शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उघड्यावरील खाद्यपदार्थामुळे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 18:12 IST

अन्न व औषधी प्रशासन हाकलतेय उंटावरून शेळ्या

ठळक मुद्देशहरातील एकाही विक्रेत्यावर कारवाई नाहीप्रशासनाच्या दुर्लक्षाने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

- राहुल टकले 

हिंगोली : शहरात ठिकठिकाणी उघड्यावर खाद्यपदार्थ ठेवून त्याची विक्री सुरु आहे. त्यामुळे हिंगोलीकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे अन्न व औषधी प्रशासन हिंगोलीचा कारभार परभणीहून पाहत असल्याने शहरातील विक्रेत्यांवर एकही कारवाई झाल्याचे ऐकविण्यात नाही. त्यामुळे या विक्रेत्यांना कसलीही भीती उरलेली नसून खाणाऱ्यांनाही आपल्या आरोग्याची काळजी नसल्याचे दिसून येते.

जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या हिंगोली शहरात विविध ठिकाणाहून येणाऱ्या नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे मुख्य मार्गावरील तसेच बसस्थानक, शासकीय कार्यालये परिसरातील हॉटेल्समध्ये नेहमी गर्दी दिसून येते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने माशांचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. या माशा  कुजलेल्या कचऱ्यावर बसून या खाद्यपदार्थावर बसत आहेत. त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

ग्राहकांना खाण्यासाठी देण्यात येणारे हे खाद्यपदार्थ सुरक्षितरीत्या झाकून ठेवण्याकडे व्यावसायिकांचा कानाडोहा होत आहे. शिवाय अनेक ठिकाणी हातगाड्यांवर खाद्यपदार्थांची विक्री होत असून याच्या आजूबाजूलाही कमालीची दुर्गधी व घाण साचल्याचे चित्र आहे. त्यातच यंदा भूमिगत गटार योजनेच्या कामासाठी शहरातील सर्व रस्ते मधोमध खोदण्यात आले आहेत. त्यामुळे पाऊस नसताना धूळ तर पाऊस होताच नालीतील सांडपाणी या रस्त्यावर साचत आहे. वाहनांमुळे या सांडपाण्याचे शिंतोडे सर्वत्र उडतात अशा स्थितीत हे पदार्थ खाण्यासाठी कितपत सुरक्षित आहेत, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. अन्न व औषध प्रशासन मात्र शहराकडे ढुंकूनही पाहण्यास तयार नसल्याने विक्रेत्यांना फारशी भीती उरलेली नही. त्यामुळे अन्न व औषधी प्रशासनाने कारवाई करण्याची गरज आहे.

प्रशासनाच्या दुर्लक्षाने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवरअन्न व औषधी प्रशासन विभागाचे कार्यालय परभणीत असल्याने हिंगोली जिल्ह्याकडे या विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. या विभागाचे अधिकारी केवळ स्थानिक पोलिसांनी एखादी कारवाई केल्यास फिर्यादीचे सोपस्कार पार पाडण्यासाठी जिल्ह्यात येतात. हिंगोली जिल्हा परभणीपासून वेगळा होऊन वीस वर्षे उलटली तरीही जिल्ह्यात अन्न व औषधी प्रशासनाचे कार्यालय नाही.

यासंबंधी हिंगोली जिल्ह्याचा अन्न व औषधी प्रशासन विभागाचा पदभार असलेल्या अनुराधा भोसले यांना विचारणा केली असता, मी सुटीवर असल्याने काही सांगता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. शहरात आतापर्यंत एखादी कारवाई केली  का, असे विचारले असता, रेकॉर्ड तपासल्याशिवाय सांगता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तर अन्न व औषधी विभागाचे सहायक आयुक्त कृष्णा जयपूरकर यांनी कारवाई सुरु असल्याचे सांगितले. 

टॅग्स :Hingoliहिंगोलीfoodअन्नfood poisoningअन्नातून विषबाधा