शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

२९ गावांतून ३५ अधिग्रहणाचे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 00:53 IST

जिल्ह्यात यंदाही अल्पपर्जन्यमान झाल्यामुळे दिवसेंदिवस पाणीप्रश्न तीव्र बनत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात २९ गावांतून अधिग्रहणाचे ३५ तर टँकरचे ६ प्रस्ताव पंचायत समित्यांकडे दाखल झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात यंदाही अल्पपर्जन्यमान झाल्यामुळे दिवसेंदिवस पाणीप्रश्न तीव्र बनत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात २९ गावांतून अधिग्रहणाचे ३५ तर टँकरचे ६ प्रस्ताव पंचायत समित्यांकडे दाखल झाले आहेत.जिल्ह्यातील २९ गावांमधील जलस्त्रोत आटले आहेत. त्यामुळे हळू- हळू पाणीटंचाईचे संकट निर्माण होत आहे. जिल्ह्यातील मोठ्या व लघु प्रकल्पांत अल्प पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे बहुतांश गावामध्ये फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती वाढल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसत आहे. हे संकट अधिकच गडद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने वेळीच दखल घेऊन अधिग्रहणाची मागणी आलेल्या गावांत पाहणी करुन पाण्याची व्यवस्था करुन देणे गरजेचे आहे. अन्यथा तहानलेल्या गावांची संख्या अजूनही वाढण्याची शक्यता आहे. सेनगाव तालुक्यात सध्यातरी पाणीटंचाईचे संकट निर्माण झालेले नसल्याने अजून तरी एकाही गावाचा प्रस्ताव पं.स.मध्ये आलेला नाही. मात्र हिंगोली तालुक्यात १४ गावातून १७ प्रस्ताव, कळमनुरी ८ गावातून १२ तर ४ टँकरचे प्रस्ताव. तर औंढा नागनाथ तालुक्यात ६ गावातून ६ आणि टँकरचे २ प्रस्ताव आलेले आहेत.एकंदरीत पाणीटंचाई अनेक गावांत सुरु झाली आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने मोजक्याच गावात पाणी आणण्यासाठी प्रयत्न होत आहेत. तर अनेक ग्रामपंचायती सुस्तावलेल्याच आहेत. त्यामुळे तेथील ग्रामस्थांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करण्याशिवाय पर्यायच नाही.हातपंप बंदच : डिझेल मंजूर होईना ?पंचायत समितीच्या वतीने ग्रामीण भागातील हातपंप दुरुस्तीसाठी संबंधित तंत्रज्ञाची नियुक्ती केलेली असते. परंतु गावो- गाव फिरण्यासाठी वाहनाची व्यवस्था नसतेच इकडून- तिकडून केली तर त्या वाहनाचे डिझेलच मंजूर होत नसल्याने ग्रामीण भागातील हातपंप दुरुस्त होत नाहीत. त्यामुळे अनेकगावातील हातपंप दुरुस्तीविनाच राहत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी इतरत्र भटकंती करण्याची वेळ टळत नाही. त्यामुळे निदान उन्हाळाभर तरी या यंत्रणेसाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करुन देण्याची मागणी आहे.जिल्ह्यात हळूहळू पाणीटंचाईचे चटके जाणवत आहेत. त्यामुळे अधिग्रहणाच्या प्रस्तावांत वाढच होत चालली असताना पं.स.कडे दाखल झालेल्या प्रस्तावांच्या मंजुरीकडे ग्रामपंचायतींचे लक्ष लागले आहे.