शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

खड्डे बनले धाेकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:26 IST

रसवंतीवर वाढली गर्दी हिंगोली: हिंगोली ते आखाडा बाळापूर या मार्गावरून मोठ्या संख्येने वाहने धावतात. यातील बहुतांश जण विसावा म्हणून ...

रसवंतीवर वाढली गर्दी

हिंगोली: हिंगोली ते आखाडा बाळापूर या मार्गावरून मोठ्या संख्येने वाहने धावतात. यातील बहुतांश जण विसावा म्हणून हॉटेलवर थांबत आहेत. सध्या उन्हाळा सुरू झाला असून, रसाला मागणी वाढली आहे. ही संधी समजून अनेकांनी ठिकठिकाणी रसवंती सुरू केली आहे. दिवसभर ऊन तापत असल्याने वाहनचालक रसवंतीवर थांबत आहेत. याचा फायदा रसवंती चालकांना होत आहे. यातून रोजगार उपलब्ध झाला असल्याचे रसवंती चालकांतून बोलले जात आहे.

वाळूची अवैध उपसा वाढला

हिंगोली: जिल्हाभरातील बहुतांश वाळू घाटाचे अद्याप लिलाव झाले नाहीत. सध्या अनेकांनी बांधकामे सुरू केले आहेत. वाळूला मागणी वाढल्याने वाळू माफिया वाळूचा अवैध उपसा करीत असून, चढ्या दराने विक्री करीत असल्याचे चित्र आहे. वाळूचा अवैध उपसा होत असला, तरी यातून शासनाचे लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. याकडे लक्ष देऊन वाळूचा अवैध उपसा थांबवावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

हरभरा काढणीस सुरुवात

हिंगोली: जिल्हाभरात बहुतांश शेतकऱ्यांनी हरभरा पीक घेतले आहे. सध्या हरभरा पीक काढणीस आला असून, ठिकठिकाणी मजुरांच्या साहाय्याने काढला जात आहे. मात्र, हरभरा पिकाच्या उत्पादनात घट होत असल्याचे शेतकरी बोलत आहेत. यातून पेरणी व मशागतीचा खर्चही निघत नसून, खरीपानंतर रब्बी हंगामातही नुकसान होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

खड्डे बुजविण्यास सुरुवात

हिंगोली: येथून जाणाऱ्या अकोला रोडवर जागोजागी खड्डे पडले होते. त्यामुळे वाहनचालकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. या मार्गावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत होती. आता या मार्गावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात झाली असून, अनेक ठिकाणचे खड्डे बुजविण्यात आले आहेत. यामुळे वाहन चालकांची गैरसोय दूर होण्यास मदत मिळाली आहे. या मार्गाचे हॉटमिक्सने डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे.

खिळखिळ्या बसला प्रवासी वैतागले

हिंगोली : येथून विविध मार्गावर धावणाऱ्या बहुतांश बसेस खिळखिळ्या झाल्या आहेत. बस खिळखिळ्या झाल्याने याचा आवाज होत आहे. याचा प्रवाशांचा त्रास होत आहे. बस खिळखिळ्या होण्यास रस्त्यांची दुरवस्था कारणीभूत असल्याचे प्रवाशांतून बोलले जात आहे. असे असले, तरी हिंगोली आगारास नव्या बसेस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे.

स्वच्छतागृहाची साफसफाई करण्याची मागणी

हिंगोली: येथील जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभाग असून, जिल्हाभरातील नागरिक कामानिमित्त येतात, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक कर्मचारी कार्यरत आहेत. कर्मचारी व नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून कार्यालयात स्वच्छतागृह उभारण्यात आले आहे. मात्र, काही दिवसांपासून या स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. नियमित साफसफाई करावी, अशी मागणी होत आहे.