शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील खड्डे देताहेत अपघाताला निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:13 IST

कळमनुरी : हिंगोली-नांदेड मार्गावरील हिंगोली ते आराटीपर्यंतच्या महामार्गाची दुरवस्था झाली असून, जागोजागी खड्डे पडले आहेत. काही दिवसांपूर्वीच खड्डे बुजविल्यानंतरही ...

कळमनुरी : हिंगोली-नांदेड मार्गावरील हिंगोली ते आराटीपर्यंतच्या महामार्गाची दुरवस्था झाली असून, जागोजागी खड्डे पडले आहेत. काही दिवसांपूर्वीच खड्डे बुजविल्यानंतरही पुन्हा ‘जैसे थै’ स्थिती झाली आहे. त्यामुळे किरकोळ अपघाताच्या घटना वाढत असून, जायबंदी होण्याचे प्रकार वाढले आहेत.

हिंगोली-नांदेडला जोडणाऱ्या अकोला-वारंगा फाटा या राज्य रस्त्याचे राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१ मध्ये रूपांतर झाले आहे. त्याअनुषंगाने हिंगोलीजवळील सावरगाव ते माळधामणी फाटापर्यंत कामही काही प्रमाणात झाले आहे. मात्र पूर्वीचा राज्य शासनाच्या ताब्यात असतानाच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. महामार्ग होत असला, तरी अजूनही जुन्याच डांबरी रस्त्याचा वापर करावा लागत आहे. पुढे उमरा, मसोड फाटा, कळमनुरी, मोरवाडी, माळेगाव, पार्डीमोड, आराटी ते पुढे आखाडा बाळापूरपर्यंतच्या रस्त्यावर अनेकठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. उमराजवळही ऐन वळणावर खड्डे असल्याने वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच कळमनुरी शहरातील जुना बसथांबा, आदिवासी प्रकल्प कार्यालय परिसरातील खड्डे चुकविताना वाहनावरील नियंत्रण सुटून वाहने घसरण्याच्या घटना घडत आहेत. मोरवाडीजवळील खड्डे चुकविताना तर चालक कितीही निष्णात असला तरी, वाहन खड्ड्यातून न्यावेच लागत आहे. येथे कोणताच खड्डा चुकविता येत नाही. माळेगावजवळील खड्डेही धोकादायक ठरत आहेत. येथे पुसद, नांदेड, हिंगोली मार्गावरील वाहने थांबतात. रस्त्यावर थाबलेली वाहने व रस्त्यावरील पडलेले खड्डे चुकविताना मोठी कसरत करावी लागत आहे. माळेगावच्या पुढेही वळणार खड्डे पडल्याने खड्ड्यात दुचाकी आदळून चालकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे.

काही दिवसांपूर्वीच बुजविले होते खड्डे

कळमनुरी ते आखाडा बाळापूर मार्गावरील पडलेले खड्डे काही दिवसांपूर्वीच बुजविले होते. मात्र हे खड्डे बुजवितानाही पुरेशे भरले नसल्याने वाहने जंप करीत आहेत. हे खड्डे बुजल्याने वाहनचालकांना थोडासा दिलासा मिळाला होता. मात्र पुन्हा दुसरे खड्डे तयार झाल्याने महामार्ग जैसे थे झाला आहे.

वाहनांचे नुकसान

हिंगोली ते नांदेड या मार्गावरून दररोज शेकडो वाहने धावतात. त्यामुळे रात्रंदिवस वाहनांची वर्दळ असते. मात्र वाहने खड्ड्यात आदळून वाहनांचे नुकसान होत आहे. यातूनच अनेकांनी नवीन वाहने घेण्याचा नाद सोडून दिला आहे.

फोटे न. १०, ११