शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

दूध, साखरेचे भाव जैसे थे; मग मिठाईचे महाग का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:37 IST

हिंगोली: सणासुदीच्या दिवसांमध्ये गोड पदार्थाला मागणी असते, परंतु गणेशोत्सव काळातच मिठाईचे दर वाढल्याचे पाहायला मिळत आहेत. या दरावर कोणाचे ...

हिंगोली: सणासुदीच्या दिवसांमध्ये गोड पदार्थाला मागणी असते, परंतु गणेशोत्सव काळातच मिठाईचे दर वाढल्याचे पाहायला मिळत आहेत. या दरावर कोणाचे नियंत्रण असते हे कळायला मात्र मार्ग नाही.

सद्यस्थितीत दूध ६० रुपये लिटर, तेल १४० ते १६० रुपये किलो, साखर ४० रुपये किलो आहे. या मानाने मिठाईचे दर मात्र गगनाला भिडले आहेत. सणासुदीच्या काळात गोडधोड खावे की नाही, हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. कोरोनाआधी जे भाव होते तेच भाव आजही पाहायला मिळत आहेत. मिठाईचे दर तयार झालेल्या मिठाईनंतर ठरविले जातात, असे स्वीटमार्ट चालकांनी सांगितले.

मिठाईचे दर (प्रतिकिलो)

मलई पेढा २८० आधीचा दर

२८० गणेशोत्सवात

अंजीर बर्फी ४०० आधीचा दर

४०० गणेशोत्सवात

कलाकंद बर्फी ३२० आधीचा दर

३२० गणेशोत्सवात

बदाम बर्फी ४०० आधीचा दर

४०० गणेशोत्सवात

दरांवर कोणाचे नियंत्रण?

साखर, दूध व इतर पदार्थाचे भाव जैसे थे असताना मिठाईचे दर मात्र वाढलेले पाहायला मिळत आहेत. मिठाईचा दर स्वीटमार्ट चालकच ठरवितात. यावर कोणाचेही नियंत्रण नसते, असे एका मिठाई चालकाने सांगितले.

ग्राहक काय म्हणतात...

सणासुदीच्या काळात घरोघरी गोडधोड केले जाते, परंतु यावर्षी मिठाईचे दर जास्त प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे गोड पदार्थ खावे की नाही, हा प्रश्नच आहे.

-ज्ञानेश्वर सुरुशे, नागरिक

स्वीटमार्ट चालकांनी मिठाईचे दर वाढविल्यामुळे सणासुदीला कमी प्रमाणात मिठाई घरी आणावी लागते. साखरेचे प्रमाणही बहुतांश मिठाईमध्येच जास्त आहे.

विकास गिरी, नागरिक

का वाढले दर?

गत काही महिन्यांपासून दूध, साखर, गॅस, तेल आदीचे भाव वाढले आहेत. हे सर्व करत असताना कामगारांनाही पगार द्यावा लागतो. त्यामुळे मिठाईचे दर वाढले गेले आहेत.

-मख्खन शर्मा, स्वीटमार्ट चालक

कोरोनाआधी जे भाव होते तेच भाव गणेशोत्सव काळात कायम आहेत. महागाईने मागील काही दिवसांपासून कळस गाठला आहे. त्यामुळे मिठाईचे दर वाढले गेल्याचे एका स्वीटमार्ट चालकाने सांगितले.

भेसळ केल्यास कारवाई अटळ

सणासुदीच्या काळात कोणत्याही पदार्थात भेसळ केल्यास किंवा काही शंका असल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाला कळवावे. तक्रारीनुसार त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

- पी.एस. कच्छवे, निरीक्षक