शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

ना उद्योग जिल्ह्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळही निर्धास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:20 IST

हिंगाेली : जिल्ह्यातील पाच साखर कारखाने वगळता इतर एकही मोठा प्रदूषणकारी कारखाना नसल्याने सध्या तरी प्रदूषणापासून मुक्ती मिळत आहे. ...

हिंगाेली : जिल्ह्यातील पाच साखर कारखाने वगळता इतर एकही मोठा प्रदूषणकारी कारखाना नसल्याने सध्या तरी प्रदूषणापासून मुक्ती मिळत आहे. त्यामुळेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी जिल्ह्याकडे फिरकतही नसल्याचे समोर आले आहे.

हिंगोली जिल्ह्याची ओळख ना उद्योग जिल्हा अशीच आहे. जिल्हा निर्मितीनंतर एकही मोठा उद्योग जिल्ह्यात उभा राहू शकला नाही. सध्या जिल्ह्यात पाच साखर कारखाने असून सहा हजार सूक्ष्म व लघू उद्योग असल्याची नोंद जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे आहे. लहान सहान उद्योगातून फारसे प्रदूषण होत नसल्याचा दावा केला जात असला तरी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय परभणी येथे असल्याने प्रदूषण रोखण्याला मर्यादा येत आहेत. परभणीतूनच हिंगोली जिल्ह्याचा कारभार पाहिला जातो.

यासंदर्भात हिंगोली जिल्ह्याचे कामकाज पाहणाऱ्या अधिकाऱ्याशी मोबाइलवरून संपर्क साधला असता परभणी येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, जिल्ह्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय हिंगोलीत नसल्याने प्रदूषणमुक्तीला खिळ बसल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रदूषणाची पातळी किती आहे? प्रदूषणामुळे काय परिणाम होतोय? याबाबतच्या जनजागृतीपासून नागरिक अनभिज्ञ असल्याचे चित्र आहे.