शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

प्लास्टिक बंदीचा जिल्ह्यात फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 00:03 IST

शासनाने प्लास्टिक वापरावर बंदी आणली असली तरी, जिल्ह्यात खुलेआम कॅरीबॅगचा वापर होताना दिसून येत आहे. ठिक -ठिकाणी करवाई करून संबधित दुकान चालकांकडून दंडही वसूल करण्यात आला होता. मात्र सध्या मोहीम थंडावल्याने सर्रासपणे प्लास्टिकचा वापर सुरू असल्याचे दिसून येत असून जिल्ह्यात प्लास्टिक बंदीचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शासनाने प्लास्टिक वापरावर बंदी आणली असली तरी, जिल्ह्यात खुलेआम कॅरीबॅगचा वापर होताना दिसून येत आहे. ठिक -ठिकाणी करवाई करून संबधित दुकान चालकांकडून दंडही वसूल करण्यात आला होता. मात्र सध्या मोहीम थंडावल्याने सर्रासपणे प्लास्टिकचा वापर सुरू असल्याचे दिसून येत असून जिल्ह्यात प्लास्टिक बंदीचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे.राज्यभरात प्लास्टिक बंदीच्या निर्णयानंतर हिंगोली जिल्ह्यात विविध ठिकाणी कारवाई करून दंड वसूल करण्यात आला. अचानक कारवाई करून अनेकांना दंड ठोठावण्यात आल्याने काही प्रमाणात का होईना कॅरबॅगचा वापर कमी झाल्याचे चित्र दिसून आले. दुकानावरही कॅरीबॅग उपलब्ध नसल्याचे व्यापाऱ्यांकडून ग्राहकांना सांगितले जात होते. परंतु मध्येच ही मोहीम थंडावल्याने हिंगोली शहरासह जिल्हाभरात प्लास्टिक व कॅरीबॅगचा वापर होताना दिसून येत आहे. नगर परिषद हिंगोली व महराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाने धडक कारवाई करून शहरातील दुकानचालक व व्यापाºयांकडील प्लास्टिकसाठा जप्त केला होता. ही धडक मोहीम अनेक महिने सुरू होती. हजारोंचा दंड भरावा लागत असल्याने अनेकांनी दुकानात कॅरीबॅग न ठेवलेलीच बरी असे चित्र निर्माण झाले होते. हिंगोली शहरात नगर परिषद व महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टिक, थार्माकॉल, अविघनशिल वस्तूंचे उत्पादन, वापर व विक्री, वाहतूक करणाºयांविरूद्ध २५ आॅक्टोबर रोजी मोहीम राबवून अनेक दुकानांची तपासणी केली. चाळीस हजार रूपये दंडही वसूल करण्यात आला होता. परंतु आता हिंगोली शहरातही ही प्लास्टिक वापरावर बंदी ही मोहीम थंडावली आहे. त्यामुळे बाजारात सर्रासपणे कॅरीबॅगचा वापर सुरू असल्याचे चित्र आहे. काही तुरळक दुकानावर मात्र कॅरीबॅग ऐवजी कागदी पिशव्या दिल्या जात असल्याचे निदर्शनास येत आहे.एकदा निर्माण झालेले प्लास्टिक हे कधीच नष्ट होत नाही. प्लास्टिकचे तुकडे इतरत्र जमीनमध्ये तसेच नदी व नाल्यात मिसळतात. प्लास्टिकची पिशवी प्राण्यांच्या पोटात गेल्याने अनेक मुक्या जनावरांचे प्राण जातात.त्यामुळे प्लास्टिक वापर टाळणे काळाची गरज आहे.राज्यातील महानगरपालिकाव नगरपालिका यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीवरून २०१६ ते २०१७ मध्ये राज्यातून एकूण २३,४४९.६६ मे. टन प्रतिदिन घनकचरा झाला असून त्यात प्लास्टिक कचºयाचे ५ ते ६ टक्के अंश गृहित धरल्यास सरासरी १२०० मे टन प्रतिदिन एवढा प्लास्टिकचा कचरा राज्यातून निर्माण होतो.प्लास्टिक वापर याबाबत हवी तशी जिल्ह्यात जनजागृती होत नाही. शिवाय इतर संबधित विभागही याकडे लक्ष देण्यास तयार नाही. त्यामुळे पालिकेचे पथक अधून-मधून कारवाई करताना दिसते.

टॅग्स :HingoliहिंगोलीPlastic banप्लॅस्टिक बंदी