शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

२१२५ मोलकरणींच्या रोटीची सोय ; ८७५ जणींचे पोट कसे भरणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:29 IST

जिल्ह्यासह राज्यभरात कोरोनाचे रूग्ण वाढतच चालले आहेत. त्यामुळे शासनाने संचारबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा बंद ...

जिल्ह्यासह राज्यभरात कोरोनाचे रूग्ण वाढतच चालले आहेत. त्यामुळे शासनाने संचारबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे यावर काम करणाऱ्या मजूर, कामगारांच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या काळात मजूर, कामगार, घरेलू कामगारांच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी राज्य शासनाच्या वतीने आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मोलकरणींनाही आर्थिक मदत देण्याचे आश्वासन शासनाने दिले आहे. गतवर्षी कोरोनाच्या काळात सर्वात जास्त मोलकरणींना फटका बसला आहे. कोरोनामुळे हातचे काम गेल्याने रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे शासनाने अर्थसंकल्पात घोषणा करून मोलकरणींना मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी बीज भांडवल म्हणून २५० कोटींचा निधीही राखीव ठेवला होता. संत जनाबाई सामाजिक सुरक्षा व कल्याण योजनेंतर्गंत मोलकरणींची नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यात २ हजार १२५ मोलकरणींनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यात जवळपास ३ हजारापेक्षा अधिक महिला मोलकरीण म्हणून काम करतात. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने मदतीची घोषणा केली आहे. त्यानुसार २ हजार १२५ मोलकरणींना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असता तरी ज्या मोलकरणींनी नोंदणी केली नाही, अशा मोलकरणींच्या रोजी रोटीचा प्रश्न कसा मिटविणार, असा प्रश्न उभा राहत आहे.

सर्वाधिक नोंदणी हिंगोलीत

जिल्ह्यात जवळपास ३ हजारापेक्षा अधिक महिला मोलकरीण म्हणून काम करतात. सध्या कामगार विभागाकडे २ हजार १२५ महिलांची मोलकरणी म्हणून नोंद आहे. यात सर्वाधिक हिंगोली तालुक्यात नोंदणी असल्याचे कामगार विभागाकडून सांगण्यात आले.

मोलकरणींच्या नोंदणीचा घोळ...

येथील कामगार विभागामार्फत संत जनाबाई सामाजिक सुरक्षा व कल्याण योजनेंतर्गंत असंघटीत क्षेत्रातील कामगारांची नोंदणी केली जाते. शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या कामगार कल्याण योजनांची माहिती ग्रामीण भागापर्यंत पोहचली जात नाही. त्यामुळे खरे लाभार्थी या योजनेपासून वंचित राहत आहेत.

संघटनेअभावी नोंदणीचा आकडा कमीच

जिल्ह्यातील जवळपास सर्वच क्षेत्रात संघटना पहावयास मिळत आहेत. मात्र सध्या तरी हिंगोली जिल्ह्यात मोलकरणींची संघटना पहावयास मिळत नाही. त्यामुळे मोलकरणींना हक्क, अधिकारापासून वंचित रहावे लागत आहे.

गतवर्षी लॉकडाऊनमुळे रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला होता. कोरोनामुळे सर्व काम बंद झाल्याने उपासमारीची वेळ आली होती. आता शासनाच्या वतीने आर्थिक मदत देण्याची घोषणा झाली आहे. त्यानुसाार मदत मिळाल्यास रोजी-रोटीचा प्रश्न मिटण्यास मदत होईल.

- सुनिता राऊत

मोलकरणींसाठी शासकीय योजना आहे, हे माहीत नव्हते. गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये हाताला काम नसल्याने खूप गैरसोय झाली. आताही या योजनेविषयी माहिती नव्हती. अद्याप कामगार विभागाकडे नोंदणी केली नाही. त्यामुळे शासनाने नोंदणी करून मदत द्यावी.

- अफसाना बेगम