शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
4
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
5
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
6
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
7
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
8
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
9
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
10
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
11
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
12
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
13
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
14
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
15
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
16
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
17
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
18
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
19
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
20
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव

शरीर भौतिक तर आत्मा आध्यात्मिक जगाचे मूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:17 IST

जगाचे दुसरे नाव दु:ख आहे. त्यामुळे जोपर्यंत जगात आहात तोपर्यंत दु:खापासून मुक्ती नाही. ही मुक्ती हवी असल्यास जीवनात साधनेची गरज आहे. मनुष्य जीवनातच ही संधी आहे. मात्र ती आजच मिळते उद्या नाही. मानसाला मात्र आज सर्व सुखांचा उपभोग करून थकल्यावर मुक्तीचा विचार येतो, असा उपदेश जैनाचार्य जगच्चंद्रसुरीश्वर म.सा. यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जगाचे दुसरे नाव दु:ख आहे. त्यामुळे जोपर्यंत जगात आहात तोपर्यंत दु:खापासून मुक्ती नाही. ही मुक्ती हवी असल्यास जीवनात साधनेची गरज आहे. मनुष्य जीवनातच ही संधी आहे. मात्र ती आजच मिळते उद्या नाही. मानसाला मात्र आज सर्व सुखांचा उपभोग करून थकल्यावर मुक्तीचा विचार येतो, असा उपदेश जैनाचार्य जगच्चंद्रसुरीश्वर म.सा. यांनी केला.हिंगोली येथील जवाहर रोडवरील शांतीनाथ जैन मंदिरातील कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, मानवाचे शरीर हे भाड्याचे घर आहे. तरीही माणूस इतरत्र भटकत जातो. शेवटी घराची आठवण येतेच. मोक्ष हेच आपले घर आहे आणि तेच सुखही आहे. आपण दु:खापासून सुटका मिळवून सुखाच्या स्थितीत येण्याचा निरंतर प्रयत्न करतो. मात्र दु:खानंतर नवे सुख येण्याऐवजी नवे दु:खच येते. दु:खापासून दूर होण्यासाठी साधना आवश्यक आहे. आपण केवळ सुख मिळविण्यासाठी सर्व प्रयत्न करतो. मात्र शांती आणि समाधीसाठी काही करीत नाहीत. जीवनाचे लक्ष्य काय आहे? सुख, शांती की समाधी? पर्यायीपणे सुख शरीराशी, शांती मनाशी तर आत्मा समाधीशी जुडलेला आहे. आपण स्वत: या स्तरांमध्ये गेलो तर आपण कुठे आहोत, याची जाणीव होईल. आत्म्याशी जुडले गेलो तर परम सुखाची अनुभूती मिळेल. त्यासाठीच प्रयत्न होणेही आवश्यक आहे.पैसा, घर हे सुखाची साधने आहेत, सुख नाहीत. सुखाची साधने गोळा करण्यातच जीवन व्यतित होईल. सध्या त्यासाठीच आंधळी स्पर्धा सुरू आहे. हरीणाला दिसणाºया मृगजळाप्रमाणेच हे सगळे आभासी असल्याचेही जैनाचार्य म्हणाले. मनुष्य जीवनाचा उद्देश आम्ही ओळखत नाहीत. केवळ नशिबाने मिळालेले हे जीवन सुख भोगण्यासाठीच नाही. जीवनाचा उद्देश फक्त मोक्ष आहे. बंधनांपासून मुक्त होत ते शिखर गाठणेच आपले लक्ष्य असले पाहिजे. साधनेचा पुरुषार्थ करूनच मोक्ष मिळू शकतो. मात्र आपण सुखाच्या लालसेत शांती व समाधीचे लक्ष्यच विसरून गेलो, असेही ते म्हणाले.