शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दूध, साखरेचे भाव जैसे थे; मग मिठाईचे महाग का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:37 IST

हिंगोली: सणासुदीच्या दिवसांमध्ये गोड पदार्थाला मागणी असते, परंतु गणेशोत्सव काळातच मिठाईचे दर वाढल्याचे पाहायला मिळत आहेत. या दरावर कोणाचे ...

हिंगोली: सणासुदीच्या दिवसांमध्ये गोड पदार्थाला मागणी असते, परंतु गणेशोत्सव काळातच मिठाईचे दर वाढल्याचे पाहायला मिळत आहेत. या दरावर कोणाचे नियंत्रण असते हे कळायला मात्र मार्ग नाही.

सद्यस्थितीत दूध ६० रुपये लिटर, तेल १४० ते १६० रुपये किलो, साखर ४० रुपये किलो आहे. या मानाने मिठाईचे दर मात्र गगनाला भिडले आहेत. सणासुदीच्या काळात गोडधोड खावे की नाही, हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. कोरोनाआधी जे भाव होते तेच भाव आजही पाहायला मिळत आहेत. मिठाईचे दर तयार झालेल्या मिठाईनंतर ठरविले जातात, असे स्वीटमार्ट चालकांनी सांगितले.

मिठाईचे दर (प्रतिकिलो)

मलई पेढा २८० आधीचा दर

२८० गणेशोत्सवात

अंजीर बर्फी ४०० आधीचा दर

४०० गणेशोत्सवात

कलाकंद बर्फी ३२० आधीचा दर

३२० गणेशोत्सवात

बदाम बर्फी ४०० आधीचा दर

४०० गणेशोत्सवात

दरांवर कोणाचे नियंत्रण?

साखर, दूध व इतर पदार्थाचे भाव जैसे थे असताना मिठाईचे दर मात्र वाढलेले पाहायला मिळत आहेत. मिठाईचा दर स्वीटमार्ट चालकच ठरवितात. यावर कोणाचेही नियंत्रण नसते, असे एका मिठाई चालकाने सांगितले.

ग्राहक काय म्हणतात...

सणासुदीच्या काळात घरोघरी गोडधोड केले जाते, परंतु यावर्षी मिठाईचे दर जास्त प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे गोड पदार्थ खावे की नाही, हा प्रश्नच आहे.

-ज्ञानेश्वर सुरुशे, नागरिक

स्वीटमार्ट चालकांनी मिठाईचे दर वाढविल्यामुळे सणासुदीला कमी प्रमाणात मिठाई घरी आणावी लागते. साखरेचे प्रमाणही बहुतांश मिठाईमध्येच जास्त आहे.

विकास गिरी, नागरिक

का वाढले दर?

गत काही महिन्यांपासून दूध, साखर, गॅस, तेल आदीचे भाव वाढले आहेत. हे सर्व करत असताना कामगारांनाही पगार द्यावा लागतो. त्यामुळे मिठाईचे दर वाढले गेले आहेत.

-मख्खन शर्मा, स्वीटमार्ट चालक

कोरोनाआधी जे भाव होते तेच भाव गणेशोत्सव काळात कायम आहेत. महागाईने मागील काही दिवसांपासून कळस गाठला आहे. त्यामुळे मिठाईचे दर वाढले गेल्याचे एका स्वीटमार्ट चालकाने सांगितले.

भेसळ केल्यास कारवाई अटळ

सणासुदीच्या काळात कोणत्याही पदार्थात भेसळ केल्यास किंवा काही शंका असल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाला कळवावे. तक्रारीनुसार त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

- पी.एस. कच्छवे, निरीक्षक