शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

हिंगोली जिल्ह्यात पोलीस वसाहतीचा प्रश्न सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 23:56 IST

जिल्ह्यात पोलिसांच्या वसाहतींची समस्या गंभीर आहे. मात्र टप्प्या-टप्प्याने ही कामे होतील. सध्या अडीचशे घरांच्या पोलीस वसाहतीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आला आहे. लवकरच त्याला मंजुरी मिळणार असल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांनी सांगितले.

ठळक मुद्देचिरंजीव प्रसाद : अडीचशे घरांचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात पोलिसांच्या वसाहतींची समस्या गंभीर आहे. मात्र टप्प्या-टप्प्याने ही कामे होतील. सध्या अडीचशे घरांच्या पोलीस वसाहतीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आला आहे. लवकरच त्याला मंजुरी मिळणार असल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांनी सांगितले.मागील तीन दिवसांपासून ते हिंगोली जिल्ह्यात वार्षिक तपासणीसाठी आलेले आहेत. आज त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी अधीक्षक अरविंद चावरिया उपस्थित होते. यावेळी प्रसाद म्हणाले, जिल्ह्याची एकंदर कामगिरी पाहता समाधानकारक आहे. एम.पासपोर्ट या प्रकारात जिल्ह्याने राज्यात उल्लेखनिय काम केले आहे. जलद गतीने चारित्र्य प्रमाणपत्र दिले जाते. शिवाय आता सायबर क्राईमसाठी नवे अधिकारी रुजू झाले आहेत. त्यामुळे आर्थिक गुन्ह्यांसह इतर गुन्ह्यांमध्ये त्यांची मदत होणार आहे.ते म्हणाले, जिल्ह्यात पोलीस काका व दिदी हा उपक्रम राबविला जाणार आहे. पोलिस हा जनतेला आपला मित्र वाटला पाहिजे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यामुळे ते माहिती देण्यास घाबरणार नाहीत व गुन्हेगारीवरही नियंत्रण आणणे शक्य होणार आहे. तर उपाधीक्षक सुजाता पाटील यांनी पोलीस कोठडीत मयत पावलेल्या आरोपीच्या मुलीला दत्तक घेतल्याचे कौतुक करून हा धाडसी व चांगला निर्णय असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी गुन्ह्यांचा आलेखही मांडला. यात १३ जणांना तडिपार केल्याचे सांगून दिवसा घरफोडीच्या १२ पैकी ५ प्रकरणांत तपास लागल्याचे सांगितले. गतवर्षी १२ पैकी २ चा तपास लागला होता. तर रात्री घरफोडीच्या ७१ पैकी १८ घटनांचा तपास लागला. गतवर्षी ६८ घटना घडल्या होत्या. अ‍ॅट्रॉसिटीची प्रकरणे गतवर्षी ५0 यंदा ६७ झाली. विनयभंगाची गतवर्षी ५७ होती. यंदा ८१ झाल्याचे ते म्हणाले. तर आता पोलीस दलातील अधिकाºयांची रिक्त पदे भरली जात आहेत. कर्मचाºयांच्याही जागा भरण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे.हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे काम, ठाणे परिसर व एकंदर कार्यपद्धती सर्वांत चांगली वाटल्याचेही प्रसाद यांनी सांगून पोनि जगदीश भंडारवार यांचे कौतुक केले.