शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

प्लास्टिक बंदीचा जिल्ह्यात फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 00:03 IST

शासनाने प्लास्टिक वापरावर बंदी आणली असली तरी, जिल्ह्यात खुलेआम कॅरीबॅगचा वापर होताना दिसून येत आहे. ठिक -ठिकाणी करवाई करून संबधित दुकान चालकांकडून दंडही वसूल करण्यात आला होता. मात्र सध्या मोहीम थंडावल्याने सर्रासपणे प्लास्टिकचा वापर सुरू असल्याचे दिसून येत असून जिल्ह्यात प्लास्टिक बंदीचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शासनाने प्लास्टिक वापरावर बंदी आणली असली तरी, जिल्ह्यात खुलेआम कॅरीबॅगचा वापर होताना दिसून येत आहे. ठिक -ठिकाणी करवाई करून संबधित दुकान चालकांकडून दंडही वसूल करण्यात आला होता. मात्र सध्या मोहीम थंडावल्याने सर्रासपणे प्लास्टिकचा वापर सुरू असल्याचे दिसून येत असून जिल्ह्यात प्लास्टिक बंदीचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे.राज्यभरात प्लास्टिक बंदीच्या निर्णयानंतर हिंगोली जिल्ह्यात विविध ठिकाणी कारवाई करून दंड वसूल करण्यात आला. अचानक कारवाई करून अनेकांना दंड ठोठावण्यात आल्याने काही प्रमाणात का होईना कॅरबॅगचा वापर कमी झाल्याचे चित्र दिसून आले. दुकानावरही कॅरीबॅग उपलब्ध नसल्याचे व्यापाऱ्यांकडून ग्राहकांना सांगितले जात होते. परंतु मध्येच ही मोहीम थंडावल्याने हिंगोली शहरासह जिल्हाभरात प्लास्टिक व कॅरीबॅगचा वापर होताना दिसून येत आहे. नगर परिषद हिंगोली व महराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाने धडक कारवाई करून शहरातील दुकानचालक व व्यापाºयांकडील प्लास्टिकसाठा जप्त केला होता. ही धडक मोहीम अनेक महिने सुरू होती. हजारोंचा दंड भरावा लागत असल्याने अनेकांनी दुकानात कॅरीबॅग न ठेवलेलीच बरी असे चित्र निर्माण झाले होते. हिंगोली शहरात नगर परिषद व महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टिक, थार्माकॉल, अविघनशिल वस्तूंचे उत्पादन, वापर व विक्री, वाहतूक करणाºयांविरूद्ध २५ आॅक्टोबर रोजी मोहीम राबवून अनेक दुकानांची तपासणी केली. चाळीस हजार रूपये दंडही वसूल करण्यात आला होता. परंतु आता हिंगोली शहरातही ही प्लास्टिक वापरावर बंदी ही मोहीम थंडावली आहे. त्यामुळे बाजारात सर्रासपणे कॅरीबॅगचा वापर सुरू असल्याचे चित्र आहे. काही तुरळक दुकानावर मात्र कॅरीबॅग ऐवजी कागदी पिशव्या दिल्या जात असल्याचे निदर्शनास येत आहे.एकदा निर्माण झालेले प्लास्टिक हे कधीच नष्ट होत नाही. प्लास्टिकचे तुकडे इतरत्र जमीनमध्ये तसेच नदी व नाल्यात मिसळतात. प्लास्टिकची पिशवी प्राण्यांच्या पोटात गेल्याने अनेक मुक्या जनावरांचे प्राण जातात.त्यामुळे प्लास्टिक वापर टाळणे काळाची गरज आहे.राज्यातील महानगरपालिकाव नगरपालिका यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीवरून २०१६ ते २०१७ मध्ये राज्यातून एकूण २३,४४९.६६ मे. टन प्रतिदिन घनकचरा झाला असून त्यात प्लास्टिक कचºयाचे ५ ते ६ टक्के अंश गृहित धरल्यास सरासरी १२०० मे टन प्रतिदिन एवढा प्लास्टिकचा कचरा राज्यातून निर्माण होतो.प्लास्टिक वापर याबाबत हवी तशी जिल्ह्यात जनजागृती होत नाही. शिवाय इतर संबधित विभागही याकडे लक्ष देण्यास तयार नाही. त्यामुळे पालिकेचे पथक अधून-मधून कारवाई करताना दिसते.

टॅग्स :HingoliहिंगोलीPlastic banप्लॅस्टिक बंदी