शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
5
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
6
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
7
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
8
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
9
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
10
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
11
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
12
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
13
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
14
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
15
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
16
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
17
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
18
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
19
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
20
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?

बस प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 23:26 IST

येथील बसस्थानकात नेहमीच चोरी किंवा पाकीटमारीच्या घटना घडतात. येथे दोन पोलीस कर्मचाºयांची नियुक्ती आहे. मात्र ते अधून-मधून कर्तव्य बजावतात. त्यामुळे चोरट्यांनाही वचक राहिला नाही. स्थानकातील पोलीस चौकी तर गायबच झाली आहे. परिणामी प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील बसस्थानकात नेहमीच चोरी किंवा पाकीटमारीच्या घटना घडतात. येथे दोन पोलीस कर्मचाºयांची नियुक्ती आहे. मात्र ते अधून-मधून कर्तव्य बजावतात. त्यामुळे चोरट्यांनाही वचक राहिला नाही. स्थानकातील पोलीस चौकी तर गायबच झाली आहे. परिणामी प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या बसस्थानकात ये-जा करणाºया प्रवाशांची नेहमी गर्दी असते. त्यात महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनींना बसची वाट बघत स्थानकात थांबावे लागते. यावेळी अनेक टवाळखोर स्थानकात फिरताना दिसत आहेत. पोलिसांनाही बसण्याची स्थानकात सुविधा नसल्यामुळे त्यांना परिसरातच भटकंती करावी लागते. त्यामुळे या ठिकाणी चौकीची सुविधा करणे गरजेचे आहे. मात्र पोलीस चौकीच्या व्यवस्थेसाठी आगाराकडे विशेष निधीची तरतूद नसल्यामुळे हे काम रेंगाळले आहे. याकडे पोलीस प्रशासन तसेच परभणी येथील एसटीच्या विभागीय कार्यालयातील संबधित अधिकाºयांनी लक्ष देण्याची मागणी आहे. ज्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सुटेल.स्थानकातील पोलीस चौकीच गायब...हिंगोली बसस्थानकात पुर्वी पोलिसांना बसण्यासाठी चौकीची व्यवस्था होती. परंतु चौकीही स्थानक परिसरात दिसत नाही. वेळोवेळी मागणी करूनही चौकीची व्यवस्था झाली नाही. शिवाय नवीन चौकीसाठी लागणारा खर्चही आगारातर्फे करण्याची तरतूद नाही. त्यामुळे पोलीस चौकीचाही प्रश्न आहे. पोलिसांच्या चौकी संदर्भात वरिष्ठांना कळविण्यात आल्याचे आगारप्रमुख पी. डी. चव्हाण यांनी सांगितले. किंवा स्थानक परिसरात सुविधा उपलब्ध करून दिली जाईल असेही ते म्हणाले. परंतु चौकीची सुविधा झाल्यानंतर तरी येथील चोरींच्या घटनांना आळा बसेल का? असा प्रश्न प्रवाशांतून आहे.