शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
4
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
5
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
6
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
7
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
8
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
9
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
10
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

रात्री १० नंतर शहरातील चौकांतून पोलीस गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:40 IST

रिॲलिटी चेक लोगो वापरावा.. हिंगोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रात्रीला संचारबंदी लागू केली आहे. रात्री ७ वाजेपूर्वी काही मिनिटे ...

रिॲलिटी चेक लोगो वापरावा..

हिंगोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रात्रीला संचारबंदी लागू केली आहे. रात्री ७ वाजेपूर्वी काही मिनिटे अगोदर पोलिसांची गाडी हिंगोली शहरातून सूचना देत फिरत असली तरी रात्री १० वाजेनंतर शहरातील एकाही चौकात पोलीस थांबत नसल्याचे चित्र २५ फेब्रुवारी रोजी केलेल्या पाहणीत आढळून आले.

जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. आठवडाभरात दोन रूग्णांचा मृत्यू झाला. आजपर्यंतची कोरोनाबाधितांची संख्या ४ हजार ५ झाली आहे. सध्या १७१ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. दररोज आढळणाऱ्या कोरोनाच्या रूग्ण संख्येमुळे जिल्ह्यात रात्रीला संचारबंदी लागू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. २४ फेब्रुवारीपासून या निर्णयाच्या अंमलबजावणीस सुरूवात झाली. पहिल्या दिवशी पोलिसांनी पुढाकार घेतल्याने नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र दुसऱ्या दिवशी रात्री ७ वाजेनंतरही काही वेळ नागरिक रस्त्यावर फिरत होते. २५ फेब्रुवारी रोजी रात्री ७ वाजेदरम्यान पोलिसांची गाडी शहरातून गस्त घालत होती. मात्र त्यानंतर पोलिसांची गाडीही गायब झाली होती अन् चौकातील पोलीस ही. गुरूवारी रात्री १० ते ११ वाजेदरम्यान शहरातील तलाब कट्टा चौक, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक, भगवान महावीर चौक, महात्मा गांधी चौक, इंदिरा गांधी चौक, नांदेड नाका चौक, जुनी जि. प. इमारत चौक, अकोला बायपास, आखरे मेडिकल चौक, जवाहर रोड भागात एकही पोलीस कर्मचारी आढळून आला नाही. काही भागात दुचाकी मात्र धावत असताना दिसून येत होत्या. तर एका चौकात नागरिक उभे होते.

नांदेड नाका चौक

शहरातील नांदेड नाका चौक परिसराच्या बाजूला तीन ते चार नागरिक बोलत उभे होते. चौकातून जाणारी वाहने वगळता शुकशुकाट जाणवत होता.

इंदिरा गांधी चौक

हिंगोली शहरातील इंदिरा गांधी चौक परिसरात एकही पोलीस नव्हता. तर अधून-मधून दुचाकी वाहने धावत होती.

भगवान महावीर चौक

हिंगोली शहरातील भगवान महावीर चौक परिसरात पाहणी केली असता यावेळी एकही पोलीस आढळून आला नाही. चौक निर्मनुष्य दिसत होता.

महात्मा गांधी चौक

हिंगोली शहरातील महात्मा गांधी चौक परिसरातही एकाही पोलीस कर्मचारी नियुक्त नव्हता. यावेळी एका रस्त्यावर काही नागरिक गप्पा मारताना दिसत होते.

दोन जणांवर गुन्हे दाखल

१) जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा, परवानगी घेतलेल्या व्यक्ती वगळता रात्री ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या काळात रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे.

२) नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मागील दोन दिवसांत हिंगोली शहरातील एका मंगल कार्यालय मालक व व्यवस्थापकावर गुन्हा दाखल झाला आहे.

३) शहरातील बहुतांश नागरिक नियमांचे उल्लंघन करीत असले तरी अद्याप ठोस कारवाई होत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

प्रतिक्रिया