शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या पाणीपुरवठा योजनांची देयके पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 00:34 IST

जि.प.च्या मागील सात ते आठ वर्षांपासून रखडलेल्या जवळपास ३५ योजना प्रशासनाच्या तगाद्यानंतर पूर्ण तर झाल्या. मात्र आता त्यांना निधी कुठून द्यायचा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. नवीन योजनात गावनिहाय निधी येत असल्याने या योजनांवर तो खर्च करता येत नसल्याचे प्रशासन सांगत आहे. जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत हा मुद्दा समोर आला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जि.प.च्या मागील सात ते आठ वर्षांपासून रखडलेल्या जवळपास ३५ योजना प्रशासनाच्या तगाद्यानंतर पूर्ण तर झाल्या. मात्र आता त्यांना निधी कुठून द्यायचा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. नवीन योजनात गावनिहाय निधी येत असल्याने या योजनांवर तो खर्च करता येत नसल्याचे प्रशासन सांगत आहे. जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत हा मुद्दा समोर आला.जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीस जि.प.अध्यक्षा शिवराणी नरवाडे, उपाध्यक्ष अनिल पतंगे, सभापती भैय्या देशमुख, प्रल्हाद राखोंडे आदींची उपस्थिती होती. यावेळी लघुसिंचन, पाणीपुरवठा, स्वच्छ भारत अभियानाचा आढावा सादर करण्यात आला. यात पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अधिकारी नसल्याने नवागतांना या बैठकीत माहितीच देता येत नसल्याची सदस्यांची ओरड होती. यात जि.प.च्या मागील सात ते आठ वर्षांपासून रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांसाठी १२ कोटी रुपये लागत असून सध्या जवळपास ३५ देयके सादर झाली असल्याची माहिती देण्यात आली. तर मुख्यमंत्री पेयजल योजनेतील गावेही आता राष्ट्रीय पेयजल योजनेत समाविष्ट झाल्याची माहिती देण्यात आली. याशिवाय या योजनांना आता शासनाकडून गावाच्या नावासह निधी येत असल्याने तो इतर योजनांसाठी खर्च करायचा की कसा? असा पेच असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे विविध ठिकाणची कामे झाली असली तरीही त्यांची देयके अडण्यामागे हे कारण असल्याचे सांगितल्याने या निधीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचा ठराव घेण्यात आला. तर प्रादेशिक योजनांची कामे रखडल्याने सगळीकडे बोंब होत असल्याने ही कामे लवकर होण्यासाठी प्रक्रिया गतिमान करण्यास सांगण्यात आले. तर लघुसिंचन विभागाचीही विविध कामे प्रगतीतच आहेत. जलयुक्तच्या कामांना गती देण्यास सांगितले.मुख्यमंत्री पेयजलमध्ये सात गावांची कामे मंजूर झाली होती. ही कामेही आता राष्ट्रीय पेयजल योजनेतच वर्ग झाली आहेत. विशेष म्हणजे या योजनेत निधीसह कामांची नुसतीच घोषणा झाली होती. मात्र प्रत्यक्षात योजनांच्या त्रुटीच दूर न केल्याने काम एकाही ठिकाणी सुरू नव्हते.