शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाल्यासोबत डाळही अवाक्याबाहेर; मसूर डाळीने भूक भागविली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:19 IST

हिंगोली : इंधन, गॅस दरवाढीनंतर आता भाजीपाला आणि डाळींच्या किमतीही वाढल्या आहेत. घाऊक बाजारात दर काही प्रमाणात स्थिर असले ...

हिंगोली : इंधन, गॅस दरवाढीनंतर आता भाजीपाला आणि डाळींच्या किमतीही वाढल्या आहेत. घाऊक बाजारात दर काही प्रमाणात स्थिर असले तरी महागाईसाठी इंधन दरवाढ व आवक कमी असल्याचे कारण पुढे केले जात आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली आहे.

मागील काही महिन्यांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. इंधन दरवाढीने वाहतुकीचा खर्च वाढत आहे. त्यामुळे भाजीपाला व डाळीच्या किमती वाढत असल्याचे सांगितले जात आहे. त्यात कोरोनामुळे दुकाने उघडी ठेवण्यास पुन्हा निर्बंध आहेत. याचाही फटका दरवाढीला बसत आहे. हिंगोली येथील भाजी मंडईमध्ये गुरुवारी भाज्याची आवक बऱ्यापैकी असली तरी भाज्याचे दर प्रति किलो २० रुपयांपासून ते ८० रुपयांपर्यंत होते. आलू, कांदे वगळता इतर भाजीपाला प्रतिकिलो ३० रुपयांच्या पुढेच होता. हीच स्थिती डाळीच्या बाबतीतही होती. आगामी सण, उत्सव लक्षात घेता डाळीच्या किमतीतही १० ते २० रुपयांची दरवाढ गुरुवारी आढळून आली. इंधनाचे वाढते दर आणि कोरोनाच्या अनुषंगाने घातलेल्या निर्बंधांचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या दरावर होताना दिसत आहे.

म्हणून भाजीपाला कडाडला...

कोरोनामुळे शेतकऱ्यांकडील भाजीपाला बाजारपेठेत येणे कमी झाला आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर वधारले आहेत. किमान एखादा महिना तरी दर असेच राहण्याची शक्यता असल्याचे समगा येथील भाजीपाला विक्रेते मारोती पातळे यांनी सांगितले.

म्हणून डाळ महागली...

आगामी सण, उत्सव लक्षात घेता डाळींना मागणी वाढली आहे. मात्र, इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला आहे. तूर डाळ वगळता स्थानिक बाजारपेठेत इतर डाळी आयात कराव्या लागतात. त्यामुळेच डाळीचे दरही किंचित वाढले आहेत. सध्या तूर डाळ, ११०, मूग, उडीद ९० ते १०० तर मसूर डाळ ८० रुपये प्रमाणे विक्री होत असल्याचे विक्रेते शेख गौस यांनी सांगितले.

गॅस सिलिंडर, खाद्यतेलाचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे किचनमधील बजेट कोलमडले आहे. त्यात डाळी व भाजीपाल्याचे दरही वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांनी कसे जगायचे?

- सविता बांगर, वंजारवाडा, हिंगोली

कोरोनामुळे अगोदरच जगणे मुश्कील झाले आहे. त्यात गॅस, खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीची भर पडली आहे. आता भाजीपाला व डाळीचे दर वाढल्याने मोठी काटकसर करावी लागत आहे.

-पुष्पा जायभाये, आखाडा बाळापूर

डाळीचे दर (प्रति किलो)

तूर - १०५ ते १२०

मूग - ८५ ते ११०

उडीद - ९०ते ११०

मसूर - ७२ ते ८०

भाजीपाल्याचे दर (प्रति किलो)

वांगे - ८०

मिरची - ६०

भेंडी - ३०

चवळी - ४०

आलू - २०

टोमॅटो - ४०

आद्रक - ४०

दोडके - ४०

सर्वसामान्यांचे हाल