शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

जोड रस्त्यावर खड्डेच खड्डे; वाहनचालक वैतागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:31 IST

वीज खंडित होत असल्यामुळे शेतकरी त्रस्त कळमनुरी: तालुक्यातील अनेक गावांतील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. यामुळे पिकांना पाणी देणेही ...

वीज खंडित होत असल्यामुळे शेतकरी त्रस्त

कळमनुरी: तालुक्यातील अनेक गावांतील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. यामुळे पिकांना पाणी देणेही शक्य होत नाही. वीज खंडित झाल्यास दिवसभर ताटकळत बसावे लागत आहे. पिकांना पाणी नसल्यामुळे पिके सुकून जात आहेत. महावितरण कंपनीच्या वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था

शिरडशहापूर: औंढा तालुक्यातील शिरशडहापूर येथील वार्ड क्र. ३ मधील दोन्ही सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे हे शौचालय अनेक दिवसांपासून बंदच आहे. यामुळे या भागातील ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. ग्रामपंचायतीने लक्ष देण्याची मागगणी होत आहे.

शिरडशहापूर येथे कचऱ्याची ढिगारे

शिरडशहापूर: औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील ग्रामपंचायतीचे कर्मचारी पगार नसल्यामुळे संपावर गेले आहेत. त्यांच्या मागण्या शासनाने अजूनही मंजूर केल्या नाहीत. कर्मचारी संपावर गेल्यामुळे गावात ठिकठिकाणी कचऱ्याची ढीग साचले आहेत. सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. शासनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून गावात स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.

मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी

हिंगोली: शहरातील बसस्थानक, नांदेड नाका, औंढा रोड आदी भागांत मोकाट जनावरे रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसत आहेत, त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. जनावरांना ओलांडून मार्ग काढावा लागत आहे. नगरपरिषदेच्या संबंधित विभागाने याची दखल घेऊन मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.

वळण रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची मागणी

कळमनुरी: तालुक्यातील आखाडा बाळापूर, डोंगरकडा, कांडली आदी भागांतील वळण रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. वळण रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनचालकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वळण रस्त्यांवरील खड्ड्यात डांबरमिश्रित गिट्टी टाकावी, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

जड वाहनामुळे वाहतुकीस अडथळा

हिंगोली: मागील काही दिवसांपासून शहरातील महावीर चौक, गांधी चौक, शास्त्रीनगर, तोफखाना आदी भागांत जड वाहने येत आहेत. या जड वाहनामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. शहर वाहतूक शाखेने याची दखल घेऊन जड वाहनांना वर्दळीच्या ठिकाणी येण्यास मज्जाव करावा, अशी मागणी होत आहे.