शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
5
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
6
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
7
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
8
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
9
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
10
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
11
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
12
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
13
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
14
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
15
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
16
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
17
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
18
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
19
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
20
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'

पोलिसांनी तुरूंगात डांबले तिघांना; आरोपी निघाले भलतेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 23:54 IST

तालुक्यातील गणेशपूर येथे घडलेल्या चार वर्षीय बालकाच्या खून प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी आरोपी म्हणून अटक केलेले तिघेजण महिन्यांपासून तुरूंगात आहेत. आता पोलिसांनी ‘तपास’ करून खून करणारी आजीच असल्याचे निष्पन्न केले आहे. पोलिसांच्या तपास पद्धतीच्या या अजब प्रकाराबद्दल गणेशपूर ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत. शेकडो ग्रामस्थांनी गुरुवारी पोलीस ठाण्यावर येवून संशयीत म्हणून तुरूंगात डांबलेल्यांची त्वरीत सुटका करण्याची मागणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : तालुक्यातील गणेशपूर येथे घडलेल्या चार वर्षीय बालकाच्या खून प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी आरोपी म्हणून अटक केलेले तिघेजण महिन्यांपासून तुरूंगात आहेत. आता पोलिसांनी ‘तपास’ करून खून करणारी आजीच असल्याचे निष्पन्न केले आहे. पोलिसांच्या तपास पद्धतीच्या या अजब प्रकाराबद्दल गणेशपूर ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत. शेकडो ग्रामस्थांनी गुरुवारी पोलीस ठाण्यावर येवून संशयीत म्हणून तुरूंगात डांबलेल्यांची त्वरीत सुटका करण्याची मागणी केली.गणेशपूर येथे ९ आॅक्टोबर २०१७ रोजी श्रेयस उर्फ चिंकू बालाजी वाघमारे या चारवर्षीय बालकाच्या खूनाची घटना घडली. प्रथमदर्शनी हा प्रकार लैगिंक अत्याचार असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढून त्या कलमांन्वये गुन्हा दाखल केला. नरबळीचा प्रकार असल्याचीही चर्चा होती.दरम्यान घटना घडून साडेतीन महिन्यांचा अवधी उलटल्यानंतरही आता तपास अधिकाºयांनी मयताची सावत्र आजी रंजनाबाई वाघमारे ही आरोपी असल्याचा शोध लावला व सबळ पुराव्यासह आजीला अटक केली. यासह ईतरही आरोपी आहेत. असा पोलिसांना संशय आहे. याचाच अर्थ अगोदर अटक केलेले व तुरुंगात तीन महिन्यापेक्षा अधीक शिक्षा भोगत असलेले संशयीत आरोपी नाहीत असे स्पष्ट झाले आहे. या प्रकाराने गणेशपूर ग्रामस्थांत संताप व्यक्त करीत आहेत. माजी सरपंचासह तीन जनांना तपास अधिकाºयांच्या चुकीच्या तपासामुळे तुरुंगात राहावे लागले. फिर्यादीने नावे दिली म्हणून गुन्हा नोंदवून अटक केली असाच प्रकार या प्रकरणात घडला आहे. या प्रकरणी निर्दोष असलेल्या संशयीतांची तातडीने सुटका करावी, चुकीच्या फिर्यादीने चुकीची नावे देवून नाहक त्रास दिला त्याच्या विरोधात कारवाई व्हावी व प्रकरणाचा तपास वरिष्ट यंत्रणेकडे देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. गुरुवारी पोलीस ठाण्यासमोर मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमा झाले होते. त्यांनी उपविभागीय अधीकारी शशीकिरण काशीद यांना निवेदन दिले. डीवायएसपी काशीद यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. श्रेयशच्या खुनाच्या आरोपाखाली अटक केलेल्या सावत्र आजीने मालमत्तेच्या हव्यासापोटी हा प्रकार केल्याचा संशय पोलीस व्यक्त करीत आहेत. या प्रकरणात आरोपींची संख्या वाढू शकते. खून प्रकरणाला आलेले नवीन वळण व आजवर मुख्य आरोपी म्हणून पोलीसांनी अटक केलेले हे प्रकरण चर्चेचा विषय बनला आहे.ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकाºयांनी या प्रकरणात संशयित म्हणून गावातील तीन जणांवर गुन्हा नोंदविला. संशयीताना अटक करुन पोलीस कोठडीही मिळविली. सात दिवस व दहा दिवसांची पोलीस कोठडी मिळवल्यानंतरही तपास अधिकाºयांना कोठडीत ‘सत्य’ शोधता आले नाही. परिणामी तेव्हा पासून तिन्ही संशयीत तुरुंगात आहेत.