शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

भाजीपाल्यासोबत डाळही अवाक्याबाहेर; मसूर डाळीने भूक भागविली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:19 IST

हिंगोली : इंधन, गॅस दरवाढीनंतर आता भाजीपाला आणि डाळींच्या किमतीही वाढल्या आहेत. घाऊक बाजारात दर काही प्रमाणात स्थिर असले ...

हिंगोली : इंधन, गॅस दरवाढीनंतर आता भाजीपाला आणि डाळींच्या किमतीही वाढल्या आहेत. घाऊक बाजारात दर काही प्रमाणात स्थिर असले तरी महागाईसाठी इंधन दरवाढ व आवक कमी असल्याचे कारण पुढे केले जात आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली आहे.

मागील काही महिन्यांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. इंधन दरवाढीने वाहतुकीचा खर्च वाढत आहे. त्यामुळे भाजीपाला व डाळीच्या किमती वाढत असल्याचे सांगितले जात आहे. त्यात कोरोनामुळे दुकाने उघडी ठेवण्यास पुन्हा निर्बंध आहेत. याचाही फटका दरवाढीला बसत आहे. हिंगोली येथील भाजी मंडईमध्ये गुरुवारी भाज्याची आवक बऱ्यापैकी असली तरी भाज्याचे दर प्रति किलो २० रुपयांपासून ते ८० रुपयांपर्यंत होते. आलू, कांदे वगळता इतर भाजीपाला प्रतिकिलो ३० रुपयांच्या पुढेच होता. हीच स्थिती डाळीच्या बाबतीतही होती. आगामी सण, उत्सव लक्षात घेता डाळीच्या किमतीतही १० ते २० रुपयांची दरवाढ गुरुवारी आढळून आली. इंधनाचे वाढते दर आणि कोरोनाच्या अनुषंगाने घातलेल्या निर्बंधांचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या दरावर होताना दिसत आहे.

म्हणून भाजीपाला कडाडला...

कोरोनामुळे शेतकऱ्यांकडील भाजीपाला बाजारपेठेत येणे कमी झाला आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर वधारले आहेत. किमान एखादा महिना तरी दर असेच राहण्याची शक्यता असल्याचे समगा येथील भाजीपाला विक्रेते मारोती पातळे यांनी सांगितले.

म्हणून डाळ महागली...

आगामी सण, उत्सव लक्षात घेता डाळींना मागणी वाढली आहे. मात्र, इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला आहे. तूर डाळ वगळता स्थानिक बाजारपेठेत इतर डाळी आयात कराव्या लागतात. त्यामुळेच डाळीचे दरही किंचित वाढले आहेत. सध्या तूर डाळ, ११०, मूग, उडीद ९० ते १०० तर मसूर डाळ ८० रुपये प्रमाणे विक्री होत असल्याचे विक्रेते शेख गौस यांनी सांगितले.

गॅस सिलिंडर, खाद्यतेलाचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे किचनमधील बजेट कोलमडले आहे. त्यात डाळी व भाजीपाल्याचे दरही वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांनी कसे जगायचे?

- सविता बांगर, वंजारवाडा, हिंगोली

कोरोनामुळे अगोदरच जगणे मुश्कील झाले आहे. त्यात गॅस, खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीची भर पडली आहे. आता भाजीपाला व डाळीचे दर वाढल्याने मोठी काटकसर करावी लागत आहे.

-पुष्पा जायभाये, आखाडा बाळापूर

डाळीचे दर (प्रति किलो)

तूर - १०५ ते १२०

मूग - ८५ ते ११०

उडीद - ९०ते ११०

मसूर - ७२ ते ८०

भाजीपाल्याचे दर (प्रति किलो)

वांगे - ८०

मिरची - ६०

भेंडी - ३०

चवळी - ४०

आलू - २०

टोमॅटो - ४०

आद्रक - ४०

दोडके - ४०

सर्वसामान्यांचे हाल