शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
2
“वाह फडणवीस वाह, एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार”
3
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
4
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
5
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
6
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
7
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
8
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
9
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
10
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
11
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
12
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
13
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
14
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
15
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
16
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
17
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
18
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
19
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
20
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण

दर कमी असल्याने प्रधानमंत्री ग्रामसडकच्या निविदांवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:35 IST

हिंगोली जिल्ह्यात या योजनेत रांजाळा-सिरळा - उमरा ते तालुका सीमेपर्यंतचा ७.१३ किमी, रामा २४९ ते जवळा-आजरसोंडा-तपोवन ते प्रजिमा १८.३ ...

हिंगोली जिल्ह्यात या योजनेत रांजाळा-सिरळा - उमरा ते तालुका सीमेपर्यंतचा ७.१३ किमी, रामा २४९ ते जवळा-आजरसोंडा-तपोवन ते प्रजिमा १८.३ किमी, जेडरस्ता उंडेगाव-चिंचोली निळोबा ते पेरजाबाद ३ किमी, रामा ६१ ते भोरीपगाव-राजापूर मार्लापुरी ३.६० किमी, इजिमा ३७ ते किन्होळा - कुरुंदा ते सुकळी रोड ते प्रजिमा १३ हा ६ किमी रस्ता, प्रजिमा २९ ते इंडोळी -आमला-काळकोंडी हा ६ किमी रस्ता, प्रजिमा ४ ते कोथळज-समगा हा ६.४० किमी रस्ता, रामा १६१ ते पारोळा- नवलगव्हाण स्टेशन नवलगव्हाण ५.८५ किमी, फाळेगाव-कानडखेडा बु.-वांझोळा ६ किमी रस्ता, सांडस-सालेगाव ६.९० किमी, वाई ते वाकोडी १४.७० किमी रस्ता, प्रजिमा २८ ते वाघजळी ते कहाकर-ताकतोडा ते रामा २५८ पर्यंत ६.६० किमी, रामा २४८ ते सुरजखेडा ते जिल्हा सीमेपर्यंत ७.४० किमी, प्रजिमा २६-कवठा ते राम १६१ बी- कोळसा- सुकळी खु.- सापटगाव- सुकळी बु. ते रामा २४८ पंयंत १२.२० किमी, गिरगाव ते देळब मार्गे उमरीपासून जिल्हा सीमेपर्यंत ७.७० किमी, प्रजिमा १२ ते पारडी ते खाजमापूर गिरगाव ते रेडगाव ६.७० किमी अशी एकूण १११.१८ किमी लांबीच्या १६ रस्त्यांना प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. निविदाही निघाल्या. मात्र, पहिल्यांदा प्रतिसाद न मिळाल्याने पुन्हा निविदा काढल्या. या कामांवर कंत्राटदारांनी बहिष्कार घातला आहे. तसेच प्रजिमा २९ ते इडोळी-आमला- काळकोंडी रस्त्यावरील पूल, प्रजिमा २६ - कवठा ते राममा १६१ बी- कोळसा-सुकळी रस्त्यावरील पूल, सांडस ते सालेगाव रस्त्यावरील पूल, वाई ते वाकोडी रस्त्यावरील पूल अशी चार कामे मंजूर आहेत.

याबाबत बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या हिंगोली शाखेच्या वतीने २० ऑगस्टला पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या सचिवांनाही निवेदन देऊन बहिष्काराचा इशारा टाकण्यात आला होता. यात या योजनेतील दर हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाच्या ३० टक्क्यांनी कमी असल्याचे म्हटले होते. गौण खनिज खदान ते कामाचे अंतर चुकीचे दाखविल्यामुळे व प्रत्यक्ष काम करताना दरात खूप तफावत येत आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान होत आहे. शासकीय गौण खनिज खदान आता कुठेच उपलब्ध नाही. न्यायालयीन आदेशामुळे गायरान जमिनीतून उत्खननावर बंदी आहे. त्यामुळे गौण खनिज खरेदीस मोठी रक्कम अदा करावी लागत आहे, तर प्रलंबित देयकांसाठी मंत्रालय स्तरापर्यंत पायपीट करावी लागत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष मयूर कयाल, राजू चापके, जे. एस. भाटिया, ए. आर. खान, एस. एम. शर्मा, पी. डी. जैन, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

याबाबत कंत्राटदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयूर कयाल म्हणाले, आम्ही शासनाकडे आमच्या मागण्या सादर करूनही त्यावर अद्याप विचार झाला नाही. ही कामे करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसून ही कामे करण्यासाठी नियमही अतिशय कडक आहेत. त्यामुळे दरसूचीत बदल झाल्याशिवाय कामे न करण्याचा निर्णय संघटनेच्या वतीने घेण्यात आलेला आहे.

याबाबत प्रधानमंत्री ग्राम सडकचे उपकार्यकारी अभियंता एस. एम. कुलकर्णी म्हणाले, या कामांच्या निविदा पहिल्यांदा काढल्या तेव्हा त्याला प्रतिसाद मिळाला नाही. आता पुन्हा निविदा काढलेल्या आहेत. यातही अजून तरी प्रतिसाद नाही.