शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
3
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
4
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
5
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
6
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
7
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
8
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
9
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
10
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
11
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
12
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
13
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
15
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
16
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
17
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
18
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
19
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
20
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

पुन्हा ७३ शाळा सुरू करण्याचे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:30 IST

हिंगोली जिल्ह्यात जवळपास ३७३ शाळांमध्ये आठवी ते बारावीचे वर्ग आहेत. या शाळा सुरू करण्यासाठी गावपातळीवर समिती आहे. या समितीने ...

हिंगोली जिल्ह्यात जवळपास ३७३ शाळांमध्ये आठवी ते बारावीचे वर्ग आहेत. या शाळा सुरू करण्यासाठी गावपातळीवर समिती आहे. या समितीने मागील महिनाभरात गावात रुग्ण आढळला की नाही, याची चाचपणी करून शाळा सुरू करण्याचा निर्णय घ्यायचा आहे. अनेक गावांत मागील दोन महिन्यांपासून एकही रुग्ण नाही. मात्र तरीही शाळा सुरू करण्यासाठी नेमकी काय अडचण आहे? हे कळायला मार्ग नाही. ग्रामपातळीवर दैनंदिन सर्व व्यवहार सुरू आहेत. मुले एकत्रित खेळण्यासह गावात विविध धार्मिक कार्यक्रमांमध्येही सहभागी होताना दिसत आहेत. कोरोनाचा कहर कमी झाल्यापासून मास्कसह इतर सर्वच बाबींचा विसर पडल्याचे दिसत आहे. अशावेळी शाळा सुरू झाल्या तर या मुलांमध्ये जागृती करून त्यांच्यामार्फत पालकांनाही दक्षतेचे धडे देता येणार आहेत. मात्र समित्यांसह प्रशासकीय पातळीवरही शाळा सुरू करण्याबाबत उदासीनता दिसत आहे.

जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमलीची घटली आहे. शाळा सुरू करण्याबाबत शासनानेही स्पष्ट निकष ठरवून दिले आहेत. त्यानंतरही मुलाला शाळेत पाठवायचे की नाही, याची संमती पालकांनीच द्यायची आहे. मात्र शाळा सुरू करण्यासाठी एवढा विलंब होत असल्याने प्रशासकीय पातळीवरूनच शाळा सुरू न करण्याचा घाट घातला जात असल्याचे चित्र आहे.

माध्यमिक विभागाकडून आता ४० शाळा सुरू करण्याचे प्रस्ताव सज्ज आहेत. यापूर्वी ८ शाळा सुरू झाल्या आहेत. तर प्राथमिककडून ३३ शाळांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणार असल्याचे सांगितले जात आहे.