगे - ८०

मिरची - ६०

भेंडी - ३०

चवळी - ४०

आलू - २०

टोमॅटो - ४०

आद्रक - ४०

दोडके - ४०

सर्वसामान्यांचे हाल