शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

जवळा पांचाळ परिसरात हरभरा पिकाचे उत्पादन घटले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:26 IST

जवळा पांचाळ परिसरातील शेतकऱ्यांनी गहू व हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. परंतु हरभरा पिकाने शेतकऱ्यांना साथ दिली नसल्याचे ...

जवळा पांचाळ परिसरातील शेतकऱ्यांनी गहू व हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. परंतु हरभरा पिकाने शेतकऱ्यांना साथ दिली नसल्याचे शेतकरी वर्गातून सांगितले जात आहेे. तसेच यावर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन मूग, उडीद व तूर या खरीप पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला होता. तसेच अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचल्यामुळे पाण्याचा निचरा झाला नसल्याने रब्बी पिकांची पेरणी लांबणीवर गेली होती. अतिवृष्टीमुळे रब्बी पिकांच्या पेरणीला उशीर झाल्याने पिकांना हवी तेवढी थंडी व पोषक वातावरण मिळाले नसल्याने रब्बी पिकांच्या उत्पन्नात घट झाली आहे. त्याचबरोबर वारंवार ढगाळ वातावरण होत असल्याने फवारणी खर्च वाढला गेला होता. हरभरा काढण्यासाठी आल्याने जवळपास २,५०० रुपये प्रति बॅग प्रमाणे कापण्यात आले व मळणी यंत्रद्वारे काढण्यासाठी २२० रुपये प्रतिक्विंटल दराने काढण्यात आले. शेतकऱ्यांना एका एकरामध्ये तीन ते पाच क्विंटल प्रमाणे उत्पन्न निघत आहे. उत्पन्न कमी निघत असल्याने मळणी यंत्र मालकाला काहीच परवडत नसल्याचे सांगितले. म्हणून त्यांनी सुद्धा भावांमध्ये वाढ केली असल्याचे सांगितले जात आहे. यावर्षी रब्बी पिकाच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली असून शेतकरी वर्ग पुन्हा एकदा उत्पन्नाच्या कचाट्यात सापडला आहे. अनेक शेतकऱ्यांचा लागवडी खर्चही निघाला नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.