शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

२१२५ मोलकरणींच्या रोटीची सोय ; ८७५ जणींचे पोट कसे भरणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:29 IST

जिल्ह्यासह राज्यभरात कोरोनाचे रूग्ण वाढतच चालले आहेत. त्यामुळे शासनाने संचारबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा बंद ...

जिल्ह्यासह राज्यभरात कोरोनाचे रूग्ण वाढतच चालले आहेत. त्यामुळे शासनाने संचारबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे यावर काम करणाऱ्या मजूर, कामगारांच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या काळात मजूर, कामगार, घरेलू कामगारांच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी राज्य शासनाच्या वतीने आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मोलकरणींनाही आर्थिक मदत देण्याचे आश्वासन शासनाने दिले आहे. गतवर्षी कोरोनाच्या काळात सर्वात जास्त मोलकरणींना फटका बसला आहे. कोरोनामुळे हातचे काम गेल्याने रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे शासनाने अर्थसंकल्पात घोषणा करून मोलकरणींना मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी बीज भांडवल म्हणून २५० कोटींचा निधीही राखीव ठेवला होता. संत जनाबाई सामाजिक सुरक्षा व कल्याण योजनेंतर्गंत मोलकरणींची नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यात २ हजार १२५ मोलकरणींनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यात जवळपास ३ हजारापेक्षा अधिक महिला मोलकरीण म्हणून काम करतात. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने मदतीची घोषणा केली आहे. त्यानुसार २ हजार १२५ मोलकरणींना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असता तरी ज्या मोलकरणींनी नोंदणी केली नाही, अशा मोलकरणींच्या रोजी रोटीचा प्रश्न कसा मिटविणार, असा प्रश्न उभा राहत आहे.

सर्वाधिक नोंदणी हिंगोलीत

जिल्ह्यात जवळपास ३ हजारापेक्षा अधिक महिला मोलकरीण म्हणून काम करतात. सध्या कामगार विभागाकडे २ हजार १२५ महिलांची मोलकरणी म्हणून नोंद आहे. यात सर्वाधिक हिंगोली तालुक्यात नोंदणी असल्याचे कामगार विभागाकडून सांगण्यात आले.

मोलकरणींच्या नोंदणीचा घोळ...

येथील कामगार विभागामार्फत संत जनाबाई सामाजिक सुरक्षा व कल्याण योजनेंतर्गंत असंघटीत क्षेत्रातील कामगारांची नोंदणी केली जाते. शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या कामगार कल्याण योजनांची माहिती ग्रामीण भागापर्यंत पोहचली जात नाही. त्यामुळे खरे लाभार्थी या योजनेपासून वंचित राहत आहेत.

संघटनेअभावी नोंदणीचा आकडा कमीच

जिल्ह्यातील जवळपास सर्वच क्षेत्रात संघटना पहावयास मिळत आहेत. मात्र सध्या तरी हिंगोली जिल्ह्यात मोलकरणींची संघटना पहावयास मिळत नाही. त्यामुळे मोलकरणींना हक्क, अधिकारापासून वंचित रहावे लागत आहे.

गतवर्षी लॉकडाऊनमुळे रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला होता. कोरोनामुळे सर्व काम बंद झाल्याने उपासमारीची वेळ आली होती. आता शासनाच्या वतीने आर्थिक मदत देण्याची घोषणा झाली आहे. त्यानुसाार मदत मिळाल्यास रोजी-रोटीचा प्रश्न मिटण्यास मदत होईल.

- सुनिता राऊत

मोलकरणींसाठी शासकीय योजना आहे, हे माहीत नव्हते. गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये हाताला काम नसल्याने खूप गैरसोय झाली. आताही या योजनेविषयी माहिती नव्हती. अद्याप कामगार विभागाकडे नोंदणी केली नाही. त्यामुळे शासनाने नोंदणी करून मदत द्यावी.

- अफसाना बेगम