शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

मसोड ते कनका रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:52 IST

बसस्थानकाच्या परिसरात कचऱ्याचे ढीग आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील बसस्थानकाच्या परिसरात कचऱ्याचे ढीग साचलेले पाहायला मिळत ...

बसस्थानकाच्या परिसरात कचऱ्याचे ढीग

आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील बसस्थानकाच्या परिसरात कचऱ्याचे ढीग साचलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे. एस. टी. महामंडळाच्या वरिष्ठांनी याची दखल घेऊन बसस्थानकाच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

शहर व परिसरात विजेचा लपंडाव

कळमनुरी : शहरासह परिसरातील ग्रामीण भागात विजेचा लपंडाव नित्याचाच झाला आहे. वीज खंडित होत असल्यामुळे विजेवर चालणारी उपकरणे जळून जात आहेत. तसेच पिकांना पाणीही देता येत नाही. परिणामी पिके वाळून जात आहेत. महावितरण कंपनीने याची दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

पिण्याच्या पाण्याची सोय करण्याची मागणी

हिंगोली : शहरातील बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे प्रवाशांना हॉटेलमध्ये जाऊन पाणी विकत घ्यावे लागत आहे. याबाबत प्रवाशांनी वेळोवेळी पाण्याची मागणी केली; परंतु, कोणीही अद्याप लक्ष दिले नाही. आगारप्रमुखांनी याची दखल घेऊन पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

‘हरभऱ्यावर फवारणी करावी’

हिंगोली : हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी पाच टक्के निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के ईसी २० मि. लि. किंवा इमामेक्टीन बेन्झोएट पाच टक्के ४.५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकात उपलब्धतेनुसार व पिकाच्या आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमेथोट ३० टक्के १३ मि.लि. किंवा असिफेट ७५ टक्के १० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असा सल्ला ‘वनामकृ’ विद्यापीठाने दिला आहे.

हरितद्रव्याची कमी दिसल्यास फवारणीचा सल्ला

हिंगोली : आंबे बहार, संत्रा-मोसंबीस बागेत पाणी व्यवस्थापन करावे. आंबे बहार, संत्रा-मोसंबी बागेमध्ये पानावर हरितद्रव्याची कमतरता दिसून येत असल्यास बागेत झिंक सल्फेट पाच ग्राम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या मृग बहार संत्रा मोसंबी फळांची काढणी करावी. आंबे बहार डाळिंब बागेत पाणी व्यवस्थापन करावे. चिकू बागेस पाणी द्यावे, असा सल्ला ‘वनामकृ’ विद्यापीठाने दिला आहे.