शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँगमध्ये हाहाकार! २,००० फ्लॅट्सचे गगनचुंबी टॉवर एकाचवेळी पेटले, १३ जणांचा मृत्यू...
2
‘ऑनलाइन गेमिंग’मध्ये उच्चशिक्षित शेतकऱ्याला चुना, ३० लाखांची फसवणूक!
3
दिल्ली स्फोटात नाव आल्याची बतावणी, ७१ वर्षीय वृद्धाला २९ लाखांचा गंडा; सायबर गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल
4
"प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकण्याची धमकी, न्यूड फोटोने ब्लॅकमेलिंग, इतर पुरुषांसोबत...!"; सेलिना जेटलीचे पतीवर 7 गंभीर आरोप
5
'या' स्मॉलकॅप कंपनीत रोहित शर्माची मोठी गुंतवणूक, खरेदी केले शेअर; इंट्रा-डेमध्ये स्टॉक बनला रॉकेट
6
राम मंदिर ध्वजारोहणावर बोलणं पाकिस्तानला महागात पडलं, भारतानं आरसा दाखवत गप-गार केलं!
7
महिंद्राने लाँच केली जगातील पहिली फॉर्म्युला ई-थीम एसयूव्ही, फ्यूचरिस्टिक डिझाइन अन् वर्ल्ड क्लास फीचर्स; जाणून घ्या किंमत
8
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
9
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
10
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
11
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
12
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
13
२०२६ ला ५ राशींची अग्निपरीक्षा सुरू, साडेसाती तीव्र होणार; शनि प्रकोप-प्रतिकूल, अखंड सावधान!
14
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
15
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
16
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
17
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
18
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
19
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
20
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
Daily Top 2Weekly Top 5

शरीर भौतिक तर आत्मा आध्यात्मिक जगाचे मूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:17 IST

जगाचे दुसरे नाव दु:ख आहे. त्यामुळे जोपर्यंत जगात आहात तोपर्यंत दु:खापासून मुक्ती नाही. ही मुक्ती हवी असल्यास जीवनात साधनेची गरज आहे. मनुष्य जीवनातच ही संधी आहे. मात्र ती आजच मिळते उद्या नाही. मानसाला मात्र आज सर्व सुखांचा उपभोग करून थकल्यावर मुक्तीचा विचार येतो, असा उपदेश जैनाचार्य जगच्चंद्रसुरीश्वर म.सा. यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जगाचे दुसरे नाव दु:ख आहे. त्यामुळे जोपर्यंत जगात आहात तोपर्यंत दु:खापासून मुक्ती नाही. ही मुक्ती हवी असल्यास जीवनात साधनेची गरज आहे. मनुष्य जीवनातच ही संधी आहे. मात्र ती आजच मिळते उद्या नाही. मानसाला मात्र आज सर्व सुखांचा उपभोग करून थकल्यावर मुक्तीचा विचार येतो, असा उपदेश जैनाचार्य जगच्चंद्रसुरीश्वर म.सा. यांनी केला.हिंगोली येथील जवाहर रोडवरील शांतीनाथ जैन मंदिरातील कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, मानवाचे शरीर हे भाड्याचे घर आहे. तरीही माणूस इतरत्र भटकत जातो. शेवटी घराची आठवण येतेच. मोक्ष हेच आपले घर आहे आणि तेच सुखही आहे. आपण दु:खापासून सुटका मिळवून सुखाच्या स्थितीत येण्याचा निरंतर प्रयत्न करतो. मात्र दु:खानंतर नवे सुख येण्याऐवजी नवे दु:खच येते. दु:खापासून दूर होण्यासाठी साधना आवश्यक आहे. आपण केवळ सुख मिळविण्यासाठी सर्व प्रयत्न करतो. मात्र शांती आणि समाधीसाठी काही करीत नाहीत. जीवनाचे लक्ष्य काय आहे? सुख, शांती की समाधी? पर्यायीपणे सुख शरीराशी, शांती मनाशी तर आत्मा समाधीशी जुडलेला आहे. आपण स्वत: या स्तरांमध्ये गेलो तर आपण कुठे आहोत, याची जाणीव होईल. आत्म्याशी जुडले गेलो तर परम सुखाची अनुभूती मिळेल. त्यासाठीच प्रयत्न होणेही आवश्यक आहे.पैसा, घर हे सुखाची साधने आहेत, सुख नाहीत. सुखाची साधने गोळा करण्यातच जीवन व्यतित होईल. सध्या त्यासाठीच आंधळी स्पर्धा सुरू आहे. हरीणाला दिसणाºया मृगजळाप्रमाणेच हे सगळे आभासी असल्याचेही जैनाचार्य म्हणाले. मनुष्य जीवनाचा उद्देश आम्ही ओळखत नाहीत. केवळ नशिबाने मिळालेले हे जीवन सुख भोगण्यासाठीच नाही. जीवनाचा उद्देश फक्त मोक्ष आहे. बंधनांपासून मुक्त होत ते शिखर गाठणेच आपले लक्ष्य असले पाहिजे. साधनेचा पुरुषार्थ करूनच मोक्ष मिळू शकतो. मात्र आपण सुखाच्या लालसेत शांती व समाधीचे लक्ष्यच विसरून गेलो, असेही ते म्हणाले.