शहरं
Join us  
Trending Stories
1
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
2
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
3
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
4
४ ओव्हर्स, ७ रन्स आणि ८ विकेट्स! या गोलंदाजाने T20I मध्ये सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
5
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
6
एकट्याच्या जीवावर सिनेमा करुन दाखव..., 'दृश्यम ३'च्या दिग्दर्शकाचं अक्षय खन्नाला खुलं आव्हान
7
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
8
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
9
BMC Election 2026 Shiv Sena UBT List: उद्धवसेनेकडून मुंबई महापालिकेसाठी ५५ जणांना उमेदवारी, कोणाला मिळाले एबी फॉर्म?
10
सावधान! तुमच्या नावावर भलतेच कोणी सिम वापरत नाहीये ना? 'या' पोर्टलवर घरबसल्या करा तपासणी
11
मकर राशीसाठी नवीन वर्ष 2026: जुन्या आव्हानांचा होणार अंत; प्रगतीसाठी 'हे' सूत्र वापरा आणि यश मिळवा!
12
२०२५ची शेवटची पुत्रदा एकादशी: कसे कराल व्रतपूजन?; ‘या’ गोष्टी आवर्जून करा, पुण्य-लाभ मिळेल!
13
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
14
Silver Price Crash: एका तासात चांदी २१ हजार रुपयांनी आपटली; विक्रमी उच्चांकानंतर किमतीत का आला भूकंप?
15
"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
16
‘मोदी आणि ईव्हीएमच्या बळावर भाजपा माज करतोय, कोणत्याही परिस्थितीत मुंबईला वाचवायचंय’, राज ठाकरेंचं मोठं विधान 
17
मालेगावात महायुतीचे नेमके अडले कुठे? आता चर्चा वरिष्ठ स्तरावर; स्थानिक पातळीवर एकमत होईना
18
VHT 2025 : टीम इंडियातील 'ध्रुवतारा' चमकला! पांड्याच्या संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं
19
पश्चिममध्ये तीन प्रभागांत भाजप विरुद्ध भाजप! शिंदेसेना- राष्ट्रवादी एकत्र, महाविकास आघाडीचा प्रभाव
20
५ वर्षांत १०००% चं रिटर्न, आज अचानक जोरदार आपटला हा शेअर; कोणता आहे स्टॉक, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खून खटल्यात मुख्याध्यापकास शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 23:19 IST

जिल्ह्यातील खानापूर चित्ता येथील विद्यासारग विद्यालयातील बहुचर्चित सहशिक्षक संजय क्षीरसागर खून खटला प्रकरणातील आरोपी मुख्याध्यापक भारत नेमीनाथ साळवे उर्फ गुरू यास उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ७ वर्षे सश्रम कारावास व २ लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तर संस्थाध्यक्ष तुकाराम पाटील जाधव यांची निर्दोष मुक्तता केली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील खानापूर चित्ता येथील विद्यासारग विद्यालयातील बहुचर्चित सहशिक्षक संजय क्षीरसागर खून खटला प्रकरणातील आरोपी मुख्याध्यापक भारत नेमीनाथ साळवे उर्फ गुरू यास उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ७ वर्षे सश्रम कारावास व २ लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तर संस्थाध्यक्ष तुकाराम पाटील जाधव यांची निर्दोष मुक्तता केली.शिक्षण क्षेत्रात हा खून खटला मोठ्या प्रमाणात गाजला होता. तेव्हापासून निर्माण झालेले वाद आजतागायत सुरू आहेत. ८ नोव्हेंबर १९९८ रोजी पगाराच्या कारणावरून हिंगोली येथील नांदेड नाक्यावर दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास मुख्याध्यापक भारत साळवे व तुकाराम पाटील यांनी संगनमताने संजय क्षीरसागर यांचा खून केल्याचा आरोप होता याप्रकरणी सहशिक्षक संजय टाकळगव्हाणकर यांच्या फिर्यादीवरून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होऊन सुनावणी झाली. २००१ मध्ये अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयाने यात भारत नेमीनाथ साळवे यास खूनप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. तर तुकाराम पाटील यांना भादंविच्या क. ३२६ अन्वये ५ वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली होती.अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरूद्ध उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात येथे भारत साळवे व तुकाराम पाटील यांनी वेगवेगळी अपील दाखल केली होती. सदर अपिलाची सुनावणी न्यायमूर्ती टी.व्ही. नलावडे व न्यायमूर्ती ए.एम. ढवळे यांच्या खंडपीठासमोर झाली.न्यायालयाने भारत साळवे यांची खून प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली. पण खुनाच्या बाबतीत कलम ३०४ (१) अंतर्गत दोषी मानून ७ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा पूर्वी भोगलेल्या कारावासाच्या कालावधीत सुट न देता ठोठावली. तर २ लाख रुपये दंड हा मयत संजय क्षीरसागर यांच्या वारसाला द्यावा, असा आदेश दिला. तर संस्थाध्यक्ष तुकाराम पाटील यांची निर्दोष मुक्तता केली. अपिलार्थी यांच्या वतीने अ‍ॅड. राजेंद्र देशमुख यांनी काम पाहिले. त्यास अ‍ॅड. गोविंद कुलकर्णी, अ‍ॅड. निर्मल दायमा, अ‍ॅड. कृणाल काळे यांनी सहकार्य केले. शासनाच्या वतीने अ‍ॅड. विशाल बडाख यांनी काम पाहिले.