शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
2
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
3
चीनची दादागिरी संपणार! EV आणि संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक 'रेअर अर्थ' खनिजांसाठी सरकारचा मोठा प्लॅन
4
घरासाठी कर्ज घेण्यास लोकांचा सरकारी बँकांवर जास्त भरोसा; ४० टक्के कर्ज ७५ लाखांपेक्षा अधिक
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
MCX च्या शेअरनं गाठला ₹१०,२५० चा उच्चांकी स्तर; ₹१२,५०० पर्यंत जाऊ शकतो भाव, काय म्हणाले एक्सपोर्ट
7
झेपत असेल तरच बघा...! एकाने झेप्टोच्या डिलिव्हरी बॉयवर हात उचलला, तो पुरी पलटनच घेऊन आला...
8
भारतात टेस्ला कारच्या किमतीत २० लाख रुपयांची घट होण्याची शक्यता; मस्क कंपनीची उडाली घाबरगुंडी...
9
अल-कायदाचा कमांडर; पाकिस्तानमध्ये लपलाय हाफिज सईदपेक्षा मोठा दहशतवादी, अमेरिकेच्या टार्गेटवर!
10
FBI चे प्रमुख काश पटेल यांनी गर्लफ्रेंडला पुरवली कमांडो सुरक्षा, नोकरी जाण्याची चर्चा; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
11
चेतेश्वर पुजाराच्या मेव्हण्याने संपवलं जीवन, जिच्याशी ठरलेलं लग्न तिनेच केलेले 'तसले' आरोप
12
इम्रान खान यांची तुरुंगात हत्या? अफगाणी मीडियाचा मोठा दावा, पाकिस्तानात खळबळ...
13
जय श्रीराम! सर्वांत श्रीमंत मंदिरांच्या यादीत राम मंदिर, किती कोटींची झाली कमाई? आकडे पाहाच
14
१२ महिन्यांमध्ये २९,००० अंकांच्या पार जाणार निफ्टी? रिकव्हरीच्या ट्रॅकवर जातोय का इंडेक्स?
15
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
16
बायकोची हत्या केल्याच्या आरोपाखाली पती चार महिने तुरुंगात अन् पत्नी दिल्लीत प्रियकरासोबत आनंदात!
17
लष्करात सैनिकांची कमतरता! आता दरवर्षी १ लाख अग्निवीरांची भरती केली होणार
18
Kamla Pasand Owner Net Worth: कमला पसंदचे मालक कोण आणि किती आहे नेटवर्थ? एकेकाळी रस्त्याच्या कडेला विकायचे पान मसाला
19
ICC ODI Rankings : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेआधी हिटमॅन रोहित शर्मा पुन्हा 'नंबर वन'
20
५ लाखांपर्यंतचे उपचार फ्री! आता घरबसल्या बनवा 'आयुष्मान कार्ड'! 'या' कागदपत्रांची आवश्यकता
Daily Top 2Weekly Top 5

२९ गावांतून ३५ अधिग्रहणाचे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 00:53 IST

जिल्ह्यात यंदाही अल्पपर्जन्यमान झाल्यामुळे दिवसेंदिवस पाणीप्रश्न तीव्र बनत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात २९ गावांतून अधिग्रहणाचे ३५ तर टँकरचे ६ प्रस्ताव पंचायत समित्यांकडे दाखल झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात यंदाही अल्पपर्जन्यमान झाल्यामुळे दिवसेंदिवस पाणीप्रश्न तीव्र बनत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात २९ गावांतून अधिग्रहणाचे ३५ तर टँकरचे ६ प्रस्ताव पंचायत समित्यांकडे दाखल झाले आहेत.जिल्ह्यातील २९ गावांमधील जलस्त्रोत आटले आहेत. त्यामुळे हळू- हळू पाणीटंचाईचे संकट निर्माण होत आहे. जिल्ह्यातील मोठ्या व लघु प्रकल्पांत अल्प पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे बहुतांश गावामध्ये फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती वाढल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसत आहे. हे संकट अधिकच गडद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने वेळीच दखल घेऊन अधिग्रहणाची मागणी आलेल्या गावांत पाहणी करुन पाण्याची व्यवस्था करुन देणे गरजेचे आहे. अन्यथा तहानलेल्या गावांची संख्या अजूनही वाढण्याची शक्यता आहे. सेनगाव तालुक्यात सध्यातरी पाणीटंचाईचे संकट निर्माण झालेले नसल्याने अजून तरी एकाही गावाचा प्रस्ताव पं.स.मध्ये आलेला नाही. मात्र हिंगोली तालुक्यात १४ गावातून १७ प्रस्ताव, कळमनुरी ८ गावातून १२ तर ४ टँकरचे प्रस्ताव. तर औंढा नागनाथ तालुक्यात ६ गावातून ६ आणि टँकरचे २ प्रस्ताव आलेले आहेत.एकंदरीत पाणीटंचाई अनेक गावांत सुरु झाली आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने मोजक्याच गावात पाणी आणण्यासाठी प्रयत्न होत आहेत. तर अनेक ग्रामपंचायती सुस्तावलेल्याच आहेत. त्यामुळे तेथील ग्रामस्थांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करण्याशिवाय पर्यायच नाही.हातपंप बंदच : डिझेल मंजूर होईना ?पंचायत समितीच्या वतीने ग्रामीण भागातील हातपंप दुरुस्तीसाठी संबंधित तंत्रज्ञाची नियुक्ती केलेली असते. परंतु गावो- गाव फिरण्यासाठी वाहनाची व्यवस्था नसतेच इकडून- तिकडून केली तर त्या वाहनाचे डिझेलच मंजूर होत नसल्याने ग्रामीण भागातील हातपंप दुरुस्त होत नाहीत. त्यामुळे अनेकगावातील हातपंप दुरुस्तीविनाच राहत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी इतरत्र भटकंती करण्याची वेळ टळत नाही. त्यामुळे निदान उन्हाळाभर तरी या यंत्रणेसाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करुन देण्याची मागणी आहे.जिल्ह्यात हळूहळू पाणीटंचाईचे चटके जाणवत आहेत. त्यामुळे अधिग्रहणाच्या प्रस्तावांत वाढच होत चालली असताना पं.स.कडे दाखल झालेल्या प्रस्तावांच्या मंजुरीकडे ग्रामपंचायतींचे लक्ष लागले आहे.