शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

जोड रस्त्यावर खड्डेच खड्डे; वाहनचालक वैतागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:31 IST

वीज खंडित होत असल्यामुळे शेतकरी त्रस्त कळमनुरी: तालुक्यातील अनेक गावांतील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. यामुळे पिकांना पाणी देणेही ...

वीज खंडित होत असल्यामुळे शेतकरी त्रस्त

कळमनुरी: तालुक्यातील अनेक गावांतील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. यामुळे पिकांना पाणी देणेही शक्य होत नाही. वीज खंडित झाल्यास दिवसभर ताटकळत बसावे लागत आहे. पिकांना पाणी नसल्यामुळे पिके सुकून जात आहेत. महावितरण कंपनीच्या वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था

शिरडशहापूर: औंढा तालुक्यातील शिरशडहापूर येथील वार्ड क्र. ३ मधील दोन्ही सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे हे शौचालय अनेक दिवसांपासून बंदच आहे. यामुळे या भागातील ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. ग्रामपंचायतीने लक्ष देण्याची मागगणी होत आहे.

शिरडशहापूर येथे कचऱ्याची ढिगारे

शिरडशहापूर: औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील ग्रामपंचायतीचे कर्मचारी पगार नसल्यामुळे संपावर गेले आहेत. त्यांच्या मागण्या शासनाने अजूनही मंजूर केल्या नाहीत. कर्मचारी संपावर गेल्यामुळे गावात ठिकठिकाणी कचऱ्याची ढीग साचले आहेत. सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. शासनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून गावात स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.

मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी

हिंगोली: शहरातील बसस्थानक, नांदेड नाका, औंढा रोड आदी भागांत मोकाट जनावरे रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसत आहेत, त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. जनावरांना ओलांडून मार्ग काढावा लागत आहे. नगरपरिषदेच्या संबंधित विभागाने याची दखल घेऊन मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.

वळण रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची मागणी

कळमनुरी: तालुक्यातील आखाडा बाळापूर, डोंगरकडा, कांडली आदी भागांतील वळण रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. वळण रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनचालकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वळण रस्त्यांवरील खड्ड्यात डांबरमिश्रित गिट्टी टाकावी, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

जड वाहनामुळे वाहतुकीस अडथळा

हिंगोली: मागील काही दिवसांपासून शहरातील महावीर चौक, गांधी चौक, शास्त्रीनगर, तोफखाना आदी भागांत जड वाहने येत आहेत. या जड वाहनामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. शहर वाहतूक शाखेने याची दखल घेऊन जड वाहनांना वर्दळीच्या ठिकाणी येण्यास मज्जाव करावा, अशी मागणी होत आहे.