शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

रात्री १० नंतर शहरातील चौकांतून पोलीस गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:40 IST

रिॲलिटी चेक लोगो वापरावा.. हिंगोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रात्रीला संचारबंदी लागू केली आहे. रात्री ७ वाजेपूर्वी काही मिनिटे ...

रिॲलिटी चेक लोगो वापरावा..

हिंगोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रात्रीला संचारबंदी लागू केली आहे. रात्री ७ वाजेपूर्वी काही मिनिटे अगोदर पोलिसांची गाडी हिंगोली शहरातून सूचना देत फिरत असली तरी रात्री १० वाजेनंतर शहरातील एकाही चौकात पोलीस थांबत नसल्याचे चित्र २५ फेब्रुवारी रोजी केलेल्या पाहणीत आढळून आले.

जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. आठवडाभरात दोन रूग्णांचा मृत्यू झाला. आजपर्यंतची कोरोनाबाधितांची संख्या ४ हजार ५ झाली आहे. सध्या १७१ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. दररोज आढळणाऱ्या कोरोनाच्या रूग्ण संख्येमुळे जिल्ह्यात रात्रीला संचारबंदी लागू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. २४ फेब्रुवारीपासून या निर्णयाच्या अंमलबजावणीस सुरूवात झाली. पहिल्या दिवशी पोलिसांनी पुढाकार घेतल्याने नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र दुसऱ्या दिवशी रात्री ७ वाजेनंतरही काही वेळ नागरिक रस्त्यावर फिरत होते. २५ फेब्रुवारी रोजी रात्री ७ वाजेदरम्यान पोलिसांची गाडी शहरातून गस्त घालत होती. मात्र त्यानंतर पोलिसांची गाडीही गायब झाली होती अन् चौकातील पोलीस ही. गुरूवारी रात्री १० ते ११ वाजेदरम्यान शहरातील तलाब कट्टा चौक, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक, भगवान महावीर चौक, महात्मा गांधी चौक, इंदिरा गांधी चौक, नांदेड नाका चौक, जुनी जि. प. इमारत चौक, अकोला बायपास, आखरे मेडिकल चौक, जवाहर रोड भागात एकही पोलीस कर्मचारी आढळून आला नाही. काही भागात दुचाकी मात्र धावत असताना दिसून येत होत्या. तर एका चौकात नागरिक उभे होते.

नांदेड नाका चौक

शहरातील नांदेड नाका चौक परिसराच्या बाजूला तीन ते चार नागरिक बोलत उभे होते. चौकातून जाणारी वाहने वगळता शुकशुकाट जाणवत होता.

इंदिरा गांधी चौक

हिंगोली शहरातील इंदिरा गांधी चौक परिसरात एकही पोलीस नव्हता. तर अधून-मधून दुचाकी वाहने धावत होती.

भगवान महावीर चौक

हिंगोली शहरातील भगवान महावीर चौक परिसरात पाहणी केली असता यावेळी एकही पोलीस आढळून आला नाही. चौक निर्मनुष्य दिसत होता.

महात्मा गांधी चौक

हिंगोली शहरातील महात्मा गांधी चौक परिसरातही एकाही पोलीस कर्मचारी नियुक्त नव्हता. यावेळी एका रस्त्यावर काही नागरिक गप्पा मारताना दिसत होते.

दोन जणांवर गुन्हे दाखल

१) जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा, परवानगी घेतलेल्या व्यक्ती वगळता रात्री ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या काळात रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे.

२) नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मागील दोन दिवसांत हिंगोली शहरातील एका मंगल कार्यालय मालक व व्यवस्थापकावर गुन्हा दाखल झाला आहे.

३) शहरातील बहुतांश नागरिक नियमांचे उल्लंघन करीत असले तरी अद्याप ठोस कारवाई होत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

प्रतिक्रिया