शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

रात्री १० नंतर शहरातील चौकांतून पोलीस गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:40 IST

रिॲलिटी चेक लोगो वापरावा.. हिंगोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रात्रीला संचारबंदी लागू केली आहे. रात्री ७ वाजेपूर्वी काही मिनिटे ...

रिॲलिटी चेक लोगो वापरावा..

हिंगोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रात्रीला संचारबंदी लागू केली आहे. रात्री ७ वाजेपूर्वी काही मिनिटे अगोदर पोलिसांची गाडी हिंगोली शहरातून सूचना देत फिरत असली तरी रात्री १० वाजेनंतर शहरातील एकाही चौकात पोलीस थांबत नसल्याचे चित्र २५ फेब्रुवारी रोजी केलेल्या पाहणीत आढळून आले.

जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. आठवडाभरात दोन रूग्णांचा मृत्यू झाला. आजपर्यंतची कोरोनाबाधितांची संख्या ४ हजार ५ झाली आहे. सध्या १७१ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. दररोज आढळणाऱ्या कोरोनाच्या रूग्ण संख्येमुळे जिल्ह्यात रात्रीला संचारबंदी लागू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. २४ फेब्रुवारीपासून या निर्णयाच्या अंमलबजावणीस सुरूवात झाली. पहिल्या दिवशी पोलिसांनी पुढाकार घेतल्याने नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र दुसऱ्या दिवशी रात्री ७ वाजेनंतरही काही वेळ नागरिक रस्त्यावर फिरत होते. २५ फेब्रुवारी रोजी रात्री ७ वाजेदरम्यान पोलिसांची गाडी शहरातून गस्त घालत होती. मात्र त्यानंतर पोलिसांची गाडीही गायब झाली होती अन् चौकातील पोलीस ही. गुरूवारी रात्री १० ते ११ वाजेदरम्यान शहरातील तलाब कट्टा चौक, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक, भगवान महावीर चौक, महात्मा गांधी चौक, इंदिरा गांधी चौक, नांदेड नाका चौक, जुनी जि. प. इमारत चौक, अकोला बायपास, आखरे मेडिकल चौक, जवाहर रोड भागात एकही पोलीस कर्मचारी आढळून आला नाही. काही भागात दुचाकी मात्र धावत असताना दिसून येत होत्या. तर एका चौकात नागरिक उभे होते.

नांदेड नाका चौक

शहरातील नांदेड नाका चौक परिसराच्या बाजूला तीन ते चार नागरिक बोलत उभे होते. चौकातून जाणारी वाहने वगळता शुकशुकाट जाणवत होता.

इंदिरा गांधी चौक

हिंगोली शहरातील इंदिरा गांधी चौक परिसरात एकही पोलीस नव्हता. तर अधून-मधून दुचाकी वाहने धावत होती.

भगवान महावीर चौक

हिंगोली शहरातील भगवान महावीर चौक परिसरात पाहणी केली असता यावेळी एकही पोलीस आढळून आला नाही. चौक निर्मनुष्य दिसत होता.

महात्मा गांधी चौक

हिंगोली शहरातील महात्मा गांधी चौक परिसरातही एकाही पोलीस कर्मचारी नियुक्त नव्हता. यावेळी एका रस्त्यावर काही नागरिक गप्पा मारताना दिसत होते.

दोन जणांवर गुन्हे दाखल

१) जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा, परवानगी घेतलेल्या व्यक्ती वगळता रात्री ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या काळात रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे.

२) नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मागील दोन दिवसांत हिंगोली शहरातील एका मंगल कार्यालय मालक व व्यवस्थापकावर गुन्हा दाखल झाला आहे.

३) शहरातील बहुतांश नागरिक नियमांचे उल्लंघन करीत असले तरी अद्याप ठोस कारवाई होत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

प्रतिक्रिया