शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी तुरूंगात डांबले तिघांना; आरोपी निघाले भलतेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 23:54 IST

तालुक्यातील गणेशपूर येथे घडलेल्या चार वर्षीय बालकाच्या खून प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी आरोपी म्हणून अटक केलेले तिघेजण महिन्यांपासून तुरूंगात आहेत. आता पोलिसांनी ‘तपास’ करून खून करणारी आजीच असल्याचे निष्पन्न केले आहे. पोलिसांच्या तपास पद्धतीच्या या अजब प्रकाराबद्दल गणेशपूर ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत. शेकडो ग्रामस्थांनी गुरुवारी पोलीस ठाण्यावर येवून संशयीत म्हणून तुरूंगात डांबलेल्यांची त्वरीत सुटका करण्याची मागणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : तालुक्यातील गणेशपूर येथे घडलेल्या चार वर्षीय बालकाच्या खून प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी आरोपी म्हणून अटक केलेले तिघेजण महिन्यांपासून तुरूंगात आहेत. आता पोलिसांनी ‘तपास’ करून खून करणारी आजीच असल्याचे निष्पन्न केले आहे. पोलिसांच्या तपास पद्धतीच्या या अजब प्रकाराबद्दल गणेशपूर ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत. शेकडो ग्रामस्थांनी गुरुवारी पोलीस ठाण्यावर येवून संशयीत म्हणून तुरूंगात डांबलेल्यांची त्वरीत सुटका करण्याची मागणी केली.गणेशपूर येथे ९ आॅक्टोबर २०१७ रोजी श्रेयस उर्फ चिंकू बालाजी वाघमारे या चारवर्षीय बालकाच्या खूनाची घटना घडली. प्रथमदर्शनी हा प्रकार लैगिंक अत्याचार असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढून त्या कलमांन्वये गुन्हा दाखल केला. नरबळीचा प्रकार असल्याचीही चर्चा होती.दरम्यान घटना घडून साडेतीन महिन्यांचा अवधी उलटल्यानंतरही आता तपास अधिकाºयांनी मयताची सावत्र आजी रंजनाबाई वाघमारे ही आरोपी असल्याचा शोध लावला व सबळ पुराव्यासह आजीला अटक केली. यासह ईतरही आरोपी आहेत. असा पोलिसांना संशय आहे. याचाच अर्थ अगोदर अटक केलेले व तुरुंगात तीन महिन्यापेक्षा अधीक शिक्षा भोगत असलेले संशयीत आरोपी नाहीत असे स्पष्ट झाले आहे. या प्रकाराने गणेशपूर ग्रामस्थांत संताप व्यक्त करीत आहेत. माजी सरपंचासह तीन जनांना तपास अधिकाºयांच्या चुकीच्या तपासामुळे तुरुंगात राहावे लागले. फिर्यादीने नावे दिली म्हणून गुन्हा नोंदवून अटक केली असाच प्रकार या प्रकरणात घडला आहे. या प्रकरणी निर्दोष असलेल्या संशयीतांची तातडीने सुटका करावी, चुकीच्या फिर्यादीने चुकीची नावे देवून नाहक त्रास दिला त्याच्या विरोधात कारवाई व्हावी व प्रकरणाचा तपास वरिष्ट यंत्रणेकडे देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. गुरुवारी पोलीस ठाण्यासमोर मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमा झाले होते. त्यांनी उपविभागीय अधीकारी शशीकिरण काशीद यांना निवेदन दिले. डीवायएसपी काशीद यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. श्रेयशच्या खुनाच्या आरोपाखाली अटक केलेल्या सावत्र आजीने मालमत्तेच्या हव्यासापोटी हा प्रकार केल्याचा संशय पोलीस व्यक्त करीत आहेत. या प्रकरणात आरोपींची संख्या वाढू शकते. खून प्रकरणाला आलेले नवीन वळण व आजवर मुख्य आरोपी म्हणून पोलीसांनी अटक केलेले हे प्रकरण चर्चेचा विषय बनला आहे.ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकाºयांनी या प्रकरणात संशयित म्हणून गावातील तीन जणांवर गुन्हा नोंदविला. संशयीताना अटक करुन पोलीस कोठडीही मिळविली. सात दिवस व दहा दिवसांची पोलीस कोठडी मिळवल्यानंतरही तपास अधिकाºयांना कोठडीत ‘सत्य’ शोधता आले नाही. परिणामी तेव्हा पासून तिन्ही संशयीत तुरुंगात आहेत.