शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शरीर भौतिक तर आत्मा आध्यात्मिक जगाचे मूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:17 IST

जगाचे दुसरे नाव दु:ख आहे. त्यामुळे जोपर्यंत जगात आहात तोपर्यंत दु:खापासून मुक्ती नाही. ही मुक्ती हवी असल्यास जीवनात साधनेची गरज आहे. मनुष्य जीवनातच ही संधी आहे. मात्र ती आजच मिळते उद्या नाही. मानसाला मात्र आज सर्व सुखांचा उपभोग करून थकल्यावर मुक्तीचा विचार येतो, असा उपदेश जैनाचार्य जगच्चंद्रसुरीश्वर म.सा. यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जगाचे दुसरे नाव दु:ख आहे. त्यामुळे जोपर्यंत जगात आहात तोपर्यंत दु:खापासून मुक्ती नाही. ही मुक्ती हवी असल्यास जीवनात साधनेची गरज आहे. मनुष्य जीवनातच ही संधी आहे. मात्र ती आजच मिळते उद्या नाही. मानसाला मात्र आज सर्व सुखांचा उपभोग करून थकल्यावर मुक्तीचा विचार येतो, असा उपदेश जैनाचार्य जगच्चंद्रसुरीश्वर म.सा. यांनी केला.हिंगोली येथील जवाहर रोडवरील शांतीनाथ जैन मंदिरातील कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, मानवाचे शरीर हे भाड्याचे घर आहे. तरीही माणूस इतरत्र भटकत जातो. शेवटी घराची आठवण येतेच. मोक्ष हेच आपले घर आहे आणि तेच सुखही आहे. आपण दु:खापासून सुटका मिळवून सुखाच्या स्थितीत येण्याचा निरंतर प्रयत्न करतो. मात्र दु:खानंतर नवे सुख येण्याऐवजी नवे दु:खच येते. दु:खापासून दूर होण्यासाठी साधना आवश्यक आहे. आपण केवळ सुख मिळविण्यासाठी सर्व प्रयत्न करतो. मात्र शांती आणि समाधीसाठी काही करीत नाहीत. जीवनाचे लक्ष्य काय आहे? सुख, शांती की समाधी? पर्यायीपणे सुख शरीराशी, शांती मनाशी तर आत्मा समाधीशी जुडलेला आहे. आपण स्वत: या स्तरांमध्ये गेलो तर आपण कुठे आहोत, याची जाणीव होईल. आत्म्याशी जुडले गेलो तर परम सुखाची अनुभूती मिळेल. त्यासाठीच प्रयत्न होणेही आवश्यक आहे.पैसा, घर हे सुखाची साधने आहेत, सुख नाहीत. सुखाची साधने गोळा करण्यातच जीवन व्यतित होईल. सध्या त्यासाठीच आंधळी स्पर्धा सुरू आहे. हरीणाला दिसणाºया मृगजळाप्रमाणेच हे सगळे आभासी असल्याचेही जैनाचार्य म्हणाले. मनुष्य जीवनाचा उद्देश आम्ही ओळखत नाहीत. केवळ नशिबाने मिळालेले हे जीवन सुख भोगण्यासाठीच नाही. जीवनाचा उद्देश फक्त मोक्ष आहे. बंधनांपासून मुक्त होत ते शिखर गाठणेच आपले लक्ष्य असले पाहिजे. साधनेचा पुरुषार्थ करूनच मोक्ष मिळू शकतो. मात्र आपण सुखाच्या लालसेत शांती व समाधीचे लक्ष्यच विसरून गेलो, असेही ते म्हणाले.