शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

महामार्गावरील खड्डे देताहेत अपघाताला निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:13 IST

कळमनुरी : हिंगोली-नांदेड मार्गावरील हिंगोली ते आराटीपर्यंतच्या महामार्गाची दुरवस्था झाली असून, जागोजागी खड्डे पडले आहेत. काही दिवसांपूर्वीच खड्डे बुजविल्यानंतरही ...

कळमनुरी : हिंगोली-नांदेड मार्गावरील हिंगोली ते आराटीपर्यंतच्या महामार्गाची दुरवस्था झाली असून, जागोजागी खड्डे पडले आहेत. काही दिवसांपूर्वीच खड्डे बुजविल्यानंतरही पुन्हा ‘जैसे थै’ स्थिती झाली आहे. त्यामुळे किरकोळ अपघाताच्या घटना वाढत असून, जायबंदी होण्याचे प्रकार वाढले आहेत.

हिंगोली-नांदेडला जोडणाऱ्या अकोला-वारंगा फाटा या राज्य रस्त्याचे राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१ मध्ये रूपांतर झाले आहे. त्याअनुषंगाने हिंगोलीजवळील सावरगाव ते माळधामणी फाटापर्यंत कामही काही प्रमाणात झाले आहे. मात्र पूर्वीचा राज्य शासनाच्या ताब्यात असतानाच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. महामार्ग होत असला, तरी अजूनही जुन्याच डांबरी रस्त्याचा वापर करावा लागत आहे. पुढे उमरा, मसोड फाटा, कळमनुरी, मोरवाडी, माळेगाव, पार्डीमोड, आराटी ते पुढे आखाडा बाळापूरपर्यंतच्या रस्त्यावर अनेकठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. उमराजवळही ऐन वळणावर खड्डे असल्याने वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच कळमनुरी शहरातील जुना बसथांबा, आदिवासी प्रकल्प कार्यालय परिसरातील खड्डे चुकविताना वाहनावरील नियंत्रण सुटून वाहने घसरण्याच्या घटना घडत आहेत. मोरवाडीजवळील खड्डे चुकविताना तर चालक कितीही निष्णात असला तरी, वाहन खड्ड्यातून न्यावेच लागत आहे. येथे कोणताच खड्डा चुकविता येत नाही. माळेगावजवळील खड्डेही धोकादायक ठरत आहेत. येथे पुसद, नांदेड, हिंगोली मार्गावरील वाहने थांबतात. रस्त्यावर थाबलेली वाहने व रस्त्यावरील पडलेले खड्डे चुकविताना मोठी कसरत करावी लागत आहे. माळेगावच्या पुढेही वळणार खड्डे पडल्याने खड्ड्यात दुचाकी आदळून चालकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे.

काही दिवसांपूर्वीच बुजविले होते खड्डे

कळमनुरी ते आखाडा बाळापूर मार्गावरील पडलेले खड्डे काही दिवसांपूर्वीच बुजविले होते. मात्र हे खड्डे बुजवितानाही पुरेशे भरले नसल्याने वाहने जंप करीत आहेत. हे खड्डे बुजल्याने वाहनचालकांना थोडासा दिलासा मिळाला होता. मात्र पुन्हा दुसरे खड्डे तयार झाल्याने महामार्ग जैसे थे झाला आहे.

वाहनांचे नुकसान

हिंगोली ते नांदेड या मार्गावरून दररोज शेकडो वाहने धावतात. त्यामुळे रात्रंदिवस वाहनांची वर्दळ असते. मात्र वाहने खड्ड्यात आदळून वाहनांचे नुकसान होत आहे. यातूनच अनेकांनी नवीन वाहने घेण्याचा नाद सोडून दिला आहे.

फोटे न. १०, ११