शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

मसोड ते कनका रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:52 IST

बसस्थानकाच्या परिसरात कचऱ्याचे ढीग आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील बसस्थानकाच्या परिसरात कचऱ्याचे ढीग साचलेले पाहायला मिळत ...

बसस्थानकाच्या परिसरात कचऱ्याचे ढीग

आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील बसस्थानकाच्या परिसरात कचऱ्याचे ढीग साचलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे. एस. टी. महामंडळाच्या वरिष्ठांनी याची दखल घेऊन बसस्थानकाच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

शहर व परिसरात विजेचा लपंडाव

कळमनुरी : शहरासह परिसरातील ग्रामीण भागात विजेचा लपंडाव नित्याचाच झाला आहे. वीज खंडित होत असल्यामुळे विजेवर चालणारी उपकरणे जळून जात आहेत. तसेच पिकांना पाणीही देता येत नाही. परिणामी पिके वाळून जात आहेत. महावितरण कंपनीने याची दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

पिण्याच्या पाण्याची सोय करण्याची मागणी

हिंगोली : शहरातील बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे प्रवाशांना हॉटेलमध्ये जाऊन पाणी विकत घ्यावे लागत आहे. याबाबत प्रवाशांनी वेळोवेळी पाण्याची मागणी केली; परंतु, कोणीही अद्याप लक्ष दिले नाही. आगारप्रमुखांनी याची दखल घेऊन पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

‘हरभऱ्यावर फवारणी करावी’

हिंगोली : हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी पाच टक्के निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के ईसी २० मि. लि. किंवा इमामेक्टीन बेन्झोएट पाच टक्के ४.५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकात उपलब्धतेनुसार व पिकाच्या आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमेथोट ३० टक्के १३ मि.लि. किंवा असिफेट ७५ टक्के १० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असा सल्ला ‘वनामकृ’ विद्यापीठाने दिला आहे.

हरितद्रव्याची कमी दिसल्यास फवारणीचा सल्ला

हिंगोली : आंबे बहार, संत्रा-मोसंबीस बागेत पाणी व्यवस्थापन करावे. आंबे बहार, संत्रा-मोसंबी बागेमध्ये पानावर हरितद्रव्याची कमतरता दिसून येत असल्यास बागेत झिंक सल्फेट पाच ग्राम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या मृग बहार संत्रा मोसंबी फळांची काढणी करावी. आंबे बहार डाळिंब बागेत पाणी व्यवस्थापन करावे. चिकू बागेस पाणी द्यावे, असा सल्ला ‘वनामकृ’ विद्यापीठाने दिला आहे.