शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
3
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
4
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
5
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
6
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
7
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
8
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
9
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
10
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
11
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
12
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
13
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
14
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
15
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
16
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
17
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
18
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
19
PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! पेन्शन, पीएफ आणि ईपीएसच्या नियमांमध्ये मोठे बदल
20
सूरज चव्हाणचं प्री-वेडिंग फोटोशूट; होणाऱ्या पत्नीसोबत वेस्टर्न लूकमध्ये दिल्या रोमँटिक पोझ
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी तुरूंगात डांबले तिघांना; आरोपी निघाले भलतेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 23:54 IST

तालुक्यातील गणेशपूर येथे घडलेल्या चार वर्षीय बालकाच्या खून प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी आरोपी म्हणून अटक केलेले तिघेजण महिन्यांपासून तुरूंगात आहेत. आता पोलिसांनी ‘तपास’ करून खून करणारी आजीच असल्याचे निष्पन्न केले आहे. पोलिसांच्या तपास पद्धतीच्या या अजब प्रकाराबद्दल गणेशपूर ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत. शेकडो ग्रामस्थांनी गुरुवारी पोलीस ठाण्यावर येवून संशयीत म्हणून तुरूंगात डांबलेल्यांची त्वरीत सुटका करण्याची मागणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : तालुक्यातील गणेशपूर येथे घडलेल्या चार वर्षीय बालकाच्या खून प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी आरोपी म्हणून अटक केलेले तिघेजण महिन्यांपासून तुरूंगात आहेत. आता पोलिसांनी ‘तपास’ करून खून करणारी आजीच असल्याचे निष्पन्न केले आहे. पोलिसांच्या तपास पद्धतीच्या या अजब प्रकाराबद्दल गणेशपूर ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत. शेकडो ग्रामस्थांनी गुरुवारी पोलीस ठाण्यावर येवून संशयीत म्हणून तुरूंगात डांबलेल्यांची त्वरीत सुटका करण्याची मागणी केली.गणेशपूर येथे ९ आॅक्टोबर २०१७ रोजी श्रेयस उर्फ चिंकू बालाजी वाघमारे या चारवर्षीय बालकाच्या खूनाची घटना घडली. प्रथमदर्शनी हा प्रकार लैगिंक अत्याचार असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढून त्या कलमांन्वये गुन्हा दाखल केला. नरबळीचा प्रकार असल्याचीही चर्चा होती.दरम्यान घटना घडून साडेतीन महिन्यांचा अवधी उलटल्यानंतरही आता तपास अधिकाºयांनी मयताची सावत्र आजी रंजनाबाई वाघमारे ही आरोपी असल्याचा शोध लावला व सबळ पुराव्यासह आजीला अटक केली. यासह ईतरही आरोपी आहेत. असा पोलिसांना संशय आहे. याचाच अर्थ अगोदर अटक केलेले व तुरुंगात तीन महिन्यापेक्षा अधीक शिक्षा भोगत असलेले संशयीत आरोपी नाहीत असे स्पष्ट झाले आहे. या प्रकाराने गणेशपूर ग्रामस्थांत संताप व्यक्त करीत आहेत. माजी सरपंचासह तीन जनांना तपास अधिकाºयांच्या चुकीच्या तपासामुळे तुरुंगात राहावे लागले. फिर्यादीने नावे दिली म्हणून गुन्हा नोंदवून अटक केली असाच प्रकार या प्रकरणात घडला आहे. या प्रकरणी निर्दोष असलेल्या संशयीतांची तातडीने सुटका करावी, चुकीच्या फिर्यादीने चुकीची नावे देवून नाहक त्रास दिला त्याच्या विरोधात कारवाई व्हावी व प्रकरणाचा तपास वरिष्ट यंत्रणेकडे देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. गुरुवारी पोलीस ठाण्यासमोर मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमा झाले होते. त्यांनी उपविभागीय अधीकारी शशीकिरण काशीद यांना निवेदन दिले. डीवायएसपी काशीद यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. श्रेयशच्या खुनाच्या आरोपाखाली अटक केलेल्या सावत्र आजीने मालमत्तेच्या हव्यासापोटी हा प्रकार केल्याचा संशय पोलीस व्यक्त करीत आहेत. या प्रकरणात आरोपींची संख्या वाढू शकते. खून प्रकरणाला आलेले नवीन वळण व आजवर मुख्य आरोपी म्हणून पोलीसांनी अटक केलेले हे प्रकरण चर्चेचा विषय बनला आहे.ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकाºयांनी या प्रकरणात संशयित म्हणून गावातील तीन जणांवर गुन्हा नोंदविला. संशयीताना अटक करुन पोलीस कोठडीही मिळविली. सात दिवस व दहा दिवसांची पोलीस कोठडी मिळवल्यानंतरही तपास अधिकाºयांना कोठडीत ‘सत्य’ शोधता आले नाही. परिणामी तेव्हा पासून तिन्ही संशयीत तुरुंगात आहेत.